शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

"निजामशाही आणि इंग्रजांनी केली नसेल इतकी दडपशाही गरिब मराठ्यांवर हे सरकार करतंय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 12:51 IST

गोरगरिब मराठ्याने पोस्ट टाकली, गुन्हे दाखल करायचे. दबाव, दडपशाही कितीही टाकली तरी एक इंचही मराठे मागे हटत नाहीत असं मनोज जरांगे म्हणाले.

बीड - Manoj Jarange Patil on Government ( Marathi News ) ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे या अधिसूचनेची अंमलबजावणी यासाठी गेल्या ६ महिन्यापासून संघर्ष सुरू आहे. आतापर्यंत सरकारने त्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. सत्तेचा गैरवापर करून मराठ्यांवर दडपशाही सुरू आहे. सरकार जाणुनबुजून जे निजामशाही, इंग्रजांनीही केली नव्हती त्यापेक्षा जास्त सत्तेचा गैरवापर गोरगरिब मराठ्यांवर करायला लागलेत. मराठे मागे हटणार नाही अशी घणाघाती टीका मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केली. 

बीड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जसजसं मराठ्यांवर दडपशाही, दहशत निर्माण होत आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षाही ताकदीने लोक यायला लागलेत. माझ्या फक्त बैठकीला ४०-५० हजारापेक्षा कमी लोक नाहीत. सरकारनं दिवसाढवळ्या फसवणूक आणि धुळफेक केली. त्यामुळे मराठा समाज ताकदीने पेटून उठला आहे.  आम्ही आणखी काही दिवस किती अन्याय करतायेत हे बघतोय. चौकशी सुरू आहे की नाही याची माहिती नाही. माझ्याकडे कुणी आले नाही. मी बाहेर आलोय, कदाचित चौकशी अहवाल तयार झाला असेल. मला अटक करणार हे एकाने सांगितले. मराठा आणि सत्तेच्या मधला मी काटा आहे त्यामुळे हा काटा काढल्याशिवाय पर्याय नाही असं सरकारला वाटते असा आरोप त्यांनी केला. 

तसेच माझ्याविरोधात अहवाल तयार झाला आहे. आम्ही न टिकणारे १० टक्के आरक्षण घेत नाही म्हणून गुन्हा नोंदवले जातायेत. सरकारने दिलेले आरक्षण टिकणार नाही. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. तुम्हाला मराठा काय आहे हे थोडं थांबा, दिसेल. माझा मालक समाज आहे. मुलगा म्हणून मी काम करतोय. सगळे बरबटलेले आहेत, त्यामुळे मातब्बर कोण आहे? मराठा समाज हजारोने उमेदवारी अर्ज भरणार आहे. शेवटी मराठ्यांनी डाव टाकलाच असं सांगत जरांगेंनी लोकसभा मतदारसंघात शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत भाष्य केले आहे. 

दरम्यान, माझा अधिकार हिसकावून घ्यायला लागलेत. ज्यावेळी माणूस धुंदीत असतो तेव्हा काय करतो हे लक्षात येत नाही. गोरगरिब मराठ्याने पोस्ट टाकली, गुन्हे दाखल करायचे. दबाव, दडपशाही कितीही टाकली तरी एक इंचही मराठे मागे हटत नाहीत. राज्यभरात बैठक घेतोय. पण बैठकीला हजारो, लाखो मराठे येतायेत. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतायेत. मराठ्यांच्या लेकरांसाठी ते घ्यायला तयार आहे. मी समाजासाठी जीवाची बाजी लावतोय. आम्ही रुपयाही देऊ शकलो नाही तरीही लोकांच्या मनात खोलवर रुजलोय असंही जरांगे पाटील म्हणाले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण