शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पालघरमधील तिघांचा गुजरातमध्ये अपघातात मृत्यू; अन्य चौघे जखमी; कारचा चक्काचूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 08:52 IST

अजमेर शरीफ दर्ग्याचे दर्शन करून घरी पालघरकडे परतताना अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर : राजस्थानातील अजमेर शरीफ दर्ग्याचे दर्शन करून घरी पालघरकडे परतीच्या प्रवासाला निघालेल्या तरुणांच्या कारचा गुजरातमधील अंकलेश्वर जवळील बाकरोल  पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातात पालघरमधील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार तरुण जखमी झाले आहेत.

देशभरातील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याचा उरूस (यात्रा) सुरू असून दर्शन घेऊन पालघर तालुक्यातील सात तरुण परत आपल्या घराकडे येण्यासाठी निघाले होते. गुजरातमधील अंकलेश्वर येथील बाकरोल पुलावर बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास कार पुढे जात असलेल्या ट्रकवर आदळली. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या अवजड वाहनाने त्यांना ठोकर मारली.

या अपघातात आयान बाबा चौगुले (रा. मनोर), मुदस्सर अन्सार पटेल (रा. मनोर, टाकवहाळ) ताहीर नासीर शेख (रा. पालघर) या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर  सलमान अल्ताफ शेख, शाहरुख सलीम शेख, शादाब मलिक शेख आणि मोईन सलीम शेख (सर्व रा. काटाळे) गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर भरूच परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

टॅग्स :palgharपालघरAccidentअपघात