शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसाठी निवडण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह असे काहीच नाही, शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 18:45 IST

शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचन या उपक्रमांतर्गत निवडण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये कोणत्याही प्रकारचा अश्लिल वा आक्षेपार्ह मजकूर नाही, विद्यार्थ्यांसाठी निवडण्यात आलेल्या ‘बाल नचिकेता’ व ‘भगवान वेदव्यास’ या पुस्तकामध्ये कुठलाही आक्षेपार्ह मजकूर नसल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

मुंबई  - शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचन या उपक्रमांतर्गत निवडण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये कोणत्याही प्रकारचा अश्लिल वा आक्षेपार्ह मजकूर नाही, विद्यार्थ्यांसाठी निवडण्यात आलेल्या ‘बाल नचिकेता’ व ‘भगवान वेदव्यास’ या पुस्तकामध्ये कुठलाही आक्षेपार्ह मजकूर नसल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

विद्यार्थ्यांसाठी निवडण्यात आलेल्या पुस्तकांची खरेदी प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, या पुस्तकांचे अद्यापही विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आलेले नाही, असे स्पष्ट करतानाच  तावडे म्हणाले की, महाराष्ट्र विद्या प्राधिकारण, पुणे यांच्यामार्फत पूरक वाचन पुस्तक योजनेतंर्गत नेमण्यात आलेल्या आशय समितीकडून या पुस्तकांची निवड करण्यात आलेली आहे. विरोधकांनी जे पुस्तक काल दाखविले ते पुस्तक जुने असून ते कुंभमेळ्यामध्ये वाटण्यात आले होते. त्या पुस्तकांतील मजूकर विद्यार्थ्यांसाठी निवडण्यात आलेल्या बाल नचिकेता या पुस्तकामध्ये समाविष्ट नसल्याचेही  तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले. केवळ चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप करण्याची विरोधकांना सवयच झाली असल्याचा टोलाही तावडे यांनी लगावला.

भारतीय विचार साधना कडून २० रुपयांची पुस्तके ५० रुपये किंमतीने खरेदी करण्यात आलेला विरोधकांचा आरोप खोडून काढताना श्री. तावडे यांनी स्पष्ट केले की, जी पुस्तक २० रु. दराने मिळत आहेत ती ब्लॅक ॲण्ड व्हाईट व लहान आकारात असून,  या पुस्तकाची छपाई साध्या कागदावर करण्यात आलेली आहे. तर ५० रुपयांची पुस्तके ही मोठ्या आकाराची असून,  त्यासाठी आर्ट पेपर चा व अधिक जाडीचा जीएसएम चा कागद वापरण्यात आलेला आहे, ही पुस्तके रंगीत व फोर कलर ची आहे, असेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे फ्लिप कार्ट, ॲमेझॉन या ऑन लाईन वेबपोर्टल च्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या पुस्तकांच्या किंमती या आवृत्ती नुसार कमी-जास्त असतात, असेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

एकभाषिक पूरक वाचन पुस्तक योजनेतंर्गत समितीने निवडण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये छत्रपती राजा शिवाजी महाराज यांची सुमारे ३ लाख ५० हजार पुस्तके, डॉ.एपीजे अब्दुल कलाम व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोघांच्या जीवनावरील सुमारे २ लाख पुस्तक, छत्रपती शाहू महाराज यांची सुमारे २ लाख पुस्तके यांच्यासह स्वामी विवेकानंद, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी यांच्यासह संत कबीर, संत मिराबाई, संत एकनाथ, संत नामदेव आदींची ही पुस्तके समाविष्ट करण्यात आलेली आहेत, त्यामुळे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शीर्षकाची लाखो पुस्तके खरेदी करण्यात आलेला विरोधकांचा दावा निराधार असल्याचे ही तावडे यांनी सांगितले.

शालेय विद्यार्थ्यांना शाळेच्या पाठ्यपुस्तकांबरोबरच अवांतर वाचनासाठी शालेय शिक्षण विभागाकडून वेगवेगळी पुस्तक खरेदी केली जातात, यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा असा हेतू असतो. विद्यार्थ्यांसाठी खरेदी करण्यात आलेल्या पुस्तकामध्ये संतकथा व ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांवरील पुस्तकांचाही यामध्ये समावेश असून, धार्मिक व पौराणिक पुस्तकेही निवडण्यात आलेली आहेत, असेही  तावडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार