शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

Maharashtra Election 2019; सरकारच्या नाकर्तेपणामुळे १६ हजार आयाबहिणी विधवा झाल्या - अजित पवार

By appasaheb.patil | Updated: October 17, 2019 13:20 IST

मंगळवेढा येथील जाहीर सभेत भाजप सरकारवर केली जोरदार टीका

ठळक मुद्दे- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर दौºयावर- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा- जाहीर सभेतील भाषणातून भाजप-शिवसेना सरकारवर केली जोरदार टीका

सोलापूर/ मंगळवेढा : भाजप सरकारने मागील पाच वर्षात फक्त आश्वासनांची घोषणाबाजी केली. दुष्काळाचा सामना करणाºयांना शेतकºयांना दिलासा देण्याऐवजी सत्तेचा गैरवापर करीत शेतकरीविरोधी धोरण अवलंबिले. शेतीच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकºयांवरील कर्जाचा डोंगर वाढला. त्याच नैराश्येतून राज्यातील १६ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे राज्यातील १६ हजार आयाबहिनी विधवा झाल्याची खंत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा येथे आयोजित राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, पाच वर्षात सरकारनं शेतकºयांना मातीत घालण्याचे काम केले़ शेतकºयांना दिलासा देण्याऐवजी पाकिस्तानमधून साखर, कांदा आयात करण्यात सरकार व्यस्त आहे. कर्जमाफी कशी करायची ते माझ्या काकांना विचारा असा सल्लाही अजित पवार यांनी भाजप सरकारला दिला.

मागील पाच वर्षापुर्वी सत्तेत येण्याअगोदर २ कोटी बेरोजगारांना नोकरी देऊ म्हणणाºयांनी या पाच वर्षात आहे त्या युवकांच्या नोकºया घालविल्या़ नोटबंदीने व्यापाºयांना देशोधडीला लावले़ केवळ आश्वासनांचा पाऊस पाडून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम भाजप-शिवसेनेच्या सरकारनं या पाच वर्षात केले़ त्यामुळे भाजप सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीला साथ देण्याचे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.

टॅग्स :SolapurसोलापूरAjit Pawarअजित पवारpandharpur-acपंढरपूरBJPभाजपा