शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

नागपूर कारागृहात साडेतीन वर्षांत एकूण ३२ कैद्यांचा मृत्यू, २५ कैद्यांचा मृत्य संशयास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 04:40 IST

मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणानंतर, नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या आपापसांतील भांडणात, बहुचर्चित कुश कटारिया हत्येचा दोषी आयुष पुगलिया या कैद्याची सोमवारी हत्या झाली. या घटनेमुळे खळबळ उडाली असतानाच, याच कारागृहातील २५ कैद्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली.

- मनीषा म्हात्रे  मुंबई : मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणानंतर, नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या आपापसांतील भांडणात, बहुचर्चित कुश कटारिया हत्येचा दोषी आयुष पुगलिया या कैद्याची सोमवारी हत्या झाली. या घटनेमुळे खळबळ उडाली असतानाच, याच कारागृहातील २५ कैद्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली. गेल्या साडेतीन वर्षांत नागपूर मध्यवर्ती कारागृहातील ३२ कैद्यांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एकाने आत्महत्या केली आहे.भायखळा कारागृहातील वॉर्डन मंजुळा शेट्येची जेलर मनीषा पोखरकरसहीत सहा जणींनी निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर कारागृह प्रशासनाने आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. याबाबत उच्च न्यायालयाने कारागृह प्रशासनावर ताशेरे ओढले. या हत्येनंतर राज्यातील कैद्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, सोमवारी नागपूरमध्ये कैद्यांच्या आपापसांतील भांडणात आयुषची हत्या झाली. ही हत्या नियोजनबद्ध असल्याचे समजते.धक्कादायक बाब म्हणजे, नागपूर मध्यवर्ती कारागृहातील ३२ कैद्यांचा फेब्रुवारी २०१४ ते ५ जुलै २०१७ दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे.यापैकी २५ कैद्यांच्या मृत्यूबाबतचे गूढ कायम आहे. उर्वरित ७ कैद्यांपैकी रोहित बिंदुसार बनसोड या कैद्याने आत्महत्या केल्याची नोंद आहे. २ सप्टेंबर २०१४ मध्ये त्याने कारागृहात आत्महत्या केली होती, तर दोन कैद्यांच्या नैसर्गिक मृत्यूसह तिघांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याची नोंद कारागृह प्रशासनाच्या दफ्तरी आहे. पुगलियाच्या हत्येनंतर कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.वर्षानुवर्षे आकडा चढाच...नागपूर कारागृहात वर्षानुवर्षे कैद्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे आकडेवारीतून समोर आले. या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांत ३ कैद्यांचा मृत्यू झाला आहे, तर साडेतीन वर्षांपैकी गेल्या वर्षी सर्वाधिक कैद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांना माहिती अधिकारातून मिळाली. नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीत, २०१६ मध्ये १३, २०१५ मध्ये ९, २०१४ मध्ये ७ तर जुलै २०१७ पर्यंत ३ कैद्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.कैद्यांच्या मृत्यूबाबत चौकशी सुरू असल्याने, त्यांचे मृत्यूचे कारण प्रलंबित आहेत. नियमानुसार चौकशी सुरू असून, शवविच्छेदनाच्या अंतिम अहवालानंतर नेमके कारण समजू शकेल, त्यावर आता बोलणे योग्य नाही.- राणी भोसले, अधीक्षक,नागपूर मध्यवर्ती कारागृह 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस