शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

ग्रामपंचायतीतही पक्षांतरबंदीचा विचार, राज्य सरकार अनुकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 12:10 IST

Gram Panchayat, State Government, Proposal, Law and Justice Department, maharastra संसद व विधिमंडळाप्रमाणे ग्रामपंचायतीतही पक्षांतरबंदी कायदा लागू करण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे. यासाठी सत्तेतील तिन्ही पक्षांत एकमत झाले असून, हा प्रस्ताव विधि व न्याय विभागाकडे पाठविण्यात आला आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतीतही पक्षांतरबंदीचा विचारराज्य सरकार अनुकूल : विधि व न्याय विभागाकडे प्रस्ताव

राजाराम लोंढे 

कोल्हापूर : संसद व विधिमंडळाप्रमाणे ग्रामपंचायतीतही पक्षांतरबंदी कायदा लागू करण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे. यासाठी सत्तेतील तिन्ही पक्षांत एकमत झाले असून, हा प्रस्ताव विधि व न्याय विभागाकडे पाठविण्यात आला आहे.ग्रामपंचायत हेच राजकारणाचा पाया असून आज संसद व विधिमंडळात दिसणाऱ्या चेहऱ्यांपैकी बहुतांश जणांची सुरुवात ग्रामपंचायतीपासूनच झालेली आहे. त्यात ज्याची गावात सत्ता त्याचे तालुक्याच्या राजकारणात दबदबा असतो. मात्र फोडाफोडीच्या राजकारणामुळे ग्रामपंचायतीमधील सत्तेचा लंबक नेहमी हलता राहतो. त्याचा परिणाम विकासकामांवर होतो.

यासाठी भाजप सरकारने थेट जनतेतून सरपंच निवड करीत अडीच वर्षे सरपंचांवर अविश्वास ठराव आणता येणार नाही, अशी कायद्यात दुरुस्ती केली होती. यामुळे सरपंचांना काम करण्यास मोकळीक मिळाली होती. मात्र राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर तातडीने थेट सरपंचपदाचा निर्णय बदलण्यात आला आणि पूर्वीप्रमाणे सदस्यांमधूनच सरपंच निवड कायम ठेवली. याला महाराष्ट्र सरपंच परिषदेने हरकत घेतली होती.

थेट सरपंच निवड कायम ठेवण्याचा आग्रह धरला होता. मात्र थेट सरपंचाला राज्यातील १०० हून अधिक आमदारांचा विरोध असल्याने सरकारने निर्णय घेतल्याचे त्यांना सांगण्यात आले. ग्रामपंचायत पातळीवर पॅनल व पक्षांतर बंदीबाबत कायदेशीर बाबीची चाचपणी करण्यासाठी प्रस्ताव विधि व न्याय विभागाकडे पाठवला आहे.ग्रामपंचायतींना स्थिरता येईल

काठावरचे बहुमत असते, तिथे विकासकामांपेक्षा सत्तेची खुर्ची टिकवण्यासाठीच सगळ्या तडजोडी कराव्या लागतात. पक्षांतर बंदीचा कायदा लागू झाला तर सदस्यांना उड्या मारता येणार नाहीत. परिणामी ग्रामपंचायत स्थिर राहून विकासकामांना गती येऊ शकते.

थेट सरपंच निवडीचा आमचा आग्रह होता; मात्र आमदारांचाच विरोध असल्याने सरकारने तो रद्द केला. किमान पक्षांतरबंदीचा कायदा करून ग्रामपंचायती स्थिर करण्याचा आग्रह आमचा होता. त्यात थोडेफार यश येत आहे.- दत्ता काकडे, अध्यक्ष, सरपंच परिषद, मुंबई 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्रsarpanchसरपंच