शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' बैठकीला NCP चे ३ आणि आमचे ३ असे...; पहाटेच्या शपथविधीपूर्वी काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 14:13 IST

२०१९ ला पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर ज्या काही गोष्टी बदलल्या त्याचे उत्तर शरद पवार आणि अजित पवार चांगल्यारितीने देऊ शकतात असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

मुंबई - भाजपा आणि शरद पवारांची चर्चा झाली होती याचा मीही साक्षीदार आहे. पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांची परवानगी होती. २०१४ ला विश्वासदर्शक ठराव भाजपानं मांडला त्यावेळी अदृश्य हात कुणाचे होते हे सगळ्यांना माहिती. काही बैठकांमध्ये मीदेखील होतो. ती कागदे आजही द्यायला तयार आहे. त्यांच्याकडून ३ आणि आमच्याकडून ३ प्रतिनिधी होते. भाजपा-राष्ट्रवादी सत्तेत येण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगितले ते तथ्यहीन नाही असा दावा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. 

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस कधीही कदापि चुकीची माहिती ठेवणार नाहीत. हे सांगितल्याने भाजपाच्या जागा वाढणार आहेत का? शरद पवार आणि आम्ही सरकार बनवणार होतो ते सांगितल्याने भाजपाच्या जागा वाढणार नाहीत. २०१९ च्या निकालाच्या अगोदर २०१६-१७ मध्ये राष्ट्रवादीचे ३ आणि भाजपाचे ३ प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली होती. त्या नेत्यांची नावे सांगणार नाही. आम्ही चर्चेला बसलो होतो. पवारांच्या परवानगीने पहाटेचा शपथविधी झाला हे फडणवीसांनी म्हटलं त्यावर नक्कीच विश्वास आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच २०१९ ला पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर ज्या काही गोष्टी बदलल्या त्याचे उत्तर शरद पवार आणि अजित पवार चांगल्यारितीने देऊ शकतात. अजित पवार एवढे मोठे पाऊल कसं उचलू शकतात हे राष्ट्रवादीचे नेते बोलतात. सर्व प्रतिष्ठा पणाला लावून ते येतील असं कुणाला वाटत नाही. स्थिर सरकारच्या दिशेने आपल्याला जायचंय हे सातत्याने अजित पवार म्हणत होते. भिजत घोंगडे ठेऊन राज्यात स्थिर सरकार देऊ शकणार नाही असं पवार सातत्याने बोलत होते असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं. 

दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार यांच्यात २ गट असतील असे वाटत नाही. कारण अजितदादांचे जेव्हा भाषण ऐकतो त्यांच्या भाषणात पवारांचा उल्लेख आदराने नेहमीच केला जातो. शब्दातून सन्मान लक्षात येतो. अजित पवार-शरद पवार यांच्यात मतभेद असतील असं दुरान्वये वाटत नाही. राजकारणात काहीही होऊ शकते. काँग्रेस-शिवसेना एकत्र येतील असा विचारही कुणी केला नाही. काँग्रेससोबत जाण्यास बाळासाहेबांचा तीव्र विरोध होता. राजकारणात भाजपा-काँग्रेस एकत्र येऊ शकत नाही हे खरे. अजित पवारांसोबत शपथविधी झाला होता त्यामुळे ते येऊ शकतात की नाही हे सर्वांना ठाऊक आहे असंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.  

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपाcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवार