शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

तात्पुरते घेतले ते मागतात कायम नोकरी; मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आली राज्य सरकारच्या अंगलट

By यदू जोशी | Updated: March 1, 2025 08:59 IST

राज्य मंत्रिमंडळाच्या अलीकडे झालेल्या बैठकीत या योजनेतील उणिवांवर वादळी चर्चा झाल्याची माहिती आहे. या  योजनेतून कायमस्वरूपी नोकरी दिली जाईल, असा कोणताही शब्द सरकारने दिलेला नव्हता.

- यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सरकारी कार्यालये आणि खासगी कंपन्यांमधील कामांचा अनुभव तरुण-तरुणींना मिळावा व त्यातून ते रोजगारक्षम व्हावेत म्हणून त्यांना सहा महिन्यांसाठी विद्यावेतन देणारी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राज्य सरकारने सुरू केली खरी; पण आता ती सरकारच्या अंगलट आली आहे. ज्यांना सरकारी कार्यालयांमध्ये सहा महिने काम मिळाले ते आता नोकरीत कायम करा, अशी मागणी करू लागले आहेत.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही योजना आणली. ॲप्रेंटसशिप आणि मासिक १० हजार रुपये विद्यावेतन, अशी याचे स्वरूप आहे. खासगी क्षेत्रातील कामाचा अनुभव देण्याचा योजनेमागचा मुख्य उद्देश होता; पण सरकारी कार्यालयांमध्येच काम मिळावे यासाठी बहुतेकांचा कल होता. ही योजना कौशल्य विकास विभागामार्फत राबविली जाते. सहा महिने प्रशिक्षण घेतलेले हजारो तरुण आता संघटन बांधून सरकारवर नोकरीसाठी दबाव आणत आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या अलीकडे झालेल्या बैठकीत या योजनेतील उणिवांवर वादळी चर्चा झाल्याची माहिती आहे. या  योजनेतून कायमस्वरूपी नोकरी दिली जाईल, असा कोणताही शब्द सरकारने दिलेला नव्हता. मात्र, आता काही आमदारच सहा महिने काम केलेल्यांना कायम करा, अशी मागणी करू लागले आहेत. आंदोलनाची भाषा सुरू झाली आहे. त्यामुळे योजना सुरू ठेवायची की नाही याचा विचार गंभीरपणे करण्याची गरज आहे, असे मत काही मंत्र्यांनी व्यक्त केले.

१.१८ लाख युवांना मिळाली संधीमुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेत आतापर्यंत १ लाख २३ हजार युवक-युवतींना प्रत्येकी सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना ३४१ कोटी रुपयांचे विद्यावेतन त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आले.  सरकारी कार्यालयांमध्ये प्रशिक्षण घेतलेल्यांची संख्या ७८,४३२ तर खासगी क्षेत्रातील संख्या ४०,२२५ आहे. 

योजनेचा कालावधी ११ महिन्यांचा करणार?  सरकारी नोकरीची एक प्रक्रिया असते, ती पूर्ण न करता कोणी नोकरीत कायम करा यासाठी दबाव आणत असेल तर त्याच्यापुढे झुकण्याचे कारण नाही, अशी भावना मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यावर सर्व मंत्र्यांचे एकमत होते; पण ही योजना ११ महिन्यांसाठी करावी, असा आग्रह काही मंत्र्यांनी बैठकीत धरला. तो मान्य केला जाण्याची शक्यता आहे. योजनेला सहा महिने मुदतवाढ द्यावी आणि नंतर ती बंद करावी, असाही मतप्रवाह आहे. त्यामुळे सहा महिन्यांनंतर योजनेबाबत सरकार ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Mantralayaमंत्रालयgovernment jobs updateसरकारी नोकरी