शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नागपूर कारागृहात साडेतीन वर्षांत एकूण ३२ कैद्यांचा मृत्यू, २५ कैद्यांचा मृत्य संशयास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 04:40 IST

मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणानंतर, नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या आपापसांतील भांडणात, बहुचर्चित कुश कटारिया हत्येचा दोषी आयुष पुगलिया या कैद्याची सोमवारी हत्या झाली. या घटनेमुळे खळबळ उडाली असतानाच, याच कारागृहातील २५ कैद्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली.

- मनीषा म्हात्रे  मुंबई : मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणानंतर, नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या आपापसांतील भांडणात, बहुचर्चित कुश कटारिया हत्येचा दोषी आयुष पुगलिया या कैद्याची सोमवारी हत्या झाली. या घटनेमुळे खळबळ उडाली असतानाच, याच कारागृहातील २५ कैद्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली. गेल्या साडेतीन वर्षांत नागपूर मध्यवर्ती कारागृहातील ३२ कैद्यांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एकाने आत्महत्या केली आहे.भायखळा कारागृहातील वॉर्डन मंजुळा शेट्येची जेलर मनीषा पोखरकरसहीत सहा जणींनी निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर कारागृह प्रशासनाने आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. याबाबत उच्च न्यायालयाने कारागृह प्रशासनावर ताशेरे ओढले. या हत्येनंतर राज्यातील कैद्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, सोमवारी नागपूरमध्ये कैद्यांच्या आपापसांतील भांडणात आयुषची हत्या झाली. ही हत्या नियोजनबद्ध असल्याचे समजते.धक्कादायक बाब म्हणजे, नागपूर मध्यवर्ती कारागृहातील ३२ कैद्यांचा फेब्रुवारी २०१४ ते ५ जुलै २०१७ दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे.यापैकी २५ कैद्यांच्या मृत्यूबाबतचे गूढ कायम आहे. उर्वरित ७ कैद्यांपैकी रोहित बिंदुसार बनसोड या कैद्याने आत्महत्या केल्याची नोंद आहे. २ सप्टेंबर २०१४ मध्ये त्याने कारागृहात आत्महत्या केली होती, तर दोन कैद्यांच्या नैसर्गिक मृत्यूसह तिघांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याची नोंद कारागृह प्रशासनाच्या दफ्तरी आहे. पुगलियाच्या हत्येनंतर कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.वर्षानुवर्षे आकडा चढाच...नागपूर कारागृहात वर्षानुवर्षे कैद्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे आकडेवारीतून समोर आले. या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांत ३ कैद्यांचा मृत्यू झाला आहे, तर साडेतीन वर्षांपैकी गेल्या वर्षी सर्वाधिक कैद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांना माहिती अधिकारातून मिळाली. नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीत, २०१६ मध्ये १३, २०१५ मध्ये ९, २०१४ मध्ये ७ तर जुलै २०१७ पर्यंत ३ कैद्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.कैद्यांच्या मृत्यूबाबत चौकशी सुरू असल्याने, त्यांचे मृत्यूचे कारण प्रलंबित आहेत. नियमानुसार चौकशी सुरू असून, शवविच्छेदनाच्या अंतिम अहवालानंतर नेमके कारण समजू शकेल, त्यावर आता बोलणे योग्य नाही.- राणी भोसले, अधीक्षक,नागपूर मध्यवर्ती कारागृह 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस