शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
5
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
6
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
7
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
8
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
9
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
10
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
11
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
12
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
13
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
14
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
15
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
16
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
17
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
18
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
19
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
20
Shirish Valsangkar: वळसंगकर रुग्णालयासह 'त्या' चारही डॉक्टरांची बँक खाती तपासा, मनीषा मानेचं पोलिसांना पत्र

नौका दर्यात उतरल्याच नाही

By admin | Updated: August 2, 2016 03:07 IST

मच्छीमारांच्या जीवितास असणारा धोका पाहता पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी वरील एकही नौका सोमवारी समुद्रात उतरली नाही.

पालघर : समुद्रातील मासेमारीला जाण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने १ आॅगस्ट ला परवानगी दिली असली तरी समुद्र पूर्ण खवळलेला आणि वादळी वारे मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने मच्छीमारांच्या जीवितास असणारा धोका पाहता पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी वरील एकही नौका सोमवारी समुद्रात उतरली नाही. त्यामुळे शासनाने समुद्रात मच्छिमारीसाठी दिलेली तारीख व कालावधी किती चुकीचा आहे हे निसर्गाने आज दाखवून दिले.महाराष्ट्र मासेमारी अधिनियम १९८१ अंतर्गत महाराष्ट्र शासनाने १४ आॅगस्ट १९६६ मधील दुरु स्ती नुसार सागरी मासेमारी (पावसाळी बंदी) कालावधी १० जून ते १५ आॅगस्ट किंवा नारळी पोर्णिमा या पैकी प्रथम येईल तो दिवस असा जाहीर केला होता. परंतु विधिवत सागराची पूजाअर्चा करीत नारळ अर्पण करूनच पारंपरिक मच्छीमार आपल्या नौका नारळी पोर्णिमे नंतरच समुद्रात पाठवीत होते.पावसाळी मासेमारी बंदी कालावधी काळात लहान जन्माला आलेल्या पिल्लांचे संवर्धन होऊन नद्या द्वारे मिळणाऱ्या खनिज द्रव्यामुळे प्लवंगाची वाढ होत मत्स्य खाद्य मुबलक प्रमाणात निर्माण होते. या काळात माशांची चांगली वाढ होत असल्याने मत्स्यसंपदा टिकून राहावी, याची दक्षता पारंपरिक मच्छीमार घेत आले होते. तसेच १ मे ते १५ मे दरम्यान स्वयंस्फूर्तिने आपली मासेमारी बंद करीत होते. अशा वेळी मत्स्यसंपदेत होणारी घट आणि अनेक माश्याच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने केंद्र आणि राज्य शासनाने पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत वाढ करने अपेक्षित असताना उलट ९२ दिवसाचा बंदी ६१ दिवसावर आणून ठेवला होता. या निर्णयामध्ये भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप मच्छिमार संघटना अनेक वर्षापासून करीत आहेत. या वर्षी पदुम विभागाच्या उपसचिवांनी १२ नॉटिकल समुद्राच्या बाहेरील क्षेत्राबाहेर पर्ससीननेट धारकांना आपल्या अधिकाराचे बाहेर जाऊन मासेमारी करण्याची परवानगी देऊन आरोपात तथ्य असल्याचे जणू दाखवूनच दिले आहे. (प्रतिनिधी)>वेधशाळेकडून धोक्याचा इशारासातपाटी, डहाणू, वसई, उत्तन बंदरातून माठ्या प्रमाणात मासेमारी केली जात असून शासनाच्या आदेशान्वये १ आॅगस्ट पासून पावसाळी बंदी कालावधी संपून मासेमारीसाठी जाण्या साठी डिझेल, बर्फभरून काही नौका सज्ज झाल्या असताना समुद्रात ५५ ते ६० किलोमीटर प्रति तासाने वादळी वारे वाहून समुद्र खवळलेला राहणार असल्याचा इशारा वेध शाळेने दिल्याने सर्व नौका बंदरात थांबून आहेत. केंद्र आणि राज्य शासनाने १ आॅगस्ट पासून मासेमारीसाठी दिलेली परवानगी ही अतिघाईची आणि चुकीची असल्याचे सोमवारी निसर्गाने रौद्र रूप धारण करीत दाखवून दिले असल्याची प्रतिक्रिया मच्छीमार विश्वास पाटील यांनी लोकमत कडे व्यक्त केली.