शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
2
...म्हणून राज ठाकरेंनी माझ्यावर टीका करणं टाळलं असावं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का बोलले?
3
मुंबईत पकडलेल्या त्या दोन बांगलादेशींना मायदेशी पाठवलं, आता पुन्हा कफ परेडमध्ये सापडल्या...
4
गुंतवणूकदारांची दिवाळी! RBI च्या निर्णयामुळे गुंतवणूकदार मालामाल; ५ वर्षांत पैसा झाला ३ पट!
5
ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात
6
मृत्यूची झडप! महाकाय क्रेन भरधाव 'रेल्वे गाडी'वर वर कोसळलं; २८ प्रवाशांचा मृत्यू, कसा घडला अपघात?
7
Syeda Falak: "एक दिवस ही हिजाब घातलेली मुस्लीम महिला…" फडणवीसांना चॅलेंज देणारी सईदा फलक आहे तरी कोण?
8
गुंतवणूकदारांची संक्रांत! निफ्टी ५०० मधील ७०% शेअर्स तोट्यात; ५ वर्षांतील सर्वात खराब सुरुवात
9
एकाच ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग, प्रॉडक्शन अन् डिझाइनिंग; Apple ने लॉन्च केला Creator Studio
10
ठाकरे बंधूंनी आक्षेप घेतलेले PADU Machine नेमके कसे आणि काय काम करते? सविस्तर माहिती जाणून घ्या
11
'स्वयंपाक, मुले जन्माला घालणे, हेच उत्तर भारतीय महिलांचे काम', DMK खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
12
Virat Kohli New Record : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत विराटच ‘धुरंधर’! सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला
13
वेदांताच्या शेअर्सचा विक्रमी उच्चांक: ४ दिवसांत १३% वाढ; 'नुवामा'कडून ८०६ रुपयांचं नवं टार्गेट
14
"मला काहून पाडलं? मह्या तोंडाला फेस येतो... माणूस पाहायचा नाही, फक्त...!'; दानवेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
15
“‘टॉयलेट मॅनर्स’ आहेत, त्यांनीच स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करावा”; रेल्वे अधिकाऱ्यांची पोस्ट चर्चेत
16
Nashik Municipal Election 2026 : निष्ठावंत, पाहुण्यांसह ७६ जणांवर भाजपमधून हकालपट्टीची संक्रांत; उद्धवसेनेतून ५ जणांची हकालपट्टी
17
अपहरण झालेल्या चिमुकलीच्या सुटकेसाठी राप्ती सागर एक्स्प्रेस नॉन-स्टॉप २६० किमी धावली!
18
PADU Machine: "मुंबईमध्ये 'पाडू' मशीन सरसकट वापरले जाणार नाही, तर..."; राज ठाकरेंच्या संतापानंतर आयुक्त गगराणींचा खुलासा
19
उणे ४०% गुण घेणाऱ्यांनाही मिळणार अ‍ॅडमिशन; NEET PG कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद
20
बिटकॉइनचा धमाका! ९६ हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडून २ महिन्यांच्या उच्चांकावर; पुढे काय होईल?
Daily Top 2Weekly Top 5

ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 14:29 IST

केंद्रात आणि राज्यात आम्ही सत्तेत आहोत, त्यामुळे मुंबईच्या विकासासाठी महायुती सत्तेत असावी हे उदिष्ट ठेवून आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन निवडणूक लढवत आहोत असंही उपमुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.

मुंबई - आम्ही विकासाच्या मुद्द्यावर चाललोय, त्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले. मुंबईत आम्ही साडे तीन वर्ष काम केले. महाराष्ट्रात काम करतोय. समोरच्या लोकांकडे मुद्दे नाहीत. दाखवण्यासारखे काही नाही मग त्यांनी मराठीचा मुद्दा आणला. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हे जुने मुद्दे काढले. २०१२, २०१७ आणि त्याआधीपण हेच मुद्दे होते. आता ही शेवटची लढाई, मराठी माणसांच्या अस्तित्वाची लढाई असं बोलतात मात्र ही लढाई मराठी माणसांच्या नाही तर जे हे बोलतायेत त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली. 

लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांना दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदेंनी महापालिका निवडणुकांवर भाष्य केले. त्यावेळी ते म्हणाले की, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नसतो. त्यामुळे निवडणुकीचं आव्हान आम्हाला नसते. निवडणुकीची भीती आम्ही घेत नाही. काम करणारे लोक आहेत हे लोकांना माहिती आहे. मी नेहमी लोकांना भेटतो त्यामुळे निवडणुकीत आव्हान वाटत नाही. आमची युती विचारधारेवर झाली आहे. ही युती बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी यांनी केलेली आहे. आमची विचारधारा एक आहे. विचारधारेला तडा गेला तेव्हा आम्ही उठाव केला. बाळासाहेबांचे विचार सोडून जेव्हा दुसरा निर्णय झाला तेव्हा आम्हाला उठाव करावा लागला. एनडीए मजबूत कशी होईल यावर नरेंद्र मोदी भर देत आहेत. त्यामुळे त्याची प्रचिती आम्हाला येते. आम्ही बार्गेनिंग करणारी माणसे नाही, आम्हाला काय मिळाले यापेक्षा जनतेला काय देतोय यावर आमचा फोकस आहे असं त्यांनी सांगितले.

जागावाटपापेक्षा मुंबईला काय देणार हे महत्त्वाचे..

त्याशिवाय मुंबईत २२७ जागा होत्या, त्यात ६० पेक्षा जास्त नगरसेवक आमच्याकडे आले होते. त्यामुळे जागावाटप हे ६० पासून पुढे सुरू झाले. त्यानंतर आम्ही कुठे दुसऱ्या नंबरला आहोत, कुठे आम्ही जागा जिंकू शकतो, कुठे भाजपा जिंकू शकतो या लॉजिकवर जागावाटप ठरले. कुठेही अडचण आली नाही. मुख्यमंत्री आणि आम्ही एकत्र बसलो आणि सगळे ठरवले. शेवटी महायुती जिंकणे महत्त्वाचे आहे. जागा कुणाला किती मिळाल्या त्यापेक्षा मुंबईला तुम्हाला काय द्यायचे असेल तर महायुतीची सत्ता आवश्यक आहे. केंद्रात आणि राज्यात आम्ही सत्तेत आहोत, त्यामुळे मुंबईच्या विकासासाठी महायुती सत्तेत असावी हे उदिष्ट ठेवून आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन निवडणूक लढवत आहोत असंही उपमुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.

दरम्यान, फक्त मुंबईपुरते मर्यादित राहायचे आणि उर्वरित महाराष्ट्र वाऱ्यावर असं उद्धव ठाकरेंचं होते. आताही नगरपालिकेत उद्धव ठाकरे आणि मविआ कुठेही दिसली नाही. मुंबईत फक्त बैठका घेतल्या जायच्या. मुंबई ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. ही आपण राखून ठेवली तर बाकी काय देणे घेणे आहे असं चालत नाही. महाराष्ट्रात कार्यकर्ते असतात. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत त्याच्या मागे उभं राहणे हे नेत्याचे काम असते. प्रमुखाचे काम असते ते केले तरच पक्ष मोठा होता. मी कार्यकर्ता म्हणून काम करतो. मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम केले आणि आजही तेच करतो. माझ्या डोक्यात पद जात नाही असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

मराठी माणसांसाठी तुम्ही काय केले?

तुम्ही मराठी माणसांसाठी काय केले, मराठी माणूस उद्ध्वस्त का झाला, मराठी माणूस मुंबई बाहेर का फेकला गेला..आम्ही त्याच मराठी माणसांसाठी काम करतोय. SRA प्रकल्प मार्गी लावतोय. १५ वर्ष जो काम करत नाही त्या विकासकाला तुम्ही का काढून टाकले नाही. का प्रकल्प पुढे नेले नाहीत. पंतप्रधान आवास योजनेला आम्ही चालना देऊ. आम्ही १२ हजार गिरणी कामगारांना घरे दिली. १ लाख घरे आणखी देणार आहोत. फक्त मराठी माणूस एवढेच बोलून चालत नाही. आज मराठी माणसाला परवडणारी घरे मुंबईत मिळाली पाहिजे. तुमच्या मागणी आणि पुरवठा यात खूप तफावत आहे. घरे मोठ्या प्रमाणात बांधली जातायेत पण लोकांनी परवडणारी घरे का देता येत नाहीत? मराठी माणसाला परवडणारी घरे, नोकरदार वर्ग, डबेवाला, गिरणी कामगारांना घरे मिळाली पाहिजेत. ज्या इमारतींना ओसी नाही अशा २० हजार इमारतींना ओसी देण्याचं काम आम्ही केले असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Not Marathi people's fight, but Thackeray brothers' survival: Shinde's attack.

Web Summary : Eknath Shinde criticizes Uddhav and Raj Thackeray, stating the upcoming election is about their survival, not Marathi identity. He emphasizes development and accuses them of using old issues. Shinde highlights his focus on Maharashtra's development and his alignment with BJP's ideology.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६BMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक २०२६Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे