बुलडाणा जिल्ह्यात तीन शेतकरी आत्महत्या
By Admin | Updated: August 21, 2015 00:01 IST2015-08-21T00:01:16+5:302015-08-21T00:01:16+5:30
सततची नापिकी व कर्जाला कंटाळून जिल्ह्यातील तीन शेतक-यांनी आत्महत्या केली.

बुलडाणा जिल्ह्यात तीन शेतकरी आत्महत्या
बुलडाणा: सततची नापिकी व कर्जाला कंटाळून जिल्ह्यातील तीन शेतकर्यांनी आत्महत्या केली. मलकापूर तालुक्यातील घिर्णी येथील ६0 वर्षीय शेतकर्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी घडली. ओंकार त्र्यंबक चव्हाण यांच्याकडे पाच एकर शेती असून त्यांच्याकडे सेंट्रल बँकेचे ५0 हजार रूपयांचे कर्ज आहे. गेल्या २ ते ३ वर्षापासून शेतात उत्पन्नच होत नसल्याने व्यथीत होत अखेर गुरूवारी सकाळी ओंकार चव्हाण यांनी स्वत:च्या शेतात विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. दुसर्याघटनेत मेहकर तालुक्यातील सुकळी येथील एका ४५ वर्षीय शेतकर्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना १९ ऑगस्ट रोजी घडली. ब्रम्हदेव तुकाराम नवले या शेतकर्याकडे अडीच एकर शेती आहे. तसेच भारतीय स्टेट बँक मेहकर शाखेचे ५0 हजार रुपये कर्जही आहे. पावसाच्या लहरीपणामुळे दरवर्षी त्याला शेतीच्या उत्पन्नात फटका बसत गेला. आर्थिक परिस्थितीने त्रस्त होऊन ब्रम्हदेव नवले याने राहत्या घरात छताला गळफास लावून आत्महत्या केली. यासंदर्भात मेहकर पोलिसांनी आक स्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तिसर्या घटनेत सिंदखेड तालुक्यातील कर्जबाजारी शेतकरी नरहरी नामदेव गाढवे याने १५ ऑगस्ट रोजी विषारी द्रव्य प्राशन केले होते; त्याचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान १८ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला.