शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
3
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
4
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
5
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
6
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
7
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
8
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
9
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
10
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
11
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
12
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
13
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
14
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
15
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
16
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
17
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
18
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
19
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
20
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे

'भारत बंद'ला पाठिंबा देण्याचे कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 3:56 PM

मागील १० महिन्यांपासून देशातील शेतकरी मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत.

नितिन पंडीत

भिवंडी: मागील १० महिन्यांपासून देशातील शेतकरी मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना भारतातील शेती ताब्यात घेण्यासाठी मदत करणारेच हे तीन कायदे असून या कायद्यामुळे छोटे शेतकरी उध्वस्त होणार असून देशातील गरीब नागरिकांच्या जगण्याचा आधार असलेली रेशन व्यवस्था देखील पूर्णपणे नष्ट करणार आहेत. 

हे नवीन कायदे बड्या कॉर्पोरेट्स कंपन्यांना जीवनावश्यक अन्नधान्याची साठेबाजी आणि काळा बाजार करण्याची खुली सूट देऊन महागाई वाढवण्याला हातभार लावणार असल्याचा आरोप विविध शेतकरी व कामगार संघाटांनी केला असून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी सोमवारी २७ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात येणाऱ्या भारत बंदला ठाणे जिल्ह्यासह भिवंडीतील व्यवसायिकांबरोबरच रिक्षा व टेक्सी चालकांनी देखील समर्थन देऊन २७ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजे पर्यंत आपली वाहने व दुकाने बंद ठेऊन या भारत बंद आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक विजय खाने , कॉ. बळीराम चौधरी ,ऍड. किरण चन्ने , कॉ. सुनील चव्हाण , कॉ रमेश जाधव व सदस्यांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे. 

बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना खूष करण्यासाठी मोदी सरकारने आधा अस्तित्वात असलेले सर्व कामगार कायदे रद्द केले आणि त्यांच्या जागी चार कामगार विरोधी श्रमसहिता आणल्या असल्याचा आरोप करत मोदी सरकारच्या धोरणांमुळे वीज, पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचे दर गगनाला भिडले असून अदानी, अंबानी, ऍमेझॉन आणि वॉलमार्ट यांची प्रचंड भरभराट होत आहे आणि छोट्या उद्योगधंद्यांना, दुकानदारांना मात्र नोटाबंदी आणि जीएसटीखाली चिरडले जाते आहे. बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत असून देशातील युवक, युवतीचे भवितव्य अंधारात असल्याचा आरोप देखील कृती समितीने जाहीर निवेदनात केला आहे. 

मोदी सरकारने केलेले शेतकरी विरोधी, कामगार विरोधी, जनविरोधी कायदे आणि धोरणे रद्द करावेत या मागणीसाठी २७ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजे पर्यंत आपली वाहने व दुकाने बंद ठेऊन या भारत बंद आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी