शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

...तर शेतकऱ्यांच्या आंदोलनापेक्षाही भयानक आंदोलन होईल; मराठा आरक्षणावरून तुपकरांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 13:40 IST

शेतकरी संघटनेचा मराठा समाजाला पाठिंबा आहे. मुंबईची कोंडी करण्याचा जर प्रयत्न या आंदोलनात झाला, तर पुढाऱ्यांना घराबाहेर पडता येणार नाही. असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, या मागणीला मान्य करत जरांगे पाटलांनी काल सायंकाळी उपोषण थांबविले आहे. परंतू, जर दगाफटका झाला तर मराठा समाज सहन करणार नाही, असा इशाराही पाटलांनी दिला आहे. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मराठा समाजाकडून मुंबईची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला, तर पुढाऱ्यांना घराबाहेर पडता येणार नाही, असा इशारा दिला आहे. 

जरांगे पाटलांनी सरकारला दोन जानेवारीपर्यंतचा वेळ दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता मराठ्यांना फिरविण्याच काम करू नये. मराठ्यांना आरक्षण देणे गरजेचे आहे. मराठा म्हणजे मरेल पण हटणार नाही. शेतकऱ्यांनी कृषी कायद्याच्या विरोधात जे दिल्लीत आंदोलन केले, त्यापेक्षाही भयानक आंदोलन राज्यात होईल. त्यामुळे सरकारने मराठा समाजाला फसविण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा तुपकर यांनी दिला आहे. 

शेतकरी संघटनेचा मराठा समाजाला पाठिंबा आहे. मुंबईची कोंडी करण्याचा जर प्रयत्न या आंदोलनात झाला, तर पुढाऱ्यांना घराबाहेर पडता येणार नाही. असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

सरकारने दगाफटका करण्याचा प्रयत्न केल्यास मुंबईकडे कूच करून मुंबई बंद करून टाकू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. आता जर  सरकारने दगाफटका केला, तर यांच्या पूर्ण नाड्या बंद करू. कोणत्या नाड्या बंद करायच्या तर आर्थिक आर्थिक नाडी बंद, सामाजिक, औद्योगिक, व्यावसायिक अशा सरकारच्या सगळ्या नाड्या बंद करू. चलो मुंबईची घोषणा करून मुंबई बंद करून टाकू.  असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना