शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

दिब्रिटो यांच्या निवडीवरून साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांसह मसापच्या कार्याध्यक्षांना धमक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 17:26 IST

संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोधाची भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्दे संमेलनापूवीर्ची वादाची किनार

पुणे : 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीवरून साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना धमक्या दिल्या जात आहेत. एका धर्मगुरू ला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करून तुम्ही समजता कोण स्वत:ला? तुम्ही चांगले केले नाहीत. तुम्ही खूप मोठी चूक केली असल्याचे सुनावले जात आहे. संमेलनापूर्वीच संमेलनाध्यक्षपदाच्या निवडीवरून वाद चिघळायला सुरूवात झाली आहे.

संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. समाजातूनही साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेवर टीकेची झोड उठत आहे. मात्र आता  महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना धमक्या देणा-यापर्यंत विरोधकांची मजल पोहोचली आहे. यासंदर्भात ह्यलोकमतह्णह्णशी बोलताना साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील म्हणाले, ह्यफादरह्ण यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून हटवा अशा आशयाचे  ठाणे, मुंबई, नागपूर अशा विविध ठिकाणाहून जवळपास 100 दूरध्वनी आले आहेत. त्यांना ती व्यक्ती मातृभाषेत साहित्य लेखन करते किंवा ते लेखक आहेत याविषयी काहीदेणे घेणे नाही. त्यांचे दुखणे हे केवळ धार्मिक आहे. फक्त दिब्रिटो यांची निवड का केली?असा सवाल केला जात आहे. केवळ ते ख्रिश्चन असल्यानं विरोध केला जातोय. दरम्यान, अशाप्रकारच्या धमक्या येत असण्याला मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनीही दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, काही लोक वैयक्तिक आणि परिषदेतही फोन करून अत्यंत अर्वाच्य भाषेत व उर्मटपणे  'तुम्ही स्वत:ला काय समजता? तुम्हाला संमेलनासाठी काय परदेशातून पैसा आला का? ' अशी दमदाटी करीत आहेत. तरीही आम्ही सौम्यपणे ते फोन स्वीकारत आहोत. व्यक्त होण्याची एक भाषा असते. त्या सीमा ओलांडल्या जात आहेत, याचे दु:ख होत आहे.----------------------------------------------------------------------------------------------साहित्य संमेलन निधर्मी असते. अध्यक्ष निवडताना कधीच धमार्चा विचार केला जात नाही. भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिला आहे. धमक्याबद्दल आम्ही तक्रार करणार नाही. आमची काळजी सरकार व गृहमंत्री घेतील. पदाधिका-यांना आलेल्या धमक्याचा प्रकार त्यांना कळला आहे. लोकशाहीत निवड प्रक्रियेला महत्त्व आहे. त्यामुळे एकदा निवड झाल्यानंतर ती मागे घेता येत नाही.- प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष, साहित्य महामंडळ 

टॅग्स :PuneपुणेMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनHindutvaहिंदुत्व