शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
2
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
3
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
4
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
5
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
6
या कंपनीला AI वरील अहवाल देणे महागात पडले; ऑस्ट्रेलियाला द्यावा लागला भरमसाठ दंड
7
Shopping: शॉपिंग हा खर्च नाही, तर ही आहे तुमच्या भविष्याची खास गुंतवणूक; कशी ते पहा!
8
Test Rankings: आयसीसी टेस्ट क्रमवारीत बुमराहची बादशाहत कायम; मोहम्मद सिराजचेही मोठी झेप!
9
गुंतवणूकदार 'गार', टांगा पलटी घोडे फरार...! बाजारात येताच 40% आपटला शेअर, लोकांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
10
EPFO सदस्यांना मोफत मिळतो लाखो रुपयांचा लाईफ इन्शुरन्स कव्हर! काय आहे EDLI योजना?
11
Max Life पेन्शन फंडाचा परवाना रद्द; लोकांच्या पैशाचं काय होणार? जाणून घ्या
12
Video - देवदूत! भूस्खलनानंतर रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी डॉक्टरने स्वत:चा जीव घातला धोक्यात
13
“PM मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी”: वडेट्टीवार
14
खान कुटुंबात आली परी! अरबाज खान लेकीला घेऊन निघाला; रुग्णालयाबाहेरील व्हिडीओ व्हायरल
15
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश
16
शेतकऱ्याने तहसील कार्यालयात घेतले विष, खासदार प्रतिभा धानोरकरांवर गंभीर आरोप; मृतदेह स्वीकारण्यास नकार
17
“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे
18
आजपासून पिनसोबतच चेहरा अन् बोटांचे ठसे वापरूनही करा यूपीआयवरून व्यवहार; फसवणुकीला आळा बसणार
19
नात्याला काळीमा! सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
20
'डिजिटल अरेस्ट' पासून कसे वाचायचे? समन्स खरे की खोटे असे ओळखा; ईडीने सगळीच माहिती सांगितली

टीआरपी घोटाळा : गुन्हा रद्द करण्यासाठी अर्णब गोस्वामींची उच्च न्यायालयात धाव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 10:22 IST

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बजावलेले समन्स रद्द करण्यासाठी अर्णब गोस्वामी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणीस नकार देत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. (Arnab Goswami)

मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा रद्द करावा, यासाठी ‘रिपब्लिक टीव्ही’ची मालकी असलेल्या एआरजी आउटलायर मीडिया प्रा. लि. आणि या वृत्तवाहिनीचे मुख्य अर्णब गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.  

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बजावलेले समन्स रद्द करण्यासाठी अर्णब गोस्वामी यांनी थेट  सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणीस नकार देत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. गुन्हा रद्द करण्याच्या मागणीबरोबरच मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची सीबीआय चौकशी करावी; तसेच सेवा नियमांअंतर्गत पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करावी, अशीही मागणी गोस्वामी यांनी केली आहे.च्टीआरपी घोटाळ्याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्याने आयपीसी ४०९, ४२०, १२०- बी आणि ३४ अंतर्गत एआरजी आउटलायर मीडिया प्रा. लि. आणि अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हा नोंदविला. तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी केली. यामध्ये केबल आॅपरेटर्स, ब्रॉडकास्टर्स, मीडिया एजन्सी, जाहिरातदार आणि अन्य भागधारकांचा समावेश आहे. त्यामुळे याचा तपास संपूर्ण देशभर करावा लागेल.  

च् मुंबई पोलिसांनी केलेला तपास पूर्वनिश्चित होता. हे योग्य नाही. कारण याचे टीव्ही इंडस्ट्रीवर वाईट परिणाम झाले आहेत. मुंबई पोलिसांनी अशा प्रकारे तपास करुन चुकीचा पायंडा रचला आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीHigh Courtउच्च न्यायालयPoliceपोलिसCourtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालय