शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 09:49 IST

Government Employee: राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याची संघटनांची मागणी असताना ती पूर्ण न करता निवृत्तीनंतरही कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने सेवेत घेता येईल, असा निर्णय सरकारने घेतला आहे.

मुंबई : राज्य सरकारीकर्मचारी अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याची संघटनांची मागणी असताना ती पूर्ण न करता निवृत्तीनंतरही कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने सेवेत घेता येईल, असा निर्णय सरकारने घेतला आहे. करार पद्धतीने सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना सेवेत घेण्याची पद्धत याआधीही होती या सरकारने ती कायम ठेवली आहे.क आणि ड वर्ग कर्मचाऱ्यांची अशा पद्धतीने भरती केली जाणार नाही, मात्र अ आणि ब वर्ग अधिकाऱ्यांची भरती वयाच्या ६५ वर्षांपर्यंत आणि गरज भासल्यास ७० वर्षांपर्यंतही करण्यास या निर्णयाद्वारे अनुमती देण्यात आली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे. 

कर्मचारी संघटनांचा सवाल५८ वर्षांनंतर कर्मचाऱ्यांची काम करण्याची क्षमता तेवढी राहत नाही, असे कारण देत राज्य सरकार निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यास मंजुरी देत नाही, तर मग वयाच्या ६५-७० पर्यंत त्यांची सेवा कशी काय घेते, असा सवाल आता कर्मचारी/अधिकारी संघटना करत आहेत.  करार पद्धतीने सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना सेवेत घेण्याची पद्धत याआधीही होती या सरकारने ती कायम ठेवली आहे. 

आदेशात काय म्हटले आहे? कार्यालयातील/आस्थापनेवरील एकूण मंजूर पदसंख्येच्या जास्तीतजास्त १० टक्के इतक्या अधिकाऱ्यांना करार पद्धतीने नियुक्त करता येईल. एकावेळी एक वर्षासाठीच करार पद्धतीने नियुक्ती. दरवर्षी कराराचे नूतनीकरण.करार पद्धतीने नियुक्त व्यक्ती वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंतच कार्यरत राहू शकतील, त्यानंतरही त्याची सेवा घेणे आवश्यक वाटले तर प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने वयाच्या ७० वर्षापर्यंतही सेवा घेता येईल.निवृत्तीच्या वेळी असलेले मूळ वेतन व त्यावरील महागाई भत्त्यासह मिळणाऱ्या रकमेएवढी रक्कम ही करार पद्धतीने नियुक्त अधिकाऱ्यांना पारिश्रमिक म्हणून दिली जाईल.ज्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना जुने निवृत्तीवेतन मिळत नाही त्यांना करार पद्धतीने नियुक्त करताना सेवानिवृत्तीपूर्वी मिळत असलेल्या वेतनाच्या आधारे त्यांची मानीव निवृत्तीवेतनाची रक्कम आणि त्यावर प्रचलित दराने महागाई भत्त्याची रक्कम केवळ हिशेबासाठी गृहित धरून त्या आधारे त्यांचे मासिक पारिश्रमिक निश्चित केले जाईल. 

आजच्या आदेशाने सरकारने आमची मागणी एकप्रकारे धुडकावली आणि वरून मीठ चोळले. या शासन निर्णयाची अंमलबजावणी रोखावी. - विश्वास काटकर, मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे नेते. 

असे निर्णय घेण्यापेक्षा राज्य सरकारने नियमित कर्मचारी, अधिकारी भरती केली पाहिजे. तसेच, अडलेल्या पदोन्नतींचा मार्ग मोकळा करण्यावर भर दिला पाहिजे.- समीर भाटकर, सरचिटणीस, राजपत्रित अधिकारी महासंघ.

टॅग्स :Employeeकर्मचारीGovernmentसरकार