शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

संशयाचं वातावरण दूर करण्यासाठी अशोक चव्हाणांनी 'ते' विधान केले; शिंदे गटाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 14:58 IST

सर्व निवडणूकांमध्ये शिवसेना जिंकावी याकरिता फक्त एकनाथ शिंदे यांनी मेहनत घेतली आहे. अशा प्रकारच्या खोट्या वावड्या उठवून काहीही फरक पडणार नाही असं शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणाले.

मुंबई - काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटात काहीच तथ्य नाही. चव्हाणांनी काय आदर्श ठेवलाय हे जनतेसमोर सर्वांना माहिती आहे. ते नाराज असताना युवराजांच्या मागेपुढे करताना पाहिले आहे. मध्यंतरी अशोक चव्हाणकाँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळे संशयाचं वातावरण दूर करण्यासाठी ते अशी विधानं करत असल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. 

नरेश म्हस्के म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष आणि इतर ठिकाणी अशोक चव्हाण मतदानाला आले नाही दरवाजे बंद असल्याचं कारण दिले. यामुळे त्यांच्या विरोधात संशयाचे वातावरण आहे ते दूर करण्याकरता ते असे वक्तव्य करताहेतय अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये राहणार की बाहेर पडणार अशी चर्चा आहे त्यामुळे त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटात काही तथ्य नाही असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत सर्व निवडणूकांमध्ये शिवसेना जिंकावी याकरिता फक्त एकनाथ शिंदे यांनी मेहनत घेतली आहे. अशा प्रकारच्या खोट्या वावड्या उठवून काहीही फरक पडणार नाही. कावळ्याच्या शापाने गाई मरत नसते असं सांगत नरेश म्हस्केर यांनी न्यायालयाच्या निकालावर भाष्य केले. देवीची आम्ही मनोभावे पुजा करतो. देवी कोणाच्या बाजुने आहे हे दोन दिवसांपूर्वी न्यायालयाच्या निकालामुळे स्पष्ट झाले आहे. राजन विचारे म्हणाले की, मी देवीचा खरा भक्त आहे, तर खरा भक्त कोण आहे हे देवी ठरवेल. सगळेच देवीचे भक्त आहेत. देवीचा कौल कोणाला मिळाला यावरुन समजले की, देवीचा खरा भक्त कोण आहे ते असा टोला म्हस्केंनी राजन विचारेंना लगावला आहे. 

काय म्हणाले होते अशोक चव्हाण?भाजपा-शिवसेना युती काळात शिवसेनेने युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी शिष्टमंडळात एकनाथ शिंदेंचाही समावेश होता. शिवसेना नेत्यांनी माझी मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती. भाजपासोबत राहायचे नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. २०१९ च्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतरही शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आली त्यामुळे अनेकांना धक्का बसला परंतु ही भूमिका देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाची होती असा खुलासा त्यांनी केला. तसेच याप्रकारचं सरकार स्थापन करायचं असेल तर तुम्ही आधी पवार साहेबांशी चर्चा करा असं मी शिवसेना नेत्यांना म्हटलं. परंतु ते पवारांना भेटले नाहीत त्यांचे पुढे काय झालं याबाबत माहिती नाही अस अशोक चव्हाणांनी म्हटलं. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस