शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

...तर शेतकऱ्यांच्या आंदोलनापेक्षाही भयानक आंदोलन होईल; मराठा आरक्षणावरून तुपकरांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 13:40 IST

शेतकरी संघटनेचा मराठा समाजाला पाठिंबा आहे. मुंबईची कोंडी करण्याचा जर प्रयत्न या आंदोलनात झाला, तर पुढाऱ्यांना घराबाहेर पडता येणार नाही. असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, या मागणीला मान्य करत जरांगे पाटलांनी काल सायंकाळी उपोषण थांबविले आहे. परंतू, जर दगाफटका झाला तर मराठा समाज सहन करणार नाही, असा इशाराही पाटलांनी दिला आहे. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मराठा समाजाकडून मुंबईची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला, तर पुढाऱ्यांना घराबाहेर पडता येणार नाही, असा इशारा दिला आहे. 

जरांगे पाटलांनी सरकारला दोन जानेवारीपर्यंतचा वेळ दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता मराठ्यांना फिरविण्याच काम करू नये. मराठ्यांना आरक्षण देणे गरजेचे आहे. मराठा म्हणजे मरेल पण हटणार नाही. शेतकऱ्यांनी कृषी कायद्याच्या विरोधात जे दिल्लीत आंदोलन केले, त्यापेक्षाही भयानक आंदोलन राज्यात होईल. त्यामुळे सरकारने मराठा समाजाला फसविण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा तुपकर यांनी दिला आहे. 

शेतकरी संघटनेचा मराठा समाजाला पाठिंबा आहे. मुंबईची कोंडी करण्याचा जर प्रयत्न या आंदोलनात झाला, तर पुढाऱ्यांना घराबाहेर पडता येणार नाही. असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

सरकारने दगाफटका करण्याचा प्रयत्न केल्यास मुंबईकडे कूच करून मुंबई बंद करून टाकू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. आता जर  सरकारने दगाफटका केला, तर यांच्या पूर्ण नाड्या बंद करू. कोणत्या नाड्या बंद करायच्या तर आर्थिक आर्थिक नाडी बंद, सामाजिक, औद्योगिक, व्यावसायिक अशा सरकारच्या सगळ्या नाड्या बंद करू. चलो मुंबईची घोषणा करून मुंबई बंद करून टाकू.  असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना