शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारवर शंभर कोटी हिंदूंतर्फे फसवणुकीचा, अब्रुनुकसानीचा गुन्हाच दाखल व्हायला हवा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 8, 2017 07:30 IST

देश हिंदुत्ववाद्यांनी खुर्च्या उबवूनही निधर्मीवादाचा गुलामच राहणार असेल तर साबरमती एक्प्रेसमधील रामसेवकांच्या बलिदानाला अर्थ उरणार नाही.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 8 - देश हिंदुत्ववाद्यांनी खुर्च्या उबवूनही निधर्मीवादाचा गुलामच राहणार असेल तर साबरमती एक्प्रेसमधील रामसेवकांच्या बलिदानाला अर्थ उरणार नाही. ‘‘गर्व से कहो हम हिंदू है’वाल्यांचे राज्य सध्या देशात आले आहे’’ हे जगाला ओरडून सांगण्याची हीच वेळ असताना आम्ही अचानक ‘सेक्युलर’ कसे झालो? या सरकारवर शंभर कोटी हिंदूंतर्फे फसवणुकीचा, अब्रुनुकसानीचा गुन्हाच दाखल व्हायला हवा! अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरुन केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. 
 
नरेंद्र मोदी सरकारने युनोमध्ये मांडलेली धर्मनिरपेक्षतेची भूमिका शिवसेनेला अजिबात पटलेली नाही. त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून आपल्याच सरकारवर जळजळीत टीकास्त्र सोडले आहे. हिंदूंना या जगात स्वतःची म्हणून इंचभर जमीन तरी मिळणार आहे काय? देशात हिंदुत्ववादी नरेंद्र मोदी यांची राजवट आल्यावर जगभरातील हिंदू समाजाने जल्लोष केला, पण आता मोदी सरकारने ‘युनो’त जाऊन जाहीर केले आहे, ‘‘आम्ही निधर्मी आहोत. देश धर्मनिरपेक्ष आहे!’’ हे धक्कादायक आहे. वास्तविक हिंदुराष्ट्र संकल्पनेसाठी लाखो हिंदू स्वयंसेवकांनी आतापर्यंत बलिदान दिले आहे. देशाचा सत्यानाश ‘सेक्युलर’ म्हणजे निधर्मी शब्दाने केल्याचे खापर आपण नेहमीच नेहरूंच्या टाळक्यावर फोडत राहिलो. या देशात ‘धर्मनिरपेक्ष’ ही शिवी झाली असून समस्त हिंदूंची पीछेहाट व्हावी यासाठीच तुमच्या त्या सेक्युलरवादाचे हत्यार वापरण्यात आले असे अग्रलेखात म्हटले आहे.  
 
पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही येथे जे दोनेक कोटी मुसलमान राहिले त्यांच्या लांगूलचालनासाठी आपण स्वतःला ‘निधर्मी’ म्हणण्यातच धन्यता मानली. त्यांच्या दोन कोटींचे आज बावीस कोटी झाले व ते २२ कोटी धर्माच्या नावावर आपल्याला भारी पडत असतानाही आपण सेक्युलरवादाची बांग देत शेपूट घालणार असू तर हा देश रामाचा, कृष्णाचा आणि सोमनाथाचा उरणार नाही असे उद्धव यांनी म्हटले आहे. 
 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
 
- ज्यांच्याकडून निधर्मी हिंदुस्थानचे हिंदुराष्ट्र करण्याची अपेक्षा होती त्यांनी ‘युनो’त हिंदुस्थान निधर्मी असल्याची बांग दिली. हा देश हिंदुत्ववाद्यांनी खुर्च्या उबवूनही निधर्मीवादाचा गुलामच राहणार असेल तर साबरमती एक्प्रेसमधील रामसेवकांच्या बलिदानाला अर्थ उरणार नाही. ‘‘गर्व से कहो हम हिंदू है’वाल्यांचे राज्य सध्या देशात आले आहे’’ हे जगाला ओरडून सांगण्याची हीच वेळ असताना आम्ही अचानक ‘सेक्युलर’ कसे झालो? या सरकारवर शंभर कोटी हिंदूंतर्फे फसवणुकीचा, अब्रुनुकसानीचा गुन्हाच दाखल व्हायला हवा!
 
 
- हिंदूंना या जगात स्वतःची म्हणून इंचभर जमीन तरी मिळणार आहे काय? देशात हिंदुत्ववादी नरेंद्र मोदी यांची राजवट आल्यावर जगभरातील हिंदू समाजाने जल्लोष केला, पण आता मोदी सरकारने ‘युनो’त जाऊन जाहीर केले आहे, ‘‘आम्ही निधर्मी आहोत. देश धर्मनिरपेक्ष आहे!’’ हे धक्कादायक आहे. वास्तविक हिंदुराष्ट्र संकल्पनेसाठी लाखो हिंदू स्वयंसेवकांनी आतापर्यंत बलिदान दिले आहे. देशाचा सत्यानाश ‘सेक्युलर’ म्हणजे निधर्मी शब्दाने केल्याचे खापर आपण नेहमीच नेहरूंच्या टाळक्यावर फोडत राहिलो. या देशात ‘धर्मनिरपेक्ष’ ही शिवी झाली असून समस्त हिंदूंची पीछेहाट व्हावी यासाठीच तुमच्या त्या सेक्युलरवादाचे हत्यार वापरण्यात आले. 
 
 
- त्यामुळे दिल्लीत हिंदुत्ववाद्यांचे राज्य आल्याने सेक्युलरवादाचे दफन होईल अशी खात्रीच हिंदूंना होती, पण आपण आता ‘युनो’त जाऊन सांगितले आहे की, ‘‘हिंदुस्थान एक धर्मनिरपेक्ष देश आहे, ज्याचा कोणताही राजकीय धर्म नाही.’’ हिंदुस्थानचे ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनीच हिंदुस्थान सरकारच्या वतीने संयुक्त राष्ट्रसंघाच्या जिनिव्हा येथील मानवाधिकार परिषदेच्या अधिवेशनात बोलताना हे स्पष्टीकरण दिले. खरे तर हा देश म्हणजे हिंदुराष्ट्रच आहे. पुन्हा देशाचा आत्मा, संस्कार, संस्कृती शुद्ध हिंदुत्वाची आहे हे ठासून सांगायला आज कुणाची भीती आहे? 
 
 
- १९४७ मध्ये धर्माच्या नावावर पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर उरलेला देश हिंदुस्थान म्हणजे हिंदुराष्ट्रच मानायला हवे, पण पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही येथे जे दोनेक कोटी मुसलमान राहिले त्यांच्या लांगूलचालनासाठी आपण स्वतःला ‘निधर्मी’ म्हणण्यातच धन्यता मानली. त्यांच्या दोन कोटींचे आज बावीस कोटी झाले व ते २२ कोटी धर्माच्या नावावर आपल्याला भारी पडत असतानाही आपण सेक्युलरवादाची बांग देत शेपूट घालणार असू तर हा देश रामाचा, कृष्णाचा आणि सोमनाथाचा उरणार नाही. हिंदुराष्ट्र म्हणजे इराणच्या खोमेनीचे, अफगाणिस्तानातील तालिबान्यांचे आणि पाक-इराकमधील ‘इसिस’चे राज्य नाही. हिंदुराष्ट्र म्हणजे येथे राहणाऱ्या सर्वांनी आपापल्या श्रद्धांची जपणूक करीत हिंदू संस्कृतीचा स्वीकार करणे. 
 
 
-  हिंदुराष्ट्र याचा अर्थ मुसलमानांसह इतर धर्मीयांनी लुंग्या आणि सूटबूट सोडून पितांबरे नेसावीत, शेंडीजानवे ठेवावे असा नाही तर त्यांनी या मातृभूमीला वंदन करावे, समान नागरी कायदा पाळावा, ‘वंदे मातरम्’चा गजर करावा व धर्मांधतेचे जोखड फेकून द्यावे असा आहे. धर्म तुमच्या घरात ठेवा, मशिदी व चर्चमध्ये राहू द्या, पण बाकी सर्व आपण एकाच हिंदुराष्ट्राचे पाईक आहोत अशी हिंदुराष्ट्राची स्वच्छ संकल्पना मांडून जागतिक व्यासपीठावर सरकारला सांगता आले असते की, ‘‘होय, आम्ही हिंदुराष्ट्र आहोत!’’ त्यात लाज कसली बाळगायची? युरोप खंडातील यच्चयावत राष्ट्रे ‘ख्रिश्चन’ राष्ट्र म्हणून अभिमानाने मिरवतात. अमेरिका, रशियासारख्या राष्ट्रांचा धर्म ख्रिश्चन आहे.
 
 
-  ५६ देश इस्लामिक रिपब्लिक आहेत. जपान, चीन, श्रीलंका, म्यानमारसारखी राष्ट्रे बौद्ध धर्मास डोक्यावर घेऊन उभी आहेत. पण जगाच्या पाठीवर एकही हिंदुराष्ट्र नसावे याची खंत आणि चीड ज्याच्या अंतरंगात नाही तो हिंदू म्हणून जगण्यास लायक नाही. एकमेव हिंदुराष्ट्र नेपाळही लाल माकडांनी मोडून ते निधर्मी केले व ज्यांच्याकडून निधर्मी हिंदुस्थानचे हिंदुराष्ट्र करण्याची अपेक्षा होती त्यांनी ‘युनो’त हिंदुस्थान निधर्मी असल्याची बांग दिली. हा विश्वासघातच आहे. भारतीय जनता पक्षाला देशभरात आणि आज खासकरून उत्तर प्रदेशात मिळालेले यश हा फक्त हिंदुत्वाचा डंका आहे. हा देश हिंदुत्ववाद्यांनी खुर्च्या उबवूनही निधर्मीवादाचा गुलामच राहणार असेल तर साबरमती एक्प्रेसमधील रामसेवकांच्या बलिदानाला अर्थ उरणार नाही. राममंदिरासाठी अयोध्येत मरण पत्करणाऱया वीरांचे मोल शून्य ठरेल. राममंदिराची उभारणी हे ढोंग व राजकारण ठरेल आणि गोवंशहत्या वगैरे थोतांड ठरून मतांसाठी हिंदूभक्तांना चेतविण्याचे षड्यंत्र ठरेल. ‘‘गर्व से कहो हम हिंदू है’वाल्यांचे राज्य सध्या देशात आले आहे’’ हे जगाला ओरडून सांगण्याची हीच वेळ असताना आम्ही अचानक ‘सेक्युलर’ कसे काय झालो? या सरकारवर शंभर कोटी हिंदूंतर्फे फसवणुकीचा, अब्रुनुकसानीचा गुन्हाच दाखल व्हायला हवा!