शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

पुनर्विचार याचिकेतूनही काही फायदा नाहीच, ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 07:12 IST

राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार असेल तर त्यातून हाती काही लागण्याची शक्यता नाही, राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांचे मत.

मुंबई : ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण देतानाच जी मूलभूत पाऊले उचलायला हवी होती ती उचलली गेली नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी ओबीसी आरक्षणाबाबत दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी राज्य सरकारकडून केली गेली नाही. आता राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार असेल तर त्यातून हाती काही लागण्याची शक्यता नाही, असे मत राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. 

सर्वोच्च न्यायालयाने वारंवार सांगितले की ट्रिपल टेस्ट करा. समर्पित आयोग स्थापन करा, त्याच्यामार्फत ओबीसींचे राजकीय मागासलेपण सिद्ध करणारा इम्पिरिकल डाटा तयार करा आणि एससी, एसटींचे आरक्षण वगळून ५० टक्क्यांच्या मर्यादेत ओबीसींना आरक्षण द्या, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेले होते. 

घटनात्मक चौकटीत आरक्षण बसवायला हवे होते एकाहून अधिक निर्णयांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले असताना आता राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली तरी फारसे काही हाती लागणार नाही. ओबीसी आरक्षणाशिवायच निवडणुका घ्याव्या लागतील, असे मतही त्यांनी व्यक्त केले. 

ओबीसी आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला होता मात्र ते करताना त्याला घटनात्मक चौकटीत बसविण्याची खबरदारी सुरुवातीलाच घ्यायला हवी होती आणि समजा ती सुरुवातीला घेतली गेली नव्हती तर नंतरच्या काळात इतक्या वर्षांमध्ये हे आरक्षण घटनात्मक चौकटीत बसवायला हवे होते, असेही ॲड. अणे म्हणाले.

टॅग्स :Shrihri Anneश्रीहरी अणेMaharashtraमहाराष्ट्रOBCअन्य मागासवर्गीय जाती