शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
2
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
3
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
4
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
5
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
6
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
7
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
8
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
9
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
10
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
11
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
12
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
13
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
14
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
15
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
16
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
17
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
18
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
19
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
20
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा

सुप्रिया सुळे राजकारणात कोणत्या ३ कामांसाठी आल्या?; बारामतीत बेधडकपणे बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 17:44 IST

राष्ट्रवादी काँग्रेसची वैचारिक भूमिका आहे. काहींनी वेगळी भूमिका घेतली त्यामुळे अंतर आहेत. वैचारिक मतभेद आहेत मनभेद नाहीत असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

बारामती – राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर खासदार सुप्रिया सुळे या बारामती दौऱ्यावर आल्या होत्या. बारामती माझे माहेर आणि कर्मभूमी असून इथली लोकं कायम माझ्यासोबत राहिले आहेत. मतदारसंघात विकास कामांची पाहणी करण्यासाठी आली. इथले कार्यकर्ते पवार कुटुंबाचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे कार्यकर्ते कुणाकडेही असले तरी त्याचा चुकीचा आणि वेगळा अर्थ काढू नका असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

खासदार सुप्रिया सुळेंनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले की, माझे राजकारण हे समाजकारण आहे. मी पक्षाकडे फक्त लोकसभेचे तिकीट मागितले आहे. मी राजकारणात ३ कामांसाठी आलीय. सेवेसाठी, लोकांचा, शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मी आलीय. त्यामुळे मी एक सेवक म्हणून गेल्या १५ वर्षापासून बारामतीच्या लोकांनी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आयुष्यभर ऋणी राहील. दिल्ली दरबारी माझं संसदीय कामकाज पाहता. बारामती लोकसभा मतदारसंघाची आन, बान, शान लोकसभेत पहिल्या नंबरवरच राहील यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे असं त्यांनी म्हटलं.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काहींच्या विचारात अंतर आले आहे. त्याचा पवार कुटुंबाशी काही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे पवार कुटुंब नाही. गेली २४ वर्ष पवारांचे नेतृत्व मान्य करून असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी प्रचंड कष्ट केलेते. आम्ही मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आलोय. राष्ट्रवादीतील काही घटकांना असं वाटते. वेगळ्या विचारधारेसोबत जावे तर काहींनी याच विचारावर ठाम राहायचे ठरवले. त्यामुळे ही वैयक्तिक मतभेद नाहीत. हे वैचारिक मतभेद आहेत. त्यात गैर नाही असंही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले.

दरम्यान, अनेक वर्षे एन. डी पाटील यांनी वेगळ्या विचारधारेच्या चौकटीत राजकारण केले. शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस वेगवेगळे राजकारण असताना नाते जपले, इतकी प्रगल्भता पवार कुटुंबाकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची वैचारिक भूमिका आहे. काहींनी वेगळी भूमिका घेतली त्यामुळे अंतर आहेत. आज आमच्यात वैचारिक मतभेद आहेत मनभेद नाहीत असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

निवडणूक होईल असं वाटत नाही

केंद्रातला आणि महाराष्ट्रातलं सरकार सातत्याने सर्व्हेने निवडणूक लावतात. सर्व्हे फारसा चांगला नसल्याने अजूनही सरकारने महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुका घेतल्या नाहीत हे चांगले नाही. दीड वर्ष उलटले तरी निवडणूक नाहीत. सामान्य माणसांनी त्यांची कामे कोणाकडे न्यायची. त्यामुळे निवडणूक होणे गरजेचे आहे. परंतु निवडणूक होतील असं वाटत नाही असा आरोपही सुप्रिया सुळेंनी केला.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेस