मुंबई : पश्चिम उपनगरातील रहिवाशांना प्रवासासाठी उपयुक्त पर्याय बनलेल्या मेट्रो-1साठी भाडेस्थिरता समिती स्थापन करण्यास शासनाला अद्याप ‘मुहूर्त’ मिळालेला नाही.
वर्सोवा ते घाटकोपर मार्गावर धावणा:या मेट्रो-1ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र त्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिलेल्या तिकीट दराचा प्रस्ताव रिलायन्स कंपनी संचलित ‘एमएमओपीएल’ने बनविलेला असून, त्याला शासनाने विरोध दर्शवीत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या पाश्र्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मेट्रोच्या भाडेस्थिरता समितीबाबत मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडे माहितीची विचारणा केली होती. त्यावर प्रशासनाने अद्याप समितीची स्थापना झालेली नसून त्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे कळविले. मेट्रो-1च्या प्रति किलोमीटर अंतर भाडय़ाबाबत विचारलेल्या प्रश्नावर नगरविकास विभागाचे उपसचिव एस. के. सालीमठ यांनी 3 सप्टेंबर 2क्13 रोजी एमएमआरडीएला दिलेल्या पत्रची प्रत देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)