शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
4
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
5
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
6
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
7
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
8
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
9
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
10
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
11
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
12
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
13
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
14
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
15
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
16
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
17
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
18
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
19
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
20
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?

तात्पुरते घेतले ते मागतात कायम नोकरी; मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आली राज्य सरकारच्या अंगलट

By यदू जोशी | Updated: March 1, 2025 08:59 IST

राज्य मंत्रिमंडळाच्या अलीकडे झालेल्या बैठकीत या योजनेतील उणिवांवर वादळी चर्चा झाल्याची माहिती आहे. या  योजनेतून कायमस्वरूपी नोकरी दिली जाईल, असा कोणताही शब्द सरकारने दिलेला नव्हता.

- यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सरकारी कार्यालये आणि खासगी कंपन्यांमधील कामांचा अनुभव तरुण-तरुणींना मिळावा व त्यातून ते रोजगारक्षम व्हावेत म्हणून त्यांना सहा महिन्यांसाठी विद्यावेतन देणारी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राज्य सरकारने सुरू केली खरी; पण आता ती सरकारच्या अंगलट आली आहे. ज्यांना सरकारी कार्यालयांमध्ये सहा महिने काम मिळाले ते आता नोकरीत कायम करा, अशी मागणी करू लागले आहेत.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही योजना आणली. ॲप्रेंटसशिप आणि मासिक १० हजार रुपये विद्यावेतन, अशी याचे स्वरूप आहे. खासगी क्षेत्रातील कामाचा अनुभव देण्याचा योजनेमागचा मुख्य उद्देश होता; पण सरकारी कार्यालयांमध्येच काम मिळावे यासाठी बहुतेकांचा कल होता. ही योजना कौशल्य विकास विभागामार्फत राबविली जाते. सहा महिने प्रशिक्षण घेतलेले हजारो तरुण आता संघटन बांधून सरकारवर नोकरीसाठी दबाव आणत आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या अलीकडे झालेल्या बैठकीत या योजनेतील उणिवांवर वादळी चर्चा झाल्याची माहिती आहे. या  योजनेतून कायमस्वरूपी नोकरी दिली जाईल, असा कोणताही शब्द सरकारने दिलेला नव्हता. मात्र, आता काही आमदारच सहा महिने काम केलेल्यांना कायम करा, अशी मागणी करू लागले आहेत. आंदोलनाची भाषा सुरू झाली आहे. त्यामुळे योजना सुरू ठेवायची की नाही याचा विचार गंभीरपणे करण्याची गरज आहे, असे मत काही मंत्र्यांनी व्यक्त केले.

१.१८ लाख युवांना मिळाली संधीमुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेत आतापर्यंत १ लाख २३ हजार युवक-युवतींना प्रत्येकी सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना ३४१ कोटी रुपयांचे विद्यावेतन त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आले.  सरकारी कार्यालयांमध्ये प्रशिक्षण घेतलेल्यांची संख्या ७८,४३२ तर खासगी क्षेत्रातील संख्या ४०,२२५ आहे. 

योजनेचा कालावधी ११ महिन्यांचा करणार?  सरकारी नोकरीची एक प्रक्रिया असते, ती पूर्ण न करता कोणी नोकरीत कायम करा यासाठी दबाव आणत असेल तर त्याच्यापुढे झुकण्याचे कारण नाही, अशी भावना मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यावर सर्व मंत्र्यांचे एकमत होते; पण ही योजना ११ महिन्यांसाठी करावी, असा आग्रह काही मंत्र्यांनी बैठकीत धरला. तो मान्य केला जाण्याची शक्यता आहे. योजनेला सहा महिने मुदतवाढ द्यावी आणि नंतर ती बंद करावी, असाही मतप्रवाह आहे. त्यामुळे सहा महिन्यांनंतर योजनेबाबत सरकार ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Mantralayaमंत्रालयgovernment jobs updateसरकारी नोकरी