शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

शेतीसाठी निधीची कमतरता नाही - गिरीश महाजन

By admin | Updated: July 11, 2017 17:50 IST

शेतीसाठी निधीची कमतरता नाही, शेतीपर्यंत पाणी पोहोचवायचे आहे. 57-58 हजार कोटींचे नियोजन आहे अशी माहिती जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 11- शेतीसाठी निधीची कमतरता नाही, शेतीपर्यंत पाणी पोहोचवायचे आहे. 57-58 हजार कोटींचे नियोजन आहे अशी माहिती जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत वॉटर समिट २०१७’च्या प्रश्नोत्तरातच्या दुस-या सत्रात दिली. ‘जलसमृद्ध महाराष्ट्र’ निर्माण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत ‘लोकमत समूहा’तर्फे मंगळवारी अंधेरीच्या ‘आयटीसी मराठा’ हॉटेलमध्ये वॉटर समिटचे आयोजन करण्यात आले आहे. 
कोकणातील एकाच ठेकेदाराला काम मिळायची, नियमबाह्य कामे दिली गेली. अंतिम टप्प्यातील कामे पूर्ण करत आहोत असे गिरीश महाजन म्हणाले. त्यांच्या हस्ते वॉटर समिटचे उदघाटन झाले. धरणांमधील गाळ काढून पुर्नजीवन करायचे आहे. रेस्ट हाऊस बीओटी तत्वावर देणार आहोत. 
 
आणखी वाचा 
 
हातनूर धरण 50 टक्के गाळाने भरले आहे. नवीन धरण बांधणे अवघड बनलयं. उजनीचे गाळ काढण्याचे टेंडर काढलयं. तेथे वाळू, माती दोन्ही आहेत. त्यातून धरणांची क्षमता वाढेल असे गिरीष महाजन म्हणाले. 
 
सिंचन घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई कधी होणार या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, चौकशी सुरु आहे. गोसीखुर्द मध्ये नवे ठेकेदार आलेत, तुम्हाला अपेक्षित कारवाई नक्की होईल. काही ठेकेदारांवर कारवाई केली आहे. राज्यातील शेतीची सिंचन क्षमता वाढवायची आहे, शेतक-यांना कर्जमाफी नव्हे कायमचे कर्जमुक्त करायचेय असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन उदघाटनाच्या सत्रात बोलताना म्हणाले. 173 प्रकल्पांना सुधारीत मान्यता दिली आहे. तहान लागल्यावर विहीर खोदून उपयोग नाही, पाऊस चांगला झाला की लोकसहभाग मंदावतो, टँकरमुक्तीसाठी प्रयत्न आहेत, पाणी मुबलक असेल तर कितीही द्या ही भूमिका चुकीची आहे. आपल्याला पाण्याची योग्य बचत करावी लागेल. इस्रायलसारखे पाणी बचातीचे नियोजन करण गरजेचं आहे. लोकांमध्ये साक्षरता यायला हवी, म्हणून अभियान राबवत असल्याचेही गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.
 
पाण्याचे नियोजन करण्यासाठी यापुढे पाणी मोजून दिले जाईल. शेतीसाठी 75 टक्के, पिण्यासाठी 15 टक्के, उद्योगांसाठी 10 टक्के पाणी वापरणार. देखभालीसाठी सहापट अधिक पैसे उपलब्ध केले आहेत. सुक्ष्म सिंचनाचा वापर अधिक करण्यावर भर दिला जाईल. यंदा आम्ही विक्रमी सिंचन केलं. 41 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचा विक्रम केला. देखभाल, दुरुस्तीसाठी पाणीपट्टीचा पैसा वापरला. जलसंपदा खात किती मोठं आहे, याची सर्वांना कल्पना आहे. आम्ही चांगले निर्णय घेतले. अर्थव्यवस्था या खात्यावर अवलंबून आहे असे त्यांनी सांगितले. 
 
भूसंपादनसाठीचे धोरण कसे राबवतोय या प्रश्नावर ते म्हणाले की, पाच पट अधिक पैसा देतोय. सोळा हजार हेक्टर जमीनीचे संपादन केले आहे. जमीनीखालून पाणी नेणार आहोत, त्यातून गळती वाचेल, भूसंपादनही कमी होईल. प्रकल्पांसाठी पैसा उपलब्ध होतोय. 275 प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण करायचे आहेत, साडेसात लक्ष हेक्टर जमीन अजून सिंचनाखाली आणायची आहे.