शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

रावेर, औरंगाबादवरून आघाडीचा तिढा सुटेना, २३ पक्षांच्या महाआघाडीची आज बैठक

By अतुल कुलकर्णी | Updated: March 23, 2019 06:45 IST

भाजपा शिवसेनेच्या विरोधात काँग्रेस, राष्टÑवादीसह २३ पक्षांची महाआघाडी अखेर आकाराला आली असून उद्या त्यांची एकत्रित बैठक दुपारी मुंबईत होत आहे. बैठकीनंतर सर्व २३ पक्षांचे नेते एकत्रीतपणे पत्रकार परिषद घेतील. आपापसातील वाद संपुष्टात आणले गेल्याची माहिती दोन्ही काँग्रेसच्या वतीने दिली गेली आहे.

- अतुल कुलकर्णीमुंबई -  भाजपा शिवसेनेच्या विरोधात काँग्रेस, राष्टÑवादीसह २३ पक्षांची महाआघाडी अखेर आकाराला आली असून उद्या त्यांची एकत्रित बैठक दुपारी मुंबईत होत आहे. बैठकीनंतर सर्व २३ पक्षांचे नेते एकत्रीतपणे पत्रकार परिषद घेतील. आपापसातील वाद संपुष्टात आणले गेल्याची माहिती दोन्ही काँग्रेसच्या वतीने दिली गेली आहे.एकूण ४८ जागांपैकी काँग्रेसने २६ आणि राष्टÑवादीने २२ जागा लढविण्याचा निर्णय झाला व दोघांनी आपापले मित्रपक्ष त्यात सामावून घ्यायचे असे ठरले होते. त्यानुसार राष्टÑवादीने २२ पैकी १८ जागांचे उमेदवार जाहीर केले असून अमरावतीची जागा युवा स्वाभिमान पक्षाच्या रवी राणा यांच्यासाठी आणि हातकणंगलेची दुसरी जागा त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांच्यासाठी सोडली आहे. ठरल्याप्रमाणे माढ्यातून संजय शिंदे यांना तर उस्मानाबादमधून जगजितसिंह राणा यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.उर्वरित रावेर आणि भंडारा-गोंदिया या दोन जागांचे उमेदवार अद्यापही राष्ट्रवादीने जाहीर केलेले नाहीत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आधी ४ जागा मागितल्या होत्या. शेवटी ते दोन जागांवर तयार झाले. त्यांनी ज्या चार जागा मागितल्या होत्या त्यात वर्धा, शिर्डी, सांगली आणि बुलडाण्याचा समावेश होता. मात्र राष्ट्रवादीने त्यांना हातकणंगलेची जागा दिली आणि बुलडाण्यातून माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांचे नावजाहीर केले.तर स्वाभिमानीने मागितलेल्या उर्वरित तीनही जागा काँग्रेसकडे असताना त्यांनी त्यातील वर्धा आणि शिर्डीचे उमेदवार जाहीर केले आहेत. आता काँग्रेस राजू शेट्टी यांना सांगलीची जागा देणार की अन्य दुसरी जागा यावर अजूनही खलबते चालू आहेत.रावेर आणि औरंगाबाद या दोन जागांच्या अदलाबदलीची चर्चा दोन्ही काँग्रेसमध्ये सुरु असून जर औरंगाबादची जागा काँग्रेसने सोडली तर रावेरची जागा राष्टÑवादी काँग्रेसला देईल. अजूनही तोडगा निघालेला नाही. जर काँग्रेसने जागा सोडली तर आनंदच आहे पण नाही सोडली तर आम्ही आघाडी धर्म पाळू असे राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी लोकमतला सांगितले.पालघरची जागा बहुजन विकास आघाडीलाकाँग्रेसने त्यांच्या कोट्यातून पालघरची जागा बहुजन विकास आघाडीसाठी देण्याचे मान्य केले असून तेथून पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे माजी मंत्री व नंतर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेले राजेंद्र गावित हे आता बहुजन विकास आघाडीचे उमेदवार असतील. त्यांच्या नावाची घोषणाही उद्या अपेक्षीत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस