शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
20
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्विचार याचिकेतूनही काही फायदा नाहीच, ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 07:12 IST

राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार असेल तर त्यातून हाती काही लागण्याची शक्यता नाही, राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांचे मत.

मुंबई : ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण देतानाच जी मूलभूत पाऊले उचलायला हवी होती ती उचलली गेली नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी ओबीसी आरक्षणाबाबत दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी राज्य सरकारकडून केली गेली नाही. आता राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार असेल तर त्यातून हाती काही लागण्याची शक्यता नाही, असे मत राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. 

सर्वोच्च न्यायालयाने वारंवार सांगितले की ट्रिपल टेस्ट करा. समर्पित आयोग स्थापन करा, त्याच्यामार्फत ओबीसींचे राजकीय मागासलेपण सिद्ध करणारा इम्पिरिकल डाटा तयार करा आणि एससी, एसटींचे आरक्षण वगळून ५० टक्क्यांच्या मर्यादेत ओबीसींना आरक्षण द्या, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेले होते. 

घटनात्मक चौकटीत आरक्षण बसवायला हवे होते एकाहून अधिक निर्णयांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले असताना आता राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली तरी फारसे काही हाती लागणार नाही. ओबीसी आरक्षणाशिवायच निवडणुका घ्याव्या लागतील, असे मतही त्यांनी व्यक्त केले. 

ओबीसी आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला होता मात्र ते करताना त्याला घटनात्मक चौकटीत बसविण्याची खबरदारी सुरुवातीलाच घ्यायला हवी होती आणि समजा ती सुरुवातीला घेतली गेली नव्हती तर नंतरच्या काळात इतक्या वर्षांमध्ये हे आरक्षण घटनात्मक चौकटीत बसवायला हवे होते, असेही ॲड. अणे म्हणाले.

टॅग्स :Shrihri Anneश्रीहरी अणेMaharashtraमहाराष्ट्रOBCअन्य मागासवर्गीय जाती