२३ दिवसांत भागवली १०० गावांची तहान

By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:05+5:302016-06-07T07:43:05+5:30

रिलायन्स फाउंडेशनने एक महिन्यापूर्वी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्याची मोहीम सुरू केली

Thrown in 100 days in the past 23 days | २३ दिवसांत भागवली १०० गावांची तहान

२३ दिवसांत भागवली १०० गावांची तहान


मुंबई : रिलायन्स फाउंडेशनने एक महिन्यापूर्वी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्याची मोहीम सुरू केली. लातूर, हिंगोली, जालना आणि नांदेड या चार जिल्ह्यांमधील १०० दुष्काळग्रस्त गावांची माहिती झाल्यानंतर, फाउंडेशनने ही मोहीम राबविण्यास सुरुवात केली.
अवघ्या २३ दिवसांत ‘मिशन राहत’ राबवून १००हून अधिक गावांना दर दिवशी दोन ते चार टँकरने पाणी पुरविले. आतापर्यंत या गावांमधील दोन लाख दुष्काळग्रस्त नागरिकांना २० दक्षलक्ष लीटर्सहून अधिक पाण्याचा पुरवठा केला आहे. रिलायन्स फाउंडेशनने सरकारी संस्थांच्या साह्याने मराठवाड्यांतील चार जिल्ह्यांत सर्वांत जास्त दुष्काळग्रस्त गावे शोधून काढली. फाउंडेशनच्या चमूने या ठिकाणी पाणीपुरवठा करण्याची साधने घेऊन गावकऱ्यांना मदत केली.

Web Title: Thrown in 100 days in the past 23 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.