जलवाहिनीसाठी केली तीनशे झाडांची कत्तल
By Admin | Updated: July 10, 2014 23:18 IST2014-07-10T23:18:42+5:302014-07-10T23:18:42+5:30
तीन वर्षापासून जगविलेल्या तिनशे झाडांवर जे.सी.बी. चालून झाडे बुडा सोबत उखडून पाडले.

जलवाहिनीसाठी केली तीनशे झाडांची कत्तल
सोनाळा : येथील सोनाळा-बोरखेड रस्त्याच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण विभागाने हजारो रुपये खर्च करुन तीन वर्षापासून जगविलेल्या तिनशे झाडांवर जे.सी.बी. चालून झाडे बुडा सोबत उखडून पाडले. याबाबतची तक्रार बोरखेड वासीयांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे बुधवारी केली असून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
सोनाळा ते बोरखेड रोडलगत सामाजिक वनीकरण विभाग जळगाव जामोदने गत ३ वर्षापूर्वी वृक्षांची लागवड केली आहे. तर या झाडांची जोपासणा करुन ही झाडे जगविली आहेत. मात्र १४१ गाव वानपाणी पुरवठा योजने अंतर्गत बोरखेड गावाला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईनचे काम सुरु असून १५ दिवसांपूर्वी जे.सी.पी. क्र.एम.एच.४१ डि. ७१७१ च्या चालकाने डाब्या बाजुने असलेल्या वृक्षांच्या दोन रांगामधून जेसीबीने पाईपलाईनसाठी मोठी चर खोदली. यामुळे वृक्षारोपण केलेली सुमारे ३00 चे वर पाच ते आठ फुटाची झाडे बुंध्यासह उखडली.
बोरखेडवासीयांनी संबंधीत ठेकेदाराला वृक्षांच्या बाजूला अंतर सोडून पाईपलाईन खोदण्याचे सांगीतले असताना हेकेखोरपणे चक्क १५ दिवस काम बंद ठेवले होते. अखेर ७ जुलै रोजी पुन्हा ठेकेदाराने जेसीपी एम.एच.४१ डी. ७१७१ ने रस्त्यावर खोदाई काम सुरु केले. यामध्ये ३00 च्यावर झाडे बुथ्यासोबत उखडून पडली.सामाजिक वनीकरण विभागाने रस्त्यावरील वृक्षाचे रक्षणाकरिता एका मजुराची नेमणूक केली होती. त्याच्या समक्ष वृक्षांची कत्तल होत असतानाही सामाजिक वनीकरण विभागाकडून अद्यापही दखल घेतल्या गेली नाही. गेल्या तीन वर्षापासून दररोज १0 मजुर १६८ रु. रोजंदारीने या वृक्षांना पाणी देण्याचे काम करीत आहेत.मात्र पाईपलाईनसाठी वृक्षांची कत्तल झाल्याने शासनाच्या हजारो रुपयावर पाणी फेरले गेले असून वृक्षारोपणाचा उद्देशही साध्य झाला नाही. याबाबत सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकार्यांकडे चौकशीसाठी भ्रमणध्वनी केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे वृक्ष कत्तलीसाठी सामाजिक वनीकरण विभागाने तर छुपी परवानगी दिली नाही ना, अशी शंका नागरिकांकडून उपस्थित होत आहे. तेव्हा वृक्षांची कत्तल करणार्या संबंधित ठेकेदार व सामाजिक वनीकरण विभागाच्या कर्मचार्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी याबाबत दिलेल्या निवेदनावर संतोष आगलावे, यशवंत घाटे, मोहन बारब्दे, सिध्दार्थ घाटे, दीपक बाराब्दे, श्रीकृष्ण आगलावे, किसन बारब्दे आदींसह दोनशे गावकर्यांच्या सह्या आहेत.