शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात उभे राहताहेत कचऱ्याचे डोंगर; डम्पिंगसाठी वर्षाला ३,५०० कोटी खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 06:54 IST

महाराष्ट्राच्या महानगरांमध्ये कच-याचे डोंगर तयार होत असून, सत्तावीस महापालिकांच्या क्षेत्रात दररोज १९ हजार टनांहून अधिक टन घनकचरा गोळा होतो

- वसंत भोसले कोल्हापूर : महाराष्ट्राच्या महानगरांमध्ये कच-याचे डोंगर तयार होत असून, सत्तावीस महापालिकांच्या क्षेत्रात दररोज १९ हजार टनांहून अधिक टन घनकचरा गोळा होतो, पण त्यापैकी अर्ध्यापेक्षा कमी कच-यावरच प्रक्रिया होत असल्याचे भयावह वास्तव ‘लोकमत’च्या सर्वेक्षणात समोर आले आहे.राज्यातील सर्व २७ महापालिका क्षेत्रांत गोळा होणा-या घनकच-यासंबंधी सर्वेक्षण केले गेले. त्यानुसार, महाराष्ट्रात मात्र दररोज तयार होणाºया १९ हजार ४२० टन कच-यापैकी केवळ ७ हजार २६२ टन कच-यावर प्रक्रिया होते. कचरा गोळा करून डम्पिंग करण्यासाठी वर्षाला ३ हजार ५४२ कोटी रुपये खर्च होतात. २७ पैकी ११ महापालिका क्षेत्रात गोळा होणा-या कच-यावर अजिबातच प्रक्रियाच होत नाही. सहा महापालिकांचा प्रक्रिया करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. फक्त मालेगाव महापालिकेला वर्षाला केवळ वीस लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. उर्वरित एकाही महापालिकेला कचºयावरील प्रक्रियेतून एक पैशाचेही उत्पन्न मिळत नाही.मुंबई महापालिका दररोज गोळा होणाºया ७,४२५ टन कचºयापैकी ३,८०० टन कचºयावर प्रक्रिया करते, असा प्रशासनाचा दावा आहे. या प्रक्रियेतून मिळणारे उत्पन्न त्यासाठीच्या प्रक्रिया खर्चापोटी संबंधित कंपनीला दिले जाते. महापालिकेला एक पैसाही मिळत नाही. नाशिक ही एकमेव महापालिका आहे की, तिच्या क्षेत्रात निर्माण होणाºया पाचशे टन घनकºयावर पूर्ण प्रक्रिया केली जाते. पुण्यातही ५० टक्के कचºयावर प्रक्रिया होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या महानगराचे महापौर होते, त्या नागपूरमध्ये दररोज १,१०० मेट्रिक टन कचरा गोळा होतो. मात्र, त्यापैकी केवळ १५० टनांवरच प्रक्रिया केली जाते, असे सर्वेक्षणात समोर आले आहे.>कचरा व्यवस्थापनाचे प्रस्ताव फायलीतच!स्वच्छ भारत अभियानांतर्गत महानगर, नगरपालिका आणि नगरपंचायतींनाकचरा व्यवस्थापनाचे प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहेत. तसे महापालिकांनीही तयार केले. मात्र, त्यापैकी बहुतांश महापालिकांचे प्रस्ताव कार्यालयीन फाइल्समध्येच पडून आहेत, असेही या सर्वेक्षणात स्पष्ट दिसूनआले आहे. वाढत्या शहरांबरोबर दरवर्षी कचºयाची समस्या वाढत आहे, पण त्यावर ठोस उपाय करणारी नाशिक वगळता एकाही महापालिकेचे प्रयत्न झालेले दिसत नाहीत, हेदेखील या सर्वेक्षणात आढळून आले आहे.शून्य टक्के प्रक्रिया : भिवंडी, पनवेल, वसई-विरार, औरंगाबाद, परभणी, लातूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, जळगाव आणि नगर या अकरा महापालिका क्षेत्रातील कचरा गोळा करून डंप केला जातो. यातील एक टन कचºयावरही प्रक्रिया केली जात नाही.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्न