शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

...तर धनगरांना ST चे दाखले देण्यास सरकारने सुरू करावं; गोपीचंद पडळकरांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 18:34 IST

सरकारने राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देऊन धनगरांना एसटीचे दाखले देणे सुरू करावं अशी मागणी त्यांनी केली.

मुंबई – राज्यात एकीकडे मराठा ओबीसी यांच्यात आरक्षणावरून संघर्ष पेटताना दिसत असताना दुसरीकडे धनगर समाजानेही एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी केली आहे. राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन धनगरांना एसटीचे दाखले देण्यास सांगा अशी मागणी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, धनगर समाजाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य सरकार समिती गठीत करतंय, त्याबद्दल सरकारचे आभारी आहोत. २१ सप्टेंबरच्या बैठकीत आम्ही सरकारकडे मागणी केली होती, राज्यात धनगड अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगर आहेत. हे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करून सरकारने मान्य केले आहे. त्यामुळे सरकारने राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देऊन धनगरांना एसटीचे दाखले देणे सुरू करावं अशी मागणी त्यांनी केली.

पडळकरांच्या मागणीवर राज्य सरकारने हा अधिकार राज्याला नाही असं म्हटलं, तेव्हा गोपीचंद पडळकरांनी बैठकीत काही राज्यांचे जीआर आणले, ज्यात छत्तीसगड, बिहार, मध्य प्रदेश, तेलंगणा यांचा समावेश होता. या राज्यांनी जीआर कुठल्या अधिकारात काढले, त्यांनी काही सर्व्हे केला होता का? काही आयोग नेमला होता का? ही माहिती महाराष्ट्र सरकारने घ्यावी आणि त्याआधारे सरकारी अधिकारी आणि धनगर समाजाचे काही प्रतिनिधी यांची समिती नेमून इतर राज्यात जाऊन माहिती घ्यायची आहे असंही गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय, देवेंद्र फडणवीसांच्या काळात मराठा समाजाला जे स्वतंत्र आरक्षण दिले होते, तसे आरक्षण मराठा समाजाला आता दिले जाणार आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही अशी भूमिका सरकारने वारंवार मांडली आहे. त्यामुळे मराठा-ओबीसी वाद होण्याचे कारण नाही, सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे अशीही माहिती गोपीचंद पडळकरांनी दिली आहे.

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षणGopichand Padalkarगोपीचंद पडळकरOBCअन्य मागासवर्गीय जाती