शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

राज्यात उभे राहताहेत कचऱ्याचे डोंगर; डम्पिंगसाठी वर्षाला ३,५०० कोटी खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 06:54 IST

महाराष्ट्राच्या महानगरांमध्ये कच-याचे डोंगर तयार होत असून, सत्तावीस महापालिकांच्या क्षेत्रात दररोज १९ हजार टनांहून अधिक टन घनकचरा गोळा होतो

- वसंत भोसले कोल्हापूर : महाराष्ट्राच्या महानगरांमध्ये कच-याचे डोंगर तयार होत असून, सत्तावीस महापालिकांच्या क्षेत्रात दररोज १९ हजार टनांहून अधिक टन घनकचरा गोळा होतो, पण त्यापैकी अर्ध्यापेक्षा कमी कच-यावरच प्रक्रिया होत असल्याचे भयावह वास्तव ‘लोकमत’च्या सर्वेक्षणात समोर आले आहे.राज्यातील सर्व २७ महापालिका क्षेत्रांत गोळा होणा-या घनकच-यासंबंधी सर्वेक्षण केले गेले. त्यानुसार, महाराष्ट्रात मात्र दररोज तयार होणाºया १९ हजार ४२० टन कच-यापैकी केवळ ७ हजार २६२ टन कच-यावर प्रक्रिया होते. कचरा गोळा करून डम्पिंग करण्यासाठी वर्षाला ३ हजार ५४२ कोटी रुपये खर्च होतात. २७ पैकी ११ महापालिका क्षेत्रात गोळा होणा-या कच-यावर अजिबातच प्रक्रियाच होत नाही. सहा महापालिकांचा प्रक्रिया करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. फक्त मालेगाव महापालिकेला वर्षाला केवळ वीस लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. उर्वरित एकाही महापालिकेला कचºयावरील प्रक्रियेतून एक पैशाचेही उत्पन्न मिळत नाही.मुंबई महापालिका दररोज गोळा होणाºया ७,४२५ टन कचºयापैकी ३,८०० टन कचºयावर प्रक्रिया करते, असा प्रशासनाचा दावा आहे. या प्रक्रियेतून मिळणारे उत्पन्न त्यासाठीच्या प्रक्रिया खर्चापोटी संबंधित कंपनीला दिले जाते. महापालिकेला एक पैसाही मिळत नाही. नाशिक ही एकमेव महापालिका आहे की, तिच्या क्षेत्रात निर्माण होणाºया पाचशे टन घनकºयावर पूर्ण प्रक्रिया केली जाते. पुण्यातही ५० टक्के कचºयावर प्रक्रिया होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या महानगराचे महापौर होते, त्या नागपूरमध्ये दररोज १,१०० मेट्रिक टन कचरा गोळा होतो. मात्र, त्यापैकी केवळ १५० टनांवरच प्रक्रिया केली जाते, असे सर्वेक्षणात समोर आले आहे.>कचरा व्यवस्थापनाचे प्रस्ताव फायलीतच!स्वच्छ भारत अभियानांतर्गत महानगर, नगरपालिका आणि नगरपंचायतींनाकचरा व्यवस्थापनाचे प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहेत. तसे महापालिकांनीही तयार केले. मात्र, त्यापैकी बहुतांश महापालिकांचे प्रस्ताव कार्यालयीन फाइल्समध्येच पडून आहेत, असेही या सर्वेक्षणात स्पष्ट दिसूनआले आहे. वाढत्या शहरांबरोबर दरवर्षी कचºयाची समस्या वाढत आहे, पण त्यावर ठोस उपाय करणारी नाशिक वगळता एकाही महापालिकेचे प्रयत्न झालेले दिसत नाहीत, हेदेखील या सर्वेक्षणात आढळून आले आहे.शून्य टक्के प्रक्रिया : भिवंडी, पनवेल, वसई-विरार, औरंगाबाद, परभणी, लातूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, जळगाव आणि नगर या अकरा महापालिका क्षेत्रातील कचरा गोळा करून डंप केला जातो. यातील एक टन कचºयावरही प्रक्रिया केली जात नाही.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्न