शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक नसलेले भाग सुरू करण्याबाबत विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 05:32 IST

अनिल परब; मुंबई पूर्ववत करण्याकडेही लक्ष

अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्र सरकारने लॉकडाउनबद्दल निर्णय जाहीर करताच राज्य सरकारही निर्णय जाहीर करेल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले. जरी केंद्र सरकारने लॉकडाउन वाढवला तरी महाराष्ट्रात ज्या भागात लॉकडाउनची गरज नाही ते भाग सुरू करण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्याचेही परब यांनी लोकमत यू ट्युबला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

जे भाग कंटेनमेंट एरिया म्हणून जाहीर केले आहेत ते बंद ठेवायचे आणि बाकीचे विभाग सुरू करायचे याविषयीची तयारी सुरू आहे. मुंबईत शहर बस वाहतूक सेवा आणि लोकल रेल्वे सेवा कोणासाठी सुरू करता येईल? जेणेकरून एकाच वेळी या दोन्ही यंत्रणांवर ताण येणार नाही, यासाठीचे काम सुरू आहे. एकाच वेळी सगळ््यांना मोकळीक दिली तर परिस्थिती गंभीर होईल, ती होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही परब म्हणाले. महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांना अनेक आकर्षक सवलती देण्याची योजना राज्य सरकारने आखली होती. ते काम अंतिम टप्प्यात असतानाच कोरोनाचे संकट आले, त्यामुळे हा विषय मागे पडला.

आता सरकारने पुन्हा सगळे लक्ष तिकडे केंद्रित केल्याची माहितीही परब यांनी दिली. महाराष्ट्रातून १५ लाख लोक परराज्यात गेले आहेत. रोजगाराच्या प्रचंड संधी महाराष्ट्रात जन्म झालेल्या तरुणांना उपलब्ध झाल्या आहेत. फक्त त्या संधी घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. सरकारच्यावतीने कोणत्या क्षेत्रात किती रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील याची माहिती लवकरच दिली जाईल. मुंबई सुरू करण्याकडे आमचे सगळे लक्ष आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस