शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
2
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
3
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
4
Kolhapur: क्लासला जाताना ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलाचा शोध सुरुच
5
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
6
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
7
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
8
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
9
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
10
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
11
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
12
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
13
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
14
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
15
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
16
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
17
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
18
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
19
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
20
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत

'सावरकरांपेक्षा धर्मनिरपेक्ष माणूस सापडणार नाही; इंदिरा गांधींनी त्यांचा सन्मान केला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 08:39 IST

इंदिरा गांधींनी वीर सावरकरांचा सन्मान केला,

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भाजपाने काँग्रेसला सावरकरविरोधी असल्याचं म्हटलं आहे तर काँग्रेस सावरकरविरोधी नव्हे तर त्यांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या विरोधात होती असं म्हटलं आहे. अशातच सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापेक्षा धर्मनिरपेक्ष माणूस सापडणार नाही, इंदिरा गांधीही सावरकरांच्या अनुयायी होत्या असं विधान केलं आहे.

याबाबत बोलताना रणजीत सावरकर म्हणाले की, इंदिरा गांधींनी वीर सावरकरांचा सन्मान केला, मला ठामपणे वाटते की त्या सावरकरांच्या अनुयायी आहेत कारण त्यांनी पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले, सैन्य आणि परराष्ट्र संबंध इंदिरा गांधी यांनी मजबूत केले, त्यांनी अणुचाचणी देखील केली. हे सर्व नेहरू आणि गांधींच्या तत्वज्ञानाविरूद्ध होतं असंही त्यांनी सांगितले 

तसेच असदुद्दीन औवेसी यांनी सावरकरांच्या विचाराचं पालन केले पाहिजे. तुम्ही हिंदू किंवा मुस्लीम नसून भारतीय आहात. संसदेत जात, धर्म, लिंग वगैरे वगळता सर्वांनी एकत्र यावं अशी सावरकरांची अपेक्षा केली. सावरकरांपेक्षा अधिक धर्मनिरपेक्ष माणूस सापडणार नाही असा टोला रणजीत सावरकरांनी औवेसी यांना लगावला आहे. 

दरम्यान, इंग्रजांकडे माफी मागणाऱ्या सावरकरांना भारतरत्न दिला तर देशासाठी बलिदान देणाऱ्या भगतसिंग यांच्यासह इतर क्रांतीकारकांचा तो अपमान ठरेल. भाजपाने सावरकरांना भारतरत्न देण्याचा संकल्प केला आहे. त्यानंतर मात्र हा पुरस्कार कोणत्याच देशभक्ताला देऊ नये, असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कौन्सिल सदस्य व विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार यांनी गुरुवारी नगर येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.  

विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून जाहीर करण्यात आलेल्या संकल्पपत्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा उल्लेख करण्यात आला होता. यामध्ये राज्याची अस्मिता आणि अभिमानास्पद वारसा जोपसण्यासाठी भाजपाने महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्याती सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने गौरव व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिले होतं.  

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरIndira Gandhiइंदिरा गांधीIndiaभारतPakistanपाकिस्तान