शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

गणिताची अजिबात आवश्यकता नाही, म्हणणे चुकीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2017 18:27 IST

दैनंदिन व्यवहारांतील आकडेमोड येण्यासाठी गणिताची गरज आहे; त्यामुळे कला शाखा अथवा व्यवसायिक शिक्षण घेण्यासाठी गणिताची अजिबात आवश्यकता नाही, असे म्हणणे चुकीचे आहे

- आर. व्ही. भोसलेदैनंदिन व्यवहारांतील आकडेमोड येण्यासाठी गणिताची गरज आहे; त्यामुळे कला शाखा अथवा व्यवसायिक शिक्षण घेण्यासाठी गणिताची अजिबात आवश्यकता नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. हा विषय ऐच्छिक ठेवण्याऐवजी त्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड कशी निर्माण होईल, या दृष्टीने शासन आणि शिक्षकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पूर्वी कला (आर्टस) शाखेतून मॅथेमेटिक्स विषय घेऊन बी. ए. करता येत होते. कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयात या अभ्यासक्रमाची सुविधा होती. बीजगणित, भूमिती, अंकगणित हे विषय शिक्षणामध्ये महत्त्वाचे आहेत. किमान एलिमेंटरी (प्राथमिक) गणिताचे तरी ज्ञान असणे आवश्यक आहे. इतर विषयांच्या तुलनेत गणितामध्ये एकच उत्तर असते. शिवाय ते फायद्याचे ठरते; कारण, उत्तर बरोबर असल्यास पैकीच्या पैकी गुण मिळतात; त्यामुळे हा विषय स्कोअरिंग करण्यासाठी महत्त्वाचा आहे. गणिताचे ज्ञान नसल्यास संबंधित विद्यार्थी अनेकदा व्यावहारिक ज्ञानामध्ये कमी पडण्याची भीती असते. दहावीमध्ये इंग्रजी आणि गणितामध्ये अनुुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असून, ते वास्तव आहे. गणिताची अनेक विद्यार्थ्यांना भीती वाटते, हेदेखील खरे आहे. मात्र, यासाठी दहावीला हा विषय ऐच्छिक ठेवणे योग्य ठरणारे नाही. त्याऐवजी गणित विषयाची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करणे आवश्यक आहे. या दृष्टीने शिक्षकांनी सोप्या पद्धतीने आणि विविध क्लृप्त्यांद्वारे गणित विषय शिकविणे अधिक उपयुक्त ठरणारे आहे.शिक्षकांना प्रशिक्षण गरजेचेसोप्या, सहज पद्धतीने गणित आणि सोप्या भाषेत इंग्रजी शिकविण्यासाठी शाळा पातळीवरील शिक्षकांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. ज्या शिक्षकांना गणित, इंग्रजी विषय शिकविण्याची आवड आहे, त्यांचीच यासाठी निवड करणे अधिक चांगले ठरणारे आहे.गणित, इंग्रजीच्या शिक्षकांची नियुक्ती करताना त्यांचे पदवी, पदव्युत्तर शिक्षणाचे गुण पाहण्याऐवजी ते संबंधित विषय विद्यार्थ्यांना समजेल अशा शैलीत अथवा पद्धतीने शिकवितात का? हे जाणून घ्यावे. त्यांच्या नियुक्तीमध्ये याचा विचार व्हावा. सध्या संगणकीय युग आहे. त्यामुळे बायनरी (सांकेतिक) गणिताचे ज्ञान विद्यार्थ्यांना शालेय पातळीवर द्यावे.

(लेखक कोल्हापूरस्थित ज्येष्ठ अवकाश संशोधक आहेत)