शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आंबेगावमध्ये रंगणार 'टाईट फाईट'; वळसे पाटील-आढळराव आमने-सामने ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 11:42 IST

लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांना आंबेगाव मतदार संघातून आघाडी मिळाली आहे. कोल्हे यांना या मतदार संघातून एक लाख ७ हजार ७८१ मते मिळाली. तर आढळरावांना ८२ हजार ८४ मते मिळाली. परंतु, आता खुद्द आढळराव किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कुणीतरी या मतदार संघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील पराभूत झालेल्या सर्व पक्षातील उमेदवारांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दिल्ली नाही किमान मुंबई तरी गाठू अशी इच्छा मनी बाळगून या उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. यामध्ये शिवसेनेचे पराभूत उमेदवार आघाडीवर दिसत आहेत. औरंगाबाद माजी खासदार चंद्रकात खैरे यांच्या पाठोपाठ शिरुर मतदार संघातील शिवसेनेचे पराभूत उमेदवार शिवाजाराव आढळराव पाटीलही तयारीला लागल्याची चर्चा आंबेगाव मतदार संघात सुरू आहे.

शिरूर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या शिवाजीराव आढळरावांचा विजयरथ रोखला. राष्ट्रवादीने ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोल्हे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवून मोठी खेळी केली. त्याला अपेक्षेप्रमाणे यशही आलं आहे. त्यामुळे मागील कित्येक वर्षांपासून शिरूर मतदार संघ जिंकण्याचा राष्ट्रवादीचा मनसूबा सिद्ध झाला. आता तोच मनसुबा शिवसेनेने विधानसभा निवडणुकीला समोर ठेवला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दिल्ली दूर झाली तरी मुंबई जवळ करायची तयारी आढळराव पाटलांची सुरू असल्याची चर्चा आंबेगाव मतदार संघात सुरू आहे. त्यातच आढळराव आंबेगावचे भूमिपुत्र. मात्र विधानसभा मतदार संघ शिवसेनेला मिळवून देण्यात आढळराव यांना कधीही यश आले नाही. याउलट राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील यांनी मागील २९ वर्षांपासून या मतदार संघावर एकछत्री अंमल राखले आहे. मागील तीन लोकसभा निवडणुकीत आंबेगाव मतदार संघातून शिवसेनेला आघाडी मिळत आली आहे. त्याचे कारण म्हणजे, आढळराव आंबेगावचे भूमिपुत्र होते. तसेच वळसे पाटील आणि आढळराव यांच्यात सोटंलोट असल्याचं बोलल जात होतं. परंतु, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत साटलोट्याच्या शक्यतेला पूर्णविराम मिळाला आहे.

लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांना आंबेगाव मतदार संघातून आघाडी मिळाली आहे. कोल्हे यांना या मतदार संघातून एक लाख ७ हजार ७८१ मते मिळाली. तर आढळरावांना ८२ हजार ८४ मते मिळाली. परंतु, आता खुद्द आढळराव किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कुणीतरी या मतदार संघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

याआधी आढळराव यांच्या पत्नी कल्पना यांनी येथून निवडणूक लढविली आहे. तर पुत्र अक्षय यांच्या नावाचीही चर्चा जोरात आहे. परंतु, आढळराव लोकसभेत नसल्याने ते विधानसभेत जाण्यासाठी प्रयत्नशील असण्याची शक्यता आहे. तस झाल्यास, आंबेगामध्ये आढळराव आणि वळसे पाटील यांच्यात 'टाईट फाईट' होणार हे निश्चित.