शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संशयाचं वातावरण दूर करण्यासाठी अशोक चव्हाणांनी 'ते' विधान केले; शिंदे गटाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 14:58 IST

सर्व निवडणूकांमध्ये शिवसेना जिंकावी याकरिता फक्त एकनाथ शिंदे यांनी मेहनत घेतली आहे. अशा प्रकारच्या खोट्या वावड्या उठवून काहीही फरक पडणार नाही असं शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणाले.

मुंबई - काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटात काहीच तथ्य नाही. चव्हाणांनी काय आदर्श ठेवलाय हे जनतेसमोर सर्वांना माहिती आहे. ते नाराज असताना युवराजांच्या मागेपुढे करताना पाहिले आहे. मध्यंतरी अशोक चव्हाणकाँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळे संशयाचं वातावरण दूर करण्यासाठी ते अशी विधानं करत असल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. 

नरेश म्हस्के म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष आणि इतर ठिकाणी अशोक चव्हाण मतदानाला आले नाही दरवाजे बंद असल्याचं कारण दिले. यामुळे त्यांच्या विरोधात संशयाचे वातावरण आहे ते दूर करण्याकरता ते असे वक्तव्य करताहेतय अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये राहणार की बाहेर पडणार अशी चर्चा आहे त्यामुळे त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटात काही तथ्य नाही असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत सर्व निवडणूकांमध्ये शिवसेना जिंकावी याकरिता फक्त एकनाथ शिंदे यांनी मेहनत घेतली आहे. अशा प्रकारच्या खोट्या वावड्या उठवून काहीही फरक पडणार नाही. कावळ्याच्या शापाने गाई मरत नसते असं सांगत नरेश म्हस्केर यांनी न्यायालयाच्या निकालावर भाष्य केले. देवीची आम्ही मनोभावे पुजा करतो. देवी कोणाच्या बाजुने आहे हे दोन दिवसांपूर्वी न्यायालयाच्या निकालामुळे स्पष्ट झाले आहे. राजन विचारे म्हणाले की, मी देवीचा खरा भक्त आहे, तर खरा भक्त कोण आहे हे देवी ठरवेल. सगळेच देवीचे भक्त आहेत. देवीचा कौल कोणाला मिळाला यावरुन समजले की, देवीचा खरा भक्त कोण आहे ते असा टोला म्हस्केंनी राजन विचारेंना लगावला आहे. 

काय म्हणाले होते अशोक चव्हाण?भाजपा-शिवसेना युती काळात शिवसेनेने युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी शिष्टमंडळात एकनाथ शिंदेंचाही समावेश होता. शिवसेना नेत्यांनी माझी मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती. भाजपासोबत राहायचे नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. २०१९ च्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतरही शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आली त्यामुळे अनेकांना धक्का बसला परंतु ही भूमिका देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाची होती असा खुलासा त्यांनी केला. तसेच याप्रकारचं सरकार स्थापन करायचं असेल तर तुम्ही आधी पवार साहेबांशी चर्चा करा असं मी शिवसेना नेत्यांना म्हटलं. परंतु ते पवारांना भेटले नाहीत त्यांचे पुढे काय झालं याबाबत माहिती नाही अस अशोक चव्हाणांनी म्हटलं. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस