शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोलवसुली बेकायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 05:55 IST

Mumbai-Pune Expressway Toll : उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल; प्रवाशांना भूर्दंड पडत असल्याचा मांडला मुद्दा

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेबाबत चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया पार पाडल्याने त्याचा भुर्दंड सामान्य प्रवाशांना भोगावा लागत आहे. प्रकल्पाची रक्कम वसूल न झाल्याने एमएसआरडीसीने आणखी दहा वर्षे प्रवाशांकडून टोलवसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. या टोलवसुलीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करू नये, यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोल वसूल करण्यासंदर्भात एमएसआरडीसीने आयआरबीबरोबर केलेला करार ८ आॅगस्ट २०१९ रोजी संपला आहे. मात्र, अद्याप बेकायदेशीररीत्या टोलवसुली करण्यात येत असल्याचा आरोप ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी जनहित याचिकेत केला आहे.

प्रकल्पाची रक्कम वसूल न झाल्याने एमएसआरडीसीने आणखी दहा वर्षे टोलवसुली करण्याकरिता निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला वाटेगावकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.याचिकेनुसार, कॅगच्या अहवालानुसार एमएसआरडीसी ४,२६६ रुपये ही प्रकल्पाची रक्कम २००४ मध्येच वसूल करू शकले असते. तसेच ८ आॅगस्ट २०१९ पर्यंत आयआरबीही प्रकल्पाची रक्कम पूर्णपणे वसूल करू शकले असते. मात्र, एमएसआरडीसीने निविदा काढताना चुकीची पद्धत अवलंबल्याने प्रकल्पाच्या रकमेचा भार सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

‘एमएसआरडीसीने निविदा प्रक्रियेचा भाग म्हणून २००४ मध्ये आयआरबीकडून ४,२६६ कोटी रुपये घ्यायला हवे होते. त्याऐवजी एमएसआरडीसीने आयआरबीकडून ९१८ कोटी रुपये घेतले. त्याशिवाय राज्य सरकारने एमएसआरडीसीला प्रकल्पाची रक्कम भरून काढण्यासाठी अंदाजे १००० एकर भूखंड दिला. या भूखंडाच्या विक्रीतून किंवा अन्य व्यावसायिक कामासाठी याचा वापर करून एमएसआरडीसीने प्रकल्पाची ४० टक्के रक्कम मिळविणे अपेक्षित होते. मात्र, तसे काही झाले नाही. त्यामुळे प्रकल्पाची रक्कम वसूल करण्यासाठी एमएसआरडीसीने टोलवसुली आणखी दहा वर्षे वाढविण्यासाठी निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अयोग्य आहे. एमएसआरडीसीच्या चुकीच्या निर्णयाचा भुर्दंड सामान्य प्रवाशांनी का सहन करावा?’ असा सवाल याचिकाकर्त्यांनी याचिकेद्वारे उपस्थित केला आहे.

वास्तविकता आयआरबीने प्रकल्पाच्या रकमेपेक्षा अधिक रक्कम टोलवसुलीद्वारे कमविली आहे. त्यामुळे आणखी दहा वर्षांसाठी टोलवसुली करण्याकरिता निविदा काढण्याचा एमएसआरडीसीचा निर्णय बेकायदेशीर ठरवावा. तसेच या याचिकेवरील निर्णय प्रलंबित असेपर्यंत हलक्या वाहनांचा टोल रद्द करावा, अशी अंतरिम मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. जानेवारी महिन्यात या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाकाMumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेHigh Courtउच्च न्यायालय