शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अपक्ष नाही, कोणाला पाठिंबाही नाही, कोणाला पाडायचे त्याला पाडा ! मनोज जरांगे यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 06:52 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासह मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) इतर मागण्यांबाबत जे उमेदवार काम करतील, त्यांना मतदान करा. तुम्हाला कोणाला पाडायचे ते पाडा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले.

जालना / वडीगोद्री -  वेळ कमी पडल्याने अपेक्षित अहवाल आलेले नाहीत. त्यामुळे कोणाच्या हट्टापायी उमेदवार देऊन मी समाजाला चिखलात ढकलू शकत नाही. मी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभे करणार नाही. कोणाला पाठिंबा देणार नाही. आपण विधानसभेची तयारी सुरू करू मराठा आणि कुणबी एकच आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासह मराठा आरक्षणाच्या इतर मागण्यांबाबत जे उमेदवार काम करतील, त्यांना मतदान करा. तुम्हाला कोणाला पाडायचे ते पाडा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले.

मनोज जरांगे-पाटील यांनी गावागावांतून आलेल्या अहवालांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी अंतरवाली सराटी येथे बैठक घेतली. दिवसभरात आलेल्या अहवालांचा अभ्यास करून लोकसभेसाठी उमेदवार न देण्याचा अंतिम सार काढला. आरक्षण आणि लेकरांचे वाटोळे होऊ नये यासाठी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार द्यायचा नाही. आपण विधानसभेची तयारी आतापासूनच सुरू करू, असे जरांगे म्हणाले.

आरक्षण आणि लेकरांचे वाटोळे होऊ नये म्हणून...आरक्षणासाठी महिलांवर लाठीहल्ला झाला. हजारो युवकांवर गुन्हे दाखल झाले. शेकडो युवकांचे बळी गेले. त्यामुळे ज्यांनी आमच्यावर अन्याय केला त्यांना धडा शिकविण्यासाठी निवडणूक लढवायची, असे मत समाजाचे होते. त्यासाठी गावागावांत जाऊन समाजाच्या मतांचा अहवाल आणा, असे सांगितले होते. हा अहवाल अपुरा आहे. राजकारणापुढे आरक्षणाचा प्रश्न मागे पडत आहे. त्यामुळे आरक्षण आणि लेकरांचे वाटोळे होऊ नये यासाठी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार द्यायचा नाही. आपण विधानसभेची तयारी आतापासूनच सुरु करू. मराठाच नव्हेतर, सर्व जाती-धर्माचे लोक देणारे बनवू, आता तुम्हाला कोणाला मतदान करायचे ते करा. पण, ज्यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा तो करा, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी केले.वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह धनगर, मुस्लिम, मागासवर्गीय, लिंगायत आणि इतर अनेक समाजाच्या प्रतिनिधींनी आपली भेट घेऊन लोकसभा निडणुकीवर चर्चा केली होती. परंतु, ३० तारखेला मराठा समाजाचा येणारा अहवाल व त्यातील समाजाची भूमिका पाहूनच आपण अंतिम निर्णय घेणार होतो. त्यामुळे आपण कोणालाही पाठिंबा दिला नव्हता, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

राजकारणाला कमी समजू नका■ राजकारणात भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेता येत नाही. राजकारणाची आणि समाजकारणाची गणिते वेगळी असतात. राजकारणात प्रत्येक मतदाराची मने जिंकावी लागतात. त्याच्या प्रश्नाला हात घालावा लागतो.■ राजकारण सोपे समजू नका आणि त्यामुळेच आपण जात हारू नये म्हणून हा निर्णय घेत असल्याचेही जरांगे-पाटील म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४