शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

मोदी सरकारवर शंभर कोटी हिंदूंतर्फे फसवणुकीचा, अब्रुनुकसानीचा गुन्हाच दाखल व्हायला हवा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 8, 2017 07:30 IST

देश हिंदुत्ववाद्यांनी खुर्च्या उबवूनही निधर्मीवादाचा गुलामच राहणार असेल तर साबरमती एक्प्रेसमधील रामसेवकांच्या बलिदानाला अर्थ उरणार नाही.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 8 - देश हिंदुत्ववाद्यांनी खुर्च्या उबवूनही निधर्मीवादाचा गुलामच राहणार असेल तर साबरमती एक्प्रेसमधील रामसेवकांच्या बलिदानाला अर्थ उरणार नाही. ‘‘गर्व से कहो हम हिंदू है’वाल्यांचे राज्य सध्या देशात आले आहे’’ हे जगाला ओरडून सांगण्याची हीच वेळ असताना आम्ही अचानक ‘सेक्युलर’ कसे झालो? या सरकारवर शंभर कोटी हिंदूंतर्फे फसवणुकीचा, अब्रुनुकसानीचा गुन्हाच दाखल व्हायला हवा! अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरुन केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. 
 
नरेंद्र मोदी सरकारने युनोमध्ये मांडलेली धर्मनिरपेक्षतेची भूमिका शिवसेनेला अजिबात पटलेली नाही. त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून आपल्याच सरकारवर जळजळीत टीकास्त्र सोडले आहे. हिंदूंना या जगात स्वतःची म्हणून इंचभर जमीन तरी मिळणार आहे काय? देशात हिंदुत्ववादी नरेंद्र मोदी यांची राजवट आल्यावर जगभरातील हिंदू समाजाने जल्लोष केला, पण आता मोदी सरकारने ‘युनो’त जाऊन जाहीर केले आहे, ‘‘आम्ही निधर्मी आहोत. देश धर्मनिरपेक्ष आहे!’’ हे धक्कादायक आहे. वास्तविक हिंदुराष्ट्र संकल्पनेसाठी लाखो हिंदू स्वयंसेवकांनी आतापर्यंत बलिदान दिले आहे. देशाचा सत्यानाश ‘सेक्युलर’ म्हणजे निधर्मी शब्दाने केल्याचे खापर आपण नेहमीच नेहरूंच्या टाळक्यावर फोडत राहिलो. या देशात ‘धर्मनिरपेक्ष’ ही शिवी झाली असून समस्त हिंदूंची पीछेहाट व्हावी यासाठीच तुमच्या त्या सेक्युलरवादाचे हत्यार वापरण्यात आले असे अग्रलेखात म्हटले आहे.  
 
पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही येथे जे दोनेक कोटी मुसलमान राहिले त्यांच्या लांगूलचालनासाठी आपण स्वतःला ‘निधर्मी’ म्हणण्यातच धन्यता मानली. त्यांच्या दोन कोटींचे आज बावीस कोटी झाले व ते २२ कोटी धर्माच्या नावावर आपल्याला भारी पडत असतानाही आपण सेक्युलरवादाची बांग देत शेपूट घालणार असू तर हा देश रामाचा, कृष्णाचा आणि सोमनाथाचा उरणार नाही असे उद्धव यांनी म्हटले आहे. 
 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
 
- ज्यांच्याकडून निधर्मी हिंदुस्थानचे हिंदुराष्ट्र करण्याची अपेक्षा होती त्यांनी ‘युनो’त हिंदुस्थान निधर्मी असल्याची बांग दिली. हा देश हिंदुत्ववाद्यांनी खुर्च्या उबवूनही निधर्मीवादाचा गुलामच राहणार असेल तर साबरमती एक्प्रेसमधील रामसेवकांच्या बलिदानाला अर्थ उरणार नाही. ‘‘गर्व से कहो हम हिंदू है’वाल्यांचे राज्य सध्या देशात आले आहे’’ हे जगाला ओरडून सांगण्याची हीच वेळ असताना आम्ही अचानक ‘सेक्युलर’ कसे झालो? या सरकारवर शंभर कोटी हिंदूंतर्फे फसवणुकीचा, अब्रुनुकसानीचा गुन्हाच दाखल व्हायला हवा!
 
 
- हिंदूंना या जगात स्वतःची म्हणून इंचभर जमीन तरी मिळणार आहे काय? देशात हिंदुत्ववादी नरेंद्र मोदी यांची राजवट आल्यावर जगभरातील हिंदू समाजाने जल्लोष केला, पण आता मोदी सरकारने ‘युनो’त जाऊन जाहीर केले आहे, ‘‘आम्ही निधर्मी आहोत. देश धर्मनिरपेक्ष आहे!’’ हे धक्कादायक आहे. वास्तविक हिंदुराष्ट्र संकल्पनेसाठी लाखो हिंदू स्वयंसेवकांनी आतापर्यंत बलिदान दिले आहे. देशाचा सत्यानाश ‘सेक्युलर’ म्हणजे निधर्मी शब्दाने केल्याचे खापर आपण नेहमीच नेहरूंच्या टाळक्यावर फोडत राहिलो. या देशात ‘धर्मनिरपेक्ष’ ही शिवी झाली असून समस्त हिंदूंची पीछेहाट व्हावी यासाठीच तुमच्या त्या सेक्युलरवादाचे हत्यार वापरण्यात आले. 
 
 
- त्यामुळे दिल्लीत हिंदुत्ववाद्यांचे राज्य आल्याने सेक्युलरवादाचे दफन होईल अशी खात्रीच हिंदूंना होती, पण आपण आता ‘युनो’त जाऊन सांगितले आहे की, ‘‘हिंदुस्थान एक धर्मनिरपेक्ष देश आहे, ज्याचा कोणताही राजकीय धर्म नाही.’’ हिंदुस्थानचे ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनीच हिंदुस्थान सरकारच्या वतीने संयुक्त राष्ट्रसंघाच्या जिनिव्हा येथील मानवाधिकार परिषदेच्या अधिवेशनात बोलताना हे स्पष्टीकरण दिले. खरे तर हा देश म्हणजे हिंदुराष्ट्रच आहे. पुन्हा देशाचा आत्मा, संस्कार, संस्कृती शुद्ध हिंदुत्वाची आहे हे ठासून सांगायला आज कुणाची भीती आहे? 
 
 
- १९४७ मध्ये धर्माच्या नावावर पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर उरलेला देश हिंदुस्थान म्हणजे हिंदुराष्ट्रच मानायला हवे, पण पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही येथे जे दोनेक कोटी मुसलमान राहिले त्यांच्या लांगूलचालनासाठी आपण स्वतःला ‘निधर्मी’ म्हणण्यातच धन्यता मानली. त्यांच्या दोन कोटींचे आज बावीस कोटी झाले व ते २२ कोटी धर्माच्या नावावर आपल्याला भारी पडत असतानाही आपण सेक्युलरवादाची बांग देत शेपूट घालणार असू तर हा देश रामाचा, कृष्णाचा आणि सोमनाथाचा उरणार नाही. हिंदुराष्ट्र म्हणजे इराणच्या खोमेनीचे, अफगाणिस्तानातील तालिबान्यांचे आणि पाक-इराकमधील ‘इसिस’चे राज्य नाही. हिंदुराष्ट्र म्हणजे येथे राहणाऱ्या सर्वांनी आपापल्या श्रद्धांची जपणूक करीत हिंदू संस्कृतीचा स्वीकार करणे. 
 
 
-  हिंदुराष्ट्र याचा अर्थ मुसलमानांसह इतर धर्मीयांनी लुंग्या आणि सूटबूट सोडून पितांबरे नेसावीत, शेंडीजानवे ठेवावे असा नाही तर त्यांनी या मातृभूमीला वंदन करावे, समान नागरी कायदा पाळावा, ‘वंदे मातरम्’चा गजर करावा व धर्मांधतेचे जोखड फेकून द्यावे असा आहे. धर्म तुमच्या घरात ठेवा, मशिदी व चर्चमध्ये राहू द्या, पण बाकी सर्व आपण एकाच हिंदुराष्ट्राचे पाईक आहोत अशी हिंदुराष्ट्राची स्वच्छ संकल्पना मांडून जागतिक व्यासपीठावर सरकारला सांगता आले असते की, ‘‘होय, आम्ही हिंदुराष्ट्र आहोत!’’ त्यात लाज कसली बाळगायची? युरोप खंडातील यच्चयावत राष्ट्रे ‘ख्रिश्चन’ राष्ट्र म्हणून अभिमानाने मिरवतात. अमेरिका, रशियासारख्या राष्ट्रांचा धर्म ख्रिश्चन आहे.
 
 
-  ५६ देश इस्लामिक रिपब्लिक आहेत. जपान, चीन, श्रीलंका, म्यानमारसारखी राष्ट्रे बौद्ध धर्मास डोक्यावर घेऊन उभी आहेत. पण जगाच्या पाठीवर एकही हिंदुराष्ट्र नसावे याची खंत आणि चीड ज्याच्या अंतरंगात नाही तो हिंदू म्हणून जगण्यास लायक नाही. एकमेव हिंदुराष्ट्र नेपाळही लाल माकडांनी मोडून ते निधर्मी केले व ज्यांच्याकडून निधर्मी हिंदुस्थानचे हिंदुराष्ट्र करण्याची अपेक्षा होती त्यांनी ‘युनो’त हिंदुस्थान निधर्मी असल्याची बांग दिली. हा विश्वासघातच आहे. भारतीय जनता पक्षाला देशभरात आणि आज खासकरून उत्तर प्रदेशात मिळालेले यश हा फक्त हिंदुत्वाचा डंका आहे. हा देश हिंदुत्ववाद्यांनी खुर्च्या उबवूनही निधर्मीवादाचा गुलामच राहणार असेल तर साबरमती एक्प्रेसमधील रामसेवकांच्या बलिदानाला अर्थ उरणार नाही. राममंदिरासाठी अयोध्येत मरण पत्करणाऱया वीरांचे मोल शून्य ठरेल. राममंदिराची उभारणी हे ढोंग व राजकारण ठरेल आणि गोवंशहत्या वगैरे थोतांड ठरून मतांसाठी हिंदूभक्तांना चेतविण्याचे षड्यंत्र ठरेल. ‘‘गर्व से कहो हम हिंदू है’वाल्यांचे राज्य सध्या देशात आले आहे’’ हे जगाला ओरडून सांगण्याची हीच वेळ असताना आम्ही अचानक ‘सेक्युलर’ कसे काय झालो? या सरकारवर शंभर कोटी हिंदूंतर्फे फसवणुकीचा, अब्रुनुकसानीचा गुन्हाच दाखल व्हायला हवा!