शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
4
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
5
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
6
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
7
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
8
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
9
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
10
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
11
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
12
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
13
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
14
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
15
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
16
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
17
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
18
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
19
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
20
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले

मीरा भाईंदर येथील बंददरम्यान वाहतूक पोलिसाचा शाळेतील विद्यार्थ्यांना माहितीचा हात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 22:19 IST

मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेतील ठेका कर्मचाऱ्यांच्या संघटनेने शुक्रवारी अचानक बस सेवा बंद पाडल्याने विशेषतः विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले.

मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेतील ठेका कर्मचाऱ्यांच्या संघटनेने शुक्रवारी अचानक बस सेवा बंद पाडल्याने विशेषतः विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले. भाईंदर येथील बस स्टॉप वर बसच्या प्रतीक्षेत असलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना पाहून कर्तव्यावरील वाहतूकचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील चौधरी यांनी त्या विद्यार्थ्यांना चार रिक्षात बसवून शाळेत पाठवले. ह्या मदतीने विद्यार्थ्यांसह काही पालक व परिसरात उपस्थित नागरिकांना देखील चौधरी यांचे आभार मानले.  

बस सेवा बंद पाडल्याने सकाळी व दुपारी शाळेत जाणाऱ्या तसेच महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले. कारण पालिकेच्या बस मध्ये नेहमी जात असल्याने सवलतीचे तिकीट किंवा पास सोबत असतो. मात्र अचानक बस सेवा बंद झाल्याने शाळा- महाविद्यालयात जायचे कसे असा प्रश्न पडला. ज्यांच्या कडे पैसे होते त्यांनी रिक्षासाठी जास्त भाडे देऊन किंवा मिळेल ते वाहन पकडून शाळा - महाविद्यालय गाठले. 

मात्र ज्या विद्यार्थ्यां कडे मोजकेच पैसे होते शिवाय आता जास्त पैसे देऊन शाळेत जाऊ मात्र शाळेतून परत येण्यासाठी पैसे शिल्लक राहणार नाहीत अश्या विवंचनेत देखील असंख्य विद्यार्थी सापडले. भाईंदर पश्चिम येथील शिवसेना गल्ली नाका जवळच्या बस स्टॉप वर शाळेत जाणारी लहान व मोठे अनेक विद्यार्थी पालिका बसची प्रतीक्षा करत ताटकळत होते. काही विद्यार्थ्यांचे पालक नेहमी प्रमाणे त्यांना बस स्टॉप वर सोडण्या साठी आले होते. 

परंतु पालिकेची बस येण्याच्या प्रतीक्षेत अर्धा तास झाला तरी बस न आल्याने शाळेत उशीर होणार याची चिंता सतावत होती. त्यातच रिक्षाने जायचे तर जास्त पैसे लागतात व तेवढे पैसे देखील सोबत नव्हते. पालकांनी देखील मुलांना बस स्टॉप पर्यंत सोडायचे म्हणून पैसे आणले नव्हते. 

शाळकरी विद्यार्थ्यांची घालमेल पाहून समोरच वाहतूक चौकीत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील चौधरी हे बस स्टॉप वर आले. आणि त्यांनी रिकाम्या रिक्षा थांबवून रिक्षा चालकांना शाळेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भाईंदर सेकंडरी जवळील पालिका शाळेत सोडण्यास सांगितले. सुमारे चार रिक्षां मधून चौधरी यांनी सर्व विद्यार्थ्यांना शाळेत पोहचवण्याचे काम केले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMaharashtraमहाराष्ट्र