शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

दिब्रिटो यांच्या निवडीवरून साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांसह मसापच्या कार्याध्यक्षांना धमक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 17:26 IST

संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोधाची भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्दे संमेलनापूवीर्ची वादाची किनार

पुणे : 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीवरून साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना धमक्या दिल्या जात आहेत. एका धर्मगुरू ला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करून तुम्ही समजता कोण स्वत:ला? तुम्ही चांगले केले नाहीत. तुम्ही खूप मोठी चूक केली असल्याचे सुनावले जात आहे. संमेलनापूर्वीच संमेलनाध्यक्षपदाच्या निवडीवरून वाद चिघळायला सुरूवात झाली आहे.

संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. समाजातूनही साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेवर टीकेची झोड उठत आहे. मात्र आता  महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना धमक्या देणा-यापर्यंत विरोधकांची मजल पोहोचली आहे. यासंदर्भात ह्यलोकमतह्णह्णशी बोलताना साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील म्हणाले, ह्यफादरह्ण यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून हटवा अशा आशयाचे  ठाणे, मुंबई, नागपूर अशा विविध ठिकाणाहून जवळपास 100 दूरध्वनी आले आहेत. त्यांना ती व्यक्ती मातृभाषेत साहित्य लेखन करते किंवा ते लेखक आहेत याविषयी काहीदेणे घेणे नाही. त्यांचे दुखणे हे केवळ धार्मिक आहे. फक्त दिब्रिटो यांची निवड का केली?असा सवाल केला जात आहे. केवळ ते ख्रिश्चन असल्यानं विरोध केला जातोय. दरम्यान, अशाप्रकारच्या धमक्या येत असण्याला मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनीही दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, काही लोक वैयक्तिक आणि परिषदेतही फोन करून अत्यंत अर्वाच्य भाषेत व उर्मटपणे  'तुम्ही स्वत:ला काय समजता? तुम्हाला संमेलनासाठी काय परदेशातून पैसा आला का? ' अशी दमदाटी करीत आहेत. तरीही आम्ही सौम्यपणे ते फोन स्वीकारत आहोत. व्यक्त होण्याची एक भाषा असते. त्या सीमा ओलांडल्या जात आहेत, याचे दु:ख होत आहे.----------------------------------------------------------------------------------------------साहित्य संमेलन निधर्मी असते. अध्यक्ष निवडताना कधीच धमार्चा विचार केला जात नाही. भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिला आहे. धमक्याबद्दल आम्ही तक्रार करणार नाही. आमची काळजी सरकार व गृहमंत्री घेतील. पदाधिका-यांना आलेल्या धमक्याचा प्रकार त्यांना कळला आहे. लोकशाहीत निवड प्रक्रियेला महत्त्व आहे. त्यामुळे एकदा निवड झाल्यानंतर ती मागे घेता येत नाही.- प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष, साहित्य महामंडळ 

टॅग्स :PuneपुणेMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनHindutvaहिंदुत्व