शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

"निजामशाही आणि इंग्रजांनी केली नसेल इतकी दडपशाही गरिब मराठ्यांवर हे सरकार करतंय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 12:51 IST

गोरगरिब मराठ्याने पोस्ट टाकली, गुन्हे दाखल करायचे. दबाव, दडपशाही कितीही टाकली तरी एक इंचही मराठे मागे हटत नाहीत असं मनोज जरांगे म्हणाले.

बीड - Manoj Jarange Patil on Government ( Marathi News ) ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे या अधिसूचनेची अंमलबजावणी यासाठी गेल्या ६ महिन्यापासून संघर्ष सुरू आहे. आतापर्यंत सरकारने त्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. सत्तेचा गैरवापर करून मराठ्यांवर दडपशाही सुरू आहे. सरकार जाणुनबुजून जे निजामशाही, इंग्रजांनीही केली नव्हती त्यापेक्षा जास्त सत्तेचा गैरवापर गोरगरिब मराठ्यांवर करायला लागलेत. मराठे मागे हटणार नाही अशी घणाघाती टीका मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केली. 

बीड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जसजसं मराठ्यांवर दडपशाही, दहशत निर्माण होत आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षाही ताकदीने लोक यायला लागलेत. माझ्या फक्त बैठकीला ४०-५० हजारापेक्षा कमी लोक नाहीत. सरकारनं दिवसाढवळ्या फसवणूक आणि धुळफेक केली. त्यामुळे मराठा समाज ताकदीने पेटून उठला आहे.  आम्ही आणखी काही दिवस किती अन्याय करतायेत हे बघतोय. चौकशी सुरू आहे की नाही याची माहिती नाही. माझ्याकडे कुणी आले नाही. मी बाहेर आलोय, कदाचित चौकशी अहवाल तयार झाला असेल. मला अटक करणार हे एकाने सांगितले. मराठा आणि सत्तेच्या मधला मी काटा आहे त्यामुळे हा काटा काढल्याशिवाय पर्याय नाही असं सरकारला वाटते असा आरोप त्यांनी केला. 

तसेच माझ्याविरोधात अहवाल तयार झाला आहे. आम्ही न टिकणारे १० टक्के आरक्षण घेत नाही म्हणून गुन्हा नोंदवले जातायेत. सरकारने दिलेले आरक्षण टिकणार नाही. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. तुम्हाला मराठा काय आहे हे थोडं थांबा, दिसेल. माझा मालक समाज आहे. मुलगा म्हणून मी काम करतोय. सगळे बरबटलेले आहेत, त्यामुळे मातब्बर कोण आहे? मराठा समाज हजारोने उमेदवारी अर्ज भरणार आहे. शेवटी मराठ्यांनी डाव टाकलाच असं सांगत जरांगेंनी लोकसभा मतदारसंघात शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत भाष्य केले आहे. 

दरम्यान, माझा अधिकार हिसकावून घ्यायला लागलेत. ज्यावेळी माणूस धुंदीत असतो तेव्हा काय करतो हे लक्षात येत नाही. गोरगरिब मराठ्याने पोस्ट टाकली, गुन्हे दाखल करायचे. दबाव, दडपशाही कितीही टाकली तरी एक इंचही मराठे मागे हटत नाहीत. राज्यभरात बैठक घेतोय. पण बैठकीला हजारो, लाखो मराठे येतायेत. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतायेत. मराठ्यांच्या लेकरांसाठी ते घ्यायला तयार आहे. मी समाजासाठी जीवाची बाजी लावतोय. आम्ही रुपयाही देऊ शकलो नाही तरीही लोकांच्या मनात खोलवर रुजलोय असंही जरांगे पाटील म्हणाले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण