शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

टीआरपी घोटाळा; पोलिसांनी पत्रकार परिषद का घेतली? उच्च न्यायालयाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 02:37 IST

पत्रकारांशी संवाद साधणे हे पोलिसांसाठी बंधनकारक आहे का? पोलीस आयुक्तांना पत्रकारांशी का बोलावे लागले? असे सवाल न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने केले. 

मुंबई : गेल्या वर्षी झालेल्या झालेल्या टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद का घेतली? असा सवाल उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना मंगळवारी केला. (TRP scam; High Court asked Why did the police hold a press conference)

पत्रकारांशी संवाद साधणे हे पोलिसांसाठी बंधनकारक आहे का? पोलीस आयुक्तांना पत्रकारांशी का बोलावे लागले? असे सवाल न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने केले. 

टीआरपी घोटाळ्याचा तपास सीबीआय किंवा अन्य स्वतंत्र तपास यंत्रणेकडे वर्ग करावा यासह अन्य बऱ्याच मागण्यांसाठी एआरजी आउटलायर मीडिया व रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी उच्च न्यायालयांत अनेक याचिका केल्या आहेत. या सर्व याचिकांवर मंगळवारी सुनावणी होती.

सुनावणीत ‘एआरजी’च्या वतीने ज्येष्ठ वकील अशोक मुंदर्गी यांनी युक्तिवाद केला की, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पत्रकार परिषद घेण्यामागे पोलिसांचा कुहेतू होता. रिपब्लिक टीव्ही व मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात पुरावे नसूनही पोलीस त्यांचे नाव आरोपींच्या यादीत घुसवण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

या घोटाळ्याची माहिती पोलीस माध्यमांना देत होते. याचाच अर्थ पोलिसांकडे अर्णब यांच्याविरोधात पुरावे नाहीत. त्यांना नाहक या प्रकरणात गोवण्यात येत आहे.  दोषारोपपत्रात पोलिसांनी वृत्तवाहिनी आणि कर्मचाऱ्यांना संशयित आरोपी म्हणून उल्लेख केला आहे.  तसेच या प्रकरणाचा तपास करणारे तपास अधिकारी वाझे हे एका प्रकरणात गुंतले असल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे, असा युक्तिवाद मुंदर्गी यांनी न्यायालयात केला. 

सचिन वाझे हे वादग्रस्त पोलीस अधिकारी आहेत, असेही मुंदर्गी यांनी म्हटले. उच्च न्यायालय पुढील सुनावणी आज, बुधवारी घेणार आहे.  तोपर्यंत एआरजी आउटलायर मीडिया व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई न करण्याचे आश्वासन राज्य सरकारने कायम ठेवले. 

टॅग्स :TRP Scamटीआरपी घोटाळाtrp ratingटीआरपीHigh Courtउच्च न्यायालयPoliceपोलिस