शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

"हा तर मोदी-शहा निवडणूक आयोग", सामना रोखठोकमधून निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 09:49 IST

देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री त्यांच्या शासकीय लवाजम्यासह राजकीय प्रचारात उतरतात, त्यामुळे निवडणूक यंत्रणेवर दबाव पडत असल्याचे रोखठोकमध्ये म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी देशात सध्या पाच राज्यांच्या निवडणुका पार पडत आहे. या पाच राज्यांमधील निवडणुकांचा निकाल लोकसभेचं चित्र स्पष्ट करणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे पाच राज्यांच्या निवडणुकीत प्रचारासाठी भाजपसह सर्वच पक्षांनी चांगलीच कंबर कसलेली पाहायला मिळाली. दरम्यान, या निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपल्या शासकीय लवाजम्यासह राजकीय प्रचारात उतरले, यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून हा तर मोदी-शहा निवडणूक आयोग अशा शब्दांत निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.

देशात निवडणूक आयोग हा आज मोदी-शहा निवडणूक आयोग बनला आहे. सर्व घटनात्मक संस्थांचे खच्चीकरण सुरू आहे. त्यातून निवडणूक आयोगही सुटला नाही. पंतप्रधान बजरंग बलीच्या नावाने मते मागतात. अमित शहा मध्य प्रदेशातील मतदारांना मोफत अयोध्यावारीचे प्रलोभन दाखवतात. पुलामातील जवानांचे हौतात्म्य हा प्रचाराचा मुद्दा भाजपकडून होतो. हे गंभीर आहे, असे सामना रोखठोकमधून म्हटले आहे. तसेच, एक तर पंतप्रधानांनी निवडणूक प्रचारात उतरू नये व उतरले तर त्याचा संपूर्ण खर्च त्यांच्या पक्षाने करावा. निवडणूक आयोगास त्यावर मूकदर्शक बनता येणार नाही. सरकारी खर्चाने होणारा धार्मिक प्रचार, हेट स्पीच हे प्रकार आजच्या निवडणूक आयोगास खुपत नाहीत हे आश्चर्यच म्हणायला हवे, अशी टीका संजय राऊतांनी रोखठोकमधून केली आहे.

याचबरोबर, निवडणूक आयोगाकडून आता स्वतंत्र, निष्पक्ष निवडणुकांची अपेक्षा का करावी?बजरंग बलीचा नारा देत भाजपास मतदान करा, असे देशाचे पंतप्रधान प्रचार सभेत सांगतात. मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आली तर तेथील जनतेस 'अयोध्यावारी'चा लाभ देऊ. तोही मोफत, असे देशाचे गृहमंत्री जाहीर करतात. देशाला निवडणूक आयोग आहे काय? असा प्रश्न त्यामुळे पडतो!,असा हल्लाबोल रोकठोकमधून करण्यात आला आहे. याशिवाय, काँग्रेसचे निवडणूक चिन्ह म्हणजे हाताचा पंजा. लखनौच्या एका मेळाव्यात मागे राहुल गांधी म्हणाले, 'काँग्रेसचे चिन्ह असलेल्या हातावर मला देव आणि संत असल्याचा भास होतो.' या विधानावर राहुल गांधींच्या विरोधात निवडणूक आयोगात व कोर्टात भाजपने धाव घेतली होती. देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री त्यांच्या शासकीय लवाजम्यासह राजकीय प्रचारात उतरतात, त्यामुळे निवडणूक यंत्रणेवर दबाव पडत असल्याचे रोखठोकमध्ये म्हटले आहे.

गर्व से कहो हम हिंदू है!1987 सालची विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणूक ही हिंदुत्वाची प्रयोगशाळा होती. काँग्रेसचे प्रभाकर कुंटे विरूद्ध शिवसेनेचे रमेश प्रभू असा तो सामना होता. हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर लढवलेली ती पहिली निवडणूक होती. 'गर्व से कहो हम हिंदू है!' असा जोरदार नारा तेव्हा बाळासाहेबांनी दिला होता. पराभूत प्रभाकर कुंटे यांनी नंतर मुंबई हायकोर्टात याचिका केली. बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा प्रचार केल्याचे कोर्टाने मान्य केले व त्यांना सहा वर्षांसाठी मतदानासाठी वंचित केले. हिंदुत्वासाठी एखाद्या नेत्याने केलेला हा सर्वोच्च त्या होता. रमेश प्रभू, सूर्यकांत महाडिक, रमाकांत  मयेकर या शिवसेना आमदारांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आमदारक्या गमवाव्या लागल्या होता. आज हिंदुत्वाची ठेकेदारी चालवणाऱ्या भाजपला हिंदुत्वासाठी असा त्याग व संघर्ष करावा लागला. निवडणूक आयोग व इतर घटनात्मक संस्थांना मानेज करून ते हिंदुत्वाच्या लढाया लढले. त्या लढाया लटूपुटूच्या होत्या, अशा शब्दांत सामना रोखठोकमधून निशाणा साधला आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग