फोडाफोडी करून दिल्लीत सरकार नको

By Admin | Updated: July 20, 2014 01:47 IST2014-07-20T01:47:51+5:302014-07-20T01:47:51+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी भाजपाला दिल्यामुळे दिल्लीतील सत्ता स्थापनेला नागपुरातून ब्रेक लागल्याचे समजते.

There is no government in Delhi by blooperation | फोडाफोडी करून दिल्लीत सरकार नको

फोडाफोडी करून दिल्लीत सरकार नको

मुंबई : काँग्रेसचे वा इतर कुठल्याही पक्षाचे आमदार फोडून भाजपाने दिल्लीत सरकार स्थापन करू नये, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी भाजपाला दिल्यामुळे दिल्लीतील सत्ता स्थापनेला नागपुरातून ब्रेक लागल्याचे समजते.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी नागपुरात सरसंघचालक डॉ.भागवत यांची भेट घेतली, तेव्हा हा सल्ला देण्यात आल्याचे सूत्रंनी सांगितले. दिल्लीत काँग्रेसचे सहा आमदार फोडण्यासाठी भाजपाने प्रत्येकी सहा कोटी रुपयांची ऑफर दिली असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी नुकताच केला आहे. सूत्रंनी सांगितले की, घोडेबाजाराच्या आरोपापासून वाचण्याचा सल्ला सरसंघचालकांनी शहा यांना दिला. दिल्लीत बहुमताअभावी कुणाचेही सरकार स्थापन करणो शक्य नाही. त्यामुळे तेथे महाराष्ट्र, झारखंड आणि हरयाणासोबत निवडणूक घ्यावी, असेही त्यांनी सुचविल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीतील मोठय़ा यशाचा फायदा तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाला होणार आहे. दिल्लीत निवडणूक घेतली तर तसाच फायदा होईल. आम आदमी पार्टीबाबत दिल्लीकरांचा भ्रमनिरास झाला आहे, असे मतही डॉ.भागवत यांनी व्यक्त केल्याची माहिती आहे. दिल्लीत काँग्रेसचे सहा आमदार फोडण्याची पूर्ण तयारी भाजपाने केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौ:याहून परतल्यानंतर त्यांच्या संमतीने राज्य सरकार स्थापण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाईल, असे आधी म्हटले जात होते. मोदी परदेशातून परतल्याला तीन दिवस उलटले तरी सरकार स्थापण्याच्या हालचाली दिसत नाहीत. याला मुख्य कारण तोडफोडीचे राजकारण करून सत्ता स्थापण्यास रा.स्व.संघाने केलेला विरोध असल्याचे म्हटले जात आहे. 
 

 

Web Title: There is no government in Delhi by blooperation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.