शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेमणुकांत कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 06:18 IST

महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख सतीश माथूर येत्या ३० जूनला सेवानिवृत्त होत आहेत. नव्या पोलीस महासंचालकांसह राज्यातील प्रमुख पाच आयुक्तालयांच्या बदल्या त्याच सुमारास होण्याची चिन्हे आहेत

जमीर काझीमुंबई : महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख सतीश माथूर येत्या ३० जूनला सेवानिवृत्त होत आहेत. नव्या पोलीस महासंचालकांसह राज्यातील प्रमुख पाच आयुक्तालयांच्या बदल्या त्याच सुमारास होण्याची चिन्हे आहेत. त्याबाबत प्रचंड उत्सुकता लागून राहिली असून त्या करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कस लागणार आहे. तसेच गेल्या तब्बल २३ महिन्यांपासून रिक्त असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यंदा तरी प्रमुख मिळणार का, याचे उत्तरही यातून मिळेल.मुंबईच्या आयुक्तपदासाठी महाराष्टÑ सुरक्षा महामंडळाचे संचालक संजय बर्वे व ठाण्याचे आयुक्त परमबीर सिंग यांच्यात चढाओढ आहे. केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या सुबोध जयस्वाल यांची राज्यात परतण्याची अद्याप निश्चिती झालेली नाही. ही नियुक्ती करताना सेवाज्येष्ठतेचा निकष गृह विभागाकडून काहीसा बाजूला पडण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी होणाºया लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिवरिष्ठ पदाच्या नियुक्तीला असाधारण महत्त्व आले आहे. बºयाच वेळ लांबविलेल्या या नेमणुका मुख्यमंत्र्यांना आता कराव्याच लागणार आहेत. ठाणे, पुणे, नवी मुंबई, नागपूरसह एटीएस व एसीबीच्या प्रमुखपदांच्या निवडी यंदा अपेक्षित आहेत.अतिवरिष्ठ अधिकाºयांच्या फेरबदलांत अनेक गुंतागुंतीचे कंगोरे निर्माण झाल्याचे सांगितले जाते. माथूर यांच्यानंतर सेवा ज्येष्ठतेमध्ये दुसºया स्थानी असलेले मुंबईचे आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची ‘डीजीपी’ पदावर निवड होणे अपेक्षित आहे. मात्र ते आॅगस्ट अखेरीस निवृत्त होत असल्याने केवळ दोन महिन्यांसाठी ते डीजीपी बनण्यास इच्छुक नाहीत. मात्र त्यांची नेमणूक करताना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली गेली तर काही जण त्याविरुद्ध न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याने सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.पडसलगीकर यांच्यानंतर ज्येष्ठतेमध्ये असलेले १९८५च्या बॅचचे आयपीएस जयस्वाल सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यांना परत राज्यात बोलावून मुंबईच्या आयुक्तपदी किंवा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीचा विचार सुरू आहे. मात्र जयस्वाल त्यासाठी उत्सुक नसल्याचे सांगितले जाते. त्यांच्यानंतरचे ‘एफएसएल’चे महासंचालक एस. पी. यादव हे सप्टेंबर अखेरीस निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांची या पदावर नियुक्ती होणे अपेक्षित नाही. त्यांच्यानंतर ज्येष्ठ असलेले ‘होमगार्ड’चे संजय पांडे यांची सेवा चार वर्षे शिल्लक आहे. मात्र त्यांची रोखठोक कार्यपद्धती सत्ताधाºयांना परवडणारी नाही. शिवाय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अद्याप त्यांना डीजीपदाची ‘डीम्ड डेट’ न दिल्याने ते पुन्हा याचिका दाखल करण्याच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे त्यांच्यानंतर ज्येष्ठ असलेले संजय बर्वे हे पडसलगीकर यांचे उत्तराधिकारी बनू शकतात. ते पुढच्या वर्षी आॅगस्टमध्ये निवृत्त होणार असल्याने त्यांना १४ महिन्यांचा कालावधी मिळू शकेल. वादग्रस्त आदर्श सोसायटीत वडिलांच्या नावे असलेली सदनिका हीच केवळ त्यांच्या विरोधातील बाब आहे. मात्र सीबीआयकडून क्लीन चिट मिळाल्याने त्यांच्या नियुक्तीला कोणाचीही हरकत असणार नाही.गेल्या सव्वातीन वर्षांपासून अधिक काळ ठाण्याच्या आयुक्तपदावर कार्यरत असलेल्या परमबीर सिंग हेही आयुक्तपदाच्या शर्यतीत आहेत. एस. पी. यादव सप्टेंबरमध्ये निवृत्त झाल्यानंतर ते महासंचालक पदासाठी पात्र ठरतील. मात्र सरकारला त्यांची निवड करावयाची असल्यास आयुक्तपद काही काळ ‘डाऊनग्रेड’ केले जाऊ शकते. परंतु त्यामुळे सरकारला टीकेला सामोरे जावे लागण्याची शक्यता अधिक आहे.‘एसीबी’ला प्रमुख मिळणार का?लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) महासंचालक पद ३१ जुलै २०१६ पासून रिक्त असून त्याचा अतिरिक्त कार्यभार अप्पर महासंचालक विवेक फणसाळकर यांच्याकडे आहे. त्यांनी ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली असली तरी पारदर्शी कारभाराची ग्वाही देणारे मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे महत्त्वाचे पद जवळपास २३ महिने का रिक्त ठेवले? त्यासाठी दुसरे सक्षम अधिकारी नाहीत का, असा सवाल वरिष्ठ अधिकारी उपस्थित करत आहेत.या वर्षी केवळ उपमहानिरीक्षक व महानिरीक्षक पदाच्या बढत्या करण्यात आल्या आहेत. अप्पर आयुक्त/ उपमहानिरीक्षकाची जवळपास १२ पदे रिक्त आहेत. त्यासाठी अधीक्षक/उपायुक्त पदोन्नतीसाठी सहा महिन्यांपासून अधिकारी प्रतीक्षेत आहेत. डीआयजी पदासाठी बी. जी. गायकर, एस.बी. फुलारी, कोल्हापूरचे अधीक्षक संजय मोहिते, जळगावचे अधीक्षक दत्ता कराळे, सुप्रिया यादव, प्रवीण पवार, डॉ. बी.जी. शेखर, डॉ. प्रभाकर बुधवंत आदींचा समावेश आहे. पैकी बुधवंत हे ३० जूनला निवृत्त होत आहेत. त्यामुळे निवृत्तीपूर्वी काही दिवस तरी त्यांना पदोन्नती मिळणार का? हा प्रश्न अनुत्तरित आहे.