शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'त्या' बैठकीला NCP चे ३ आणि आमचे ३ असे...; पहाटेच्या शपथविधीपूर्वी काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 14:13 IST

२०१९ ला पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर ज्या काही गोष्टी बदलल्या त्याचे उत्तर शरद पवार आणि अजित पवार चांगल्यारितीने देऊ शकतात असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

मुंबई - भाजपा आणि शरद पवारांची चर्चा झाली होती याचा मीही साक्षीदार आहे. पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांची परवानगी होती. २०१४ ला विश्वासदर्शक ठराव भाजपानं मांडला त्यावेळी अदृश्य हात कुणाचे होते हे सगळ्यांना माहिती. काही बैठकांमध्ये मीदेखील होतो. ती कागदे आजही द्यायला तयार आहे. त्यांच्याकडून ३ आणि आमच्याकडून ३ प्रतिनिधी होते. भाजपा-राष्ट्रवादी सत्तेत येण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगितले ते तथ्यहीन नाही असा दावा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. 

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस कधीही कदापि चुकीची माहिती ठेवणार नाहीत. हे सांगितल्याने भाजपाच्या जागा वाढणार आहेत का? शरद पवार आणि आम्ही सरकार बनवणार होतो ते सांगितल्याने भाजपाच्या जागा वाढणार नाहीत. २०१९ च्या निकालाच्या अगोदर २०१६-१७ मध्ये राष्ट्रवादीचे ३ आणि भाजपाचे ३ प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली होती. त्या नेत्यांची नावे सांगणार नाही. आम्ही चर्चेला बसलो होतो. पवारांच्या परवानगीने पहाटेचा शपथविधी झाला हे फडणवीसांनी म्हटलं त्यावर नक्कीच विश्वास आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच २०१९ ला पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर ज्या काही गोष्टी बदलल्या त्याचे उत्तर शरद पवार आणि अजित पवार चांगल्यारितीने देऊ शकतात. अजित पवार एवढे मोठे पाऊल कसं उचलू शकतात हे राष्ट्रवादीचे नेते बोलतात. सर्व प्रतिष्ठा पणाला लावून ते येतील असं कुणाला वाटत नाही. स्थिर सरकारच्या दिशेने आपल्याला जायचंय हे सातत्याने अजित पवार म्हणत होते. भिजत घोंगडे ठेऊन राज्यात स्थिर सरकार देऊ शकणार नाही असं पवार सातत्याने बोलत होते असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं. 

दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार यांच्यात २ गट असतील असे वाटत नाही. कारण अजितदादांचे जेव्हा भाषण ऐकतो त्यांच्या भाषणात पवारांचा उल्लेख आदराने नेहमीच केला जातो. शब्दातून सन्मान लक्षात येतो. अजित पवार-शरद पवार यांच्यात मतभेद असतील असं दुरान्वये वाटत नाही. राजकारणात काहीही होऊ शकते. काँग्रेस-शिवसेना एकत्र येतील असा विचारही कुणी केला नाही. काँग्रेससोबत जाण्यास बाळासाहेबांचा तीव्र विरोध होता. राजकारणात भाजपा-काँग्रेस एकत्र येऊ शकत नाही हे खरे. अजित पवारांसोबत शपथविधी झाला होता त्यामुळे ते येऊ शकतात की नाही हे सर्वांना ठाऊक आहे असंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.  

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपाcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवार