शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

आंबेगावमध्ये रंगणार 'टाईट फाईट'; वळसे पाटील-आढळराव आमने-सामने ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 11:42 IST

लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांना आंबेगाव मतदार संघातून आघाडी मिळाली आहे. कोल्हे यांना या मतदार संघातून एक लाख ७ हजार ७८१ मते मिळाली. तर आढळरावांना ८२ हजार ८४ मते मिळाली. परंतु, आता खुद्द आढळराव किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कुणीतरी या मतदार संघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील पराभूत झालेल्या सर्व पक्षातील उमेदवारांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दिल्ली नाही किमान मुंबई तरी गाठू अशी इच्छा मनी बाळगून या उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. यामध्ये शिवसेनेचे पराभूत उमेदवार आघाडीवर दिसत आहेत. औरंगाबाद माजी खासदार चंद्रकात खैरे यांच्या पाठोपाठ शिरुर मतदार संघातील शिवसेनेचे पराभूत उमेदवार शिवाजाराव आढळराव पाटीलही तयारीला लागल्याची चर्चा आंबेगाव मतदार संघात सुरू आहे.

शिरूर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या शिवाजीराव आढळरावांचा विजयरथ रोखला. राष्ट्रवादीने ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोल्हे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवून मोठी खेळी केली. त्याला अपेक्षेप्रमाणे यशही आलं आहे. त्यामुळे मागील कित्येक वर्षांपासून शिरूर मतदार संघ जिंकण्याचा राष्ट्रवादीचा मनसूबा सिद्ध झाला. आता तोच मनसुबा शिवसेनेने विधानसभा निवडणुकीला समोर ठेवला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दिल्ली दूर झाली तरी मुंबई जवळ करायची तयारी आढळराव पाटलांची सुरू असल्याची चर्चा आंबेगाव मतदार संघात सुरू आहे. त्यातच आढळराव आंबेगावचे भूमिपुत्र. मात्र विधानसभा मतदार संघ शिवसेनेला मिळवून देण्यात आढळराव यांना कधीही यश आले नाही. याउलट राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील यांनी मागील २९ वर्षांपासून या मतदार संघावर एकछत्री अंमल राखले आहे. मागील तीन लोकसभा निवडणुकीत आंबेगाव मतदार संघातून शिवसेनेला आघाडी मिळत आली आहे. त्याचे कारण म्हणजे, आढळराव आंबेगावचे भूमिपुत्र होते. तसेच वळसे पाटील आणि आढळराव यांच्यात सोटंलोट असल्याचं बोलल जात होतं. परंतु, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत साटलोट्याच्या शक्यतेला पूर्णविराम मिळाला आहे.

लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांना आंबेगाव मतदार संघातून आघाडी मिळाली आहे. कोल्हे यांना या मतदार संघातून एक लाख ७ हजार ७८१ मते मिळाली. तर आढळरावांना ८२ हजार ८४ मते मिळाली. परंतु, आता खुद्द आढळराव किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कुणीतरी या मतदार संघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

याआधी आढळराव यांच्या पत्नी कल्पना यांनी येथून निवडणूक लढविली आहे. तर पुत्र अक्षय यांच्या नावाचीही चर्चा जोरात आहे. परंतु, आढळराव लोकसभेत नसल्याने ते विधानसभेत जाण्यासाठी प्रयत्नशील असण्याची शक्यता आहे. तस झाल्यास, आंबेगामध्ये आढळराव आणि वळसे पाटील यांच्यात 'टाईट फाईट' होणार हे निश्चित.