शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद राज्यात तृतीय

By admin | Published: March 04, 2015 11:59 PM

यशवंतराज अभियान : देवगड पंचायत समिती विभाग स्तरावर प्रथम

सिंधुदुर्गनगरी : यशवंत पंचायत राज अभियान सन २०१३-१४ मध्ये केलेल्या कामाच्या मूल्यमापनात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळाला आहे, तर पंचायत समिती देवगडने राज्यस्तरावर द्वितीय व विभागस्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला आहे. मंगळवारी मंत्रालयात शासनाच्या ग्रामविकास विभागाने याबाबतचा निकाल जाहीर केला.यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत पंचायत राज प्रशासन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायती यांनी सन २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये केलेल्या कामाचे मूल्यमापन विचारात घेऊन विभागस्तर व राज्यस्तर अशा दोन स्तरांवर यशवंत पंचायत राज अभियान ही अभिनव पुरस्कार योजना राबविण्यात आली. राज्यातील अत्युत्कृष्ट तीन जिल्हा परिषदा, तीन पंचायत समित्या व तीन ग्रामपंचायतींची पुरस्कारासाठी राज्यस्तरावर निवड करण्यात येते. तसेच विभागस्तरावर तीन ग्रामपंचायती व तीन पंचायत समित्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.ही निवड करण्यासाठी तालुकास्तरावर, जिल्हास्तरावर, विभागस्तरावर आणि राज्यस्तरावर पारितोषिक निवड समितीची स्थापना करून या समितीमार्फत निवड केली जाते. यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये राज्यस्तरावर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने तृतीय क्रमांक पटकावला आहे. यासाठी दहा लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिक आहे. राज्यस्तरावर देवगड पंचायत समितीने द्वितीय क्रमांक पटकावला असून, यासाठी १२ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. राज्यस्तरावर वेंगुर्ला तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावला असून, यासाठी एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. विभागस्तरावर झालेल्या मूल्यमापनात कोकण विभागात देवगड पंचायत समिती प्रथम (दहा लाख), मालवण पंचायत समिती द्वितीय (सात लाख), वेंगुर्ला पंचायत समिती तृतीय (पाच लाख) आणि स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच विभागस्तरावर ग्रामपंचायतीच्या झालेल्या मूल्यमापनात परुळेबाजार (वेंगुर्ला) ग्रामपंचायत आणि रायगड जिल्ह्यातील चांदोरे ग्रामपंचायतीला प्रथम पारितोषिक विभागून देण्यात आले आहे. या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी अडीच लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. (प्रतिनिधी)देवगड पंचायत समितीची हॅट्ट्रिकदेवगड पंचायत समितीने मागील आर्थिक वर्षात केलेल्या कामकाजाच्या जोरावर यशवंत पंचायत राज अभियानामध्ये राज्यस्तरावर द्वितीय व विभागस्तरावर सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. या यशात तत्कालीन सभापती सदानंद देसाई, उपसभापती अनघा राणे, सभापती डॉ. मनोज सारंग, उपसभापती स्मिता राणे, गटविकास अधिकारी विजय चव्हाण व पंचायत समिती कर्मचारी यांचा सहभाग आहे.