शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

आरक्षण मागणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकराचं नावही घेत नाहीत; पडळकरांचा रोख कुणाकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 11:57 IST

धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी केल्याशिवाय शांत बसणार नाही. आपण ताकदीने पाठपुरावा करतोय असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

जालना - आम्ही आरक्षणाची लढाई रस्त्यावरही लढतोय, न्यायालयातही लढतोय आणि सरकारकडेही पाठपुरावा करतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आम्हाला आरक्षण आहे. म्हणून या महाराष्ट्रात आणि देशात धनगरांचा एकच साहेब आहे ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. काही पुरोगामी  नेत्यांनी महाराष्ट्रात जातीयवादी पिल्लावळ तयार केल्यात. आरक्षण मागतायेत पण ते डॉ. बाबासाहेबांचा सन्मान करायला तयार नाहीत, नावही घेत नाहीत पण त्यांना आरक्षण पाहिजे अशा शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य केले. 

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, बाबासाहेबांचे नाव आम्ही घेणार नाही हे कसं चालेल, आम्ही बाबासाहेबांमुळे आहोत, संविधानाने धनगर समाजाला आरक्षण दिले आहे. ७० वर्ष इतका मोठा अन्याय आमच्यावर केला. आमचे आयएएस, आयपीएस किती झाले असते, आमचे आमदार खासदार किती झाले असते पण या सगळ्यापासून आम्ही मुकलो. पण आता ती वेळ आलेली आहे. मागे ७० वर्षात जे झालंय ते आता आम्ही होऊ देणार नाही. आम्ही सगळे एकत्रित आलोय, एकजूट आणि संघटित झालोय आणि राज्यातील धनगरांच्या पोरांच्या हातात एसटीचा दाखला द्या याला दुसरा कुठलाच पर्याय नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच आपल्याला केवळ न्यायालयीन लढाईवर अवलंबून नाही. वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन, उपोषण सुरू आहे. रस्त्यावरची लढाई लढतोय. राज्य सरकारसमोर आपण एक पर्याय ठेवलाय. राज्य सरकारने त्यांच्या अधिकारात एक जीआर काढावा की या राज्यात धनगड अस्तित्वात नाही. मग प्रत्येक धनगरांच्या पोरांना एसटीचा दाखला द्या. बिहार, तेलंगणा, मध्य प्रदेश राज्य सरकारचे जीआर आम्ही सरकारसमोर ठेवले. असा जीआर सरकारने काढावा अशी मागणी आम्ही केलीय. आता सरकारने समिती नेमली त्या समितीने जीआर काढलेल्या राज्यात जायचे आणि कुठल्या अधिकारात जीआर काढला एवढीच माहिती द्यायची आहे. धनगर अधिकारी, समाजाचे सहशासकीय सदस्य हे त्यावर अभ्यास करणार आहेत असं गोपीचंद पडळकरांनी सांगितले. 

दरम्यान, जालनात धनगर समाजाला डिवचून महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याच्या मागे कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे. धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी केल्याशिवाय शांत बसणार नाही. आपण ताकदीने पाठपुरावा करतोय. सरकारने या वर्षी धनगर समाजच्या आरक्षणाबाबतीत भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षभरात ३० बैठका देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झाल्या. महाविकास आघाडी काळात एकही बैठक झाली नाही. आपल्या बाजूने दोन प्रतिज्ञापत्र सरकारने कोर्टात सादर केलीत. जे आपल्या बाजूने आहे त्यांचे कौतुक केले पाहिजे. आपण कायदा मानणारे आहोत असंही पडळकर म्हणाले. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरDhangar Reservationधनगर आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील