शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

गिर्यारोहकांनो, साहसाबरोबरच जीव तितकाच महत्त्वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 13:09 IST

शनिवारी अनुभवी, मातब्बर गिर्यारोहक अरुण सावंत यांच्या कोकणकड्यावरूनपडून झालेल्या मृत्यूने गिर्यारोहकांवर शोककळा

ठळक मुद्देगिर्यारोहकांचे मत : अनुभव, कौशल्याशिवाय मोहीम नकोच; सावधगिरी बाळगणे गरजेचेदाखविण्यासाठी नव्हे तर स्वत:साठी गिर्यारोहण

पुणे : सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतील डोंगरदऱ्या गिर्यारोहकांना नेहमीच आव्हान देत आल्या आहेत. अनेकांनी अवघड, बिकट अशा किल्ले, डोंगर व सुळक्यांवर यशस्वी चढाईदेखील आहे. मात्र यात पुरेशी काळजी घेतली न गेल्याने त्यांना जीवदेखील गमवावा लागला आहे. यंदा राजगड येथे एका गिर्यारोहकाचा झालेला मृत्यू व शनिवारी अनुभवी, मातब्बर गिर्यारोहक अरुण सावंत यांच्या मृत्यूने गिर्यारोहकांवर शोककळा पसरली आहे. तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाला आपल्या कवेत घेणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगररांगेत गिर्यारोहकांच्या मृत्यूने नवोदित, शिकाऊ व उत्साही गिर्यारोहकांपुढे काही प्रश्न उपस्थित केले आहेत.ज्येष्ठ गिर्यारोहक ॠषी यादव म्हणाले, की ड्युक्स नोजची मोहीम यशस्वी करणारा पहिला गिर्यारोहक म्हणून अरुणचे नाव घ्यावे लागेल. महाराष्ट्रातील सर्वाधिक अनुभवी व क्रमांक एकचा गिर्यारोहक अशी त्याची ओळख होती. त्याचा अनुभव व कौशल्याबद्दल शंका येण्याचे कारण नाही. त्याने आजवर अनेक मोहिमा यशस्वी करून मार्गदर्शन केले आहे. त्याचा मृत्यू नेमका निसर्गाच्या चुकीने की त्याच्या स्वत:च्या चुकीने झाला याबद्दल सांगता येणार नाही. याउलट परिस्थिती हिमालयात पाहायला मिळते. तिथे निसर्गाची कृपा असल्यास मोहिमा यशस्वी होताना दिसतात. नवोदित, शिकाऊ व हौशी गिर्यारोहकांनी या घटनेवरून शिकण्याची गरज आहे. अरुण सारखा अनुभवी व मातब्बर गिर्यारोहकाला देखील मृत्युला सामोरे जावे लागले. त्यामुळे सातत्याने सराव, अनुभव व तांत्रिक कौशल्य संपादन केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा धोका पत्करू नये. ही गोष्ट तरुण गिर्यारोहकांनी लक्षात घेण्याची गरज आहे...............दाखविण्यासाठी नव्हे तर स्वत:साठी गिर्यारोहणकुठल्याही किल्ल्यावर अथवा पर्वतावर गेल्यानंतर तिथे गिर्यारोहणाचा आनंद घेण्याऐवजी सेल्फी काढण्यावर अधिक भर देताना दिसतात. निसर्गाचा आनंद घेण्याऐवजी सोशल मीडियावर फोटो टाकण्याची त्यांची हौस मृत्यूला कारणीभूत होत आहे. अनेक दा तरुण गिर्यारोहक किल्ल्यावर गेल्यानंतर तेथील बुरुजावरून खाली उतरतात. बुरुज जीर्ण झाल्याने त्या जागेवरुन गिर्यारोहण करणे धोकादायक आहे. ही बाब त्यांच्या लक्षात येत नाही. अतिउत्साहीपणाच्या भरात जिवाची किंमत त्यांना मोजावी लागते. अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. विशेषत: दरीच्या ठिकाणी सेल्फी घेण्याची हौस तरुणांच्या अंगलट आली आहे.....................अरुणचे जाणे आम्हा सर्व गिर्यारोहकांसाठी मोठी धक्कादायक गोष्ट आहे. तो एक अनुभवी गिर्यारोहक होता. त्याच्यासारख्या अनुभवी गिर्यारोहकाकडून नेमकी काय चूक झाली यावर लगेच काही सांगता येणार नाही. त्याने त्याच्या गिर्यारोहणाच्या काळात अनेक नवीन वाटा शोधल्या. पुढे त्या सर्वांना माहिती झाल्या. गेल्या काही दिवसांपूर्वी राजगड येथे देखील एका गिर्यारोहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आपण ज्या ठिकाणी गिर्यारोहणाकरिता जात आहोत, त्याची पुरेशी माहिती घेणे, आवश्यक ती साधने जवळ बाळगणे महत्त्वाचे ठरते. नवीन लोकांनी गिर्यारोहणाचे धाडस जरूर दाखवावे; मात्र त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. उत्साहाच्या भरात केलेली एखादी चूक जिवावर बेतते. तरुणांना या क्षेत्राची आवड आहे. त्यात त्यांना अधिक नव्याने काही शोधण्याची इच्छा तसेच गिर्यारोहणाची आवड असणे ही स्वागतार्ह गोष्ट असली तरी मोहिमेसाठी आवश्यक तयारी, अभ्यास व मार्गदर्शन घ्यावे, असे त्यांना सांगावेसे वाटते.- उमेश झिरपे, गिर्यारोहक व गिरीप्रेमी संस्थेचे संस्थापक.................

टॅग्स :PuneपुणेTrekkingट्रेकिंगFortगडDeathमृत्यू