शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

...तर रेशन दुकानदारांना ‘मेस्मा’, गिरीश बापट यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 05:10 IST

रेशन दुकानदारांच्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांनी अट्टाहासाने संपावर जाऊ नये. संपावर गेलेल्यांवर सरकारने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. मात्र, आवश्यकता भासल्यास मेस्मा लावण्यासही सरकार मागेपुढे पाहणार नाही

मुंबई - रेशन दुकानदारांच्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांनी अट्टाहासाने संपावर जाऊ नये. संपावर गेलेल्यांवर सरकारने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. मात्र, आवश्यकता भासल्यास मेस्मा लावण्यासही सरकार मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.आपल्या विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदारांनी १ एप्रिलपासून संपावर जाण्याची घोषणा केली होती. राज्यात एकूण ५२ हजार रेशन दुकाने आहेत. त्यातील ४ हजार ३०० दुकाने संपात सहभागी झाली होती. त्यातील रायगड जिल्ह्यातील १ हजार ३६१ दुकानदारांनी संप मागे घेतला आहे. त्यामुळे हा संप बारगळलाच आहे. संपाचा रेशनपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे बापट यांनी स्पष्ट केले. रेशन दुकानदारांच्या बहुतांश मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. मात्र, शासकीय सेवेत सामावून घेत त्यांना ५० हजार पगार देण्याची मागणी पूर्ण करता येणार नाही, असेही बापट यांनी स्पष्ट केले.आझाद मैदानावरील रेशन दुकानदारांच्या आंदोलनाच्या वेळी त्यांना संप करू नये, आठ दिवसांत चर्चा करतो, असे आश्वासन दिले होते. तरीही काही संघटनांनी संप पुकारला. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र येथील सर्व रेशन दुकाने चालू आहेत. रेशन दुकानदारांच्या विविध मागण्या आहेत. मागील २-३ वर्षांत त्यांच्या समस्यांचा आम्ही अभ्यास केला आहे. रेशन दुकानांमध्ये पॉझ मशीन बसवल्यामुळे अनुचित प्रकार थांबले आहेत. द्वारपोच योजनेमुळे रेशन दुकानदारांना गोदामातून धान्य आणावे लागत नाही. त्यामुळे धान्याची तूट पडत नाही. काही रेशन दुकानदारांनी केवळ धान्य विक्रीतून अपेक्षित आर्थिक लाभ मिळत नाही, अशी तक्रार केली होती. त्यावर उपाय म्हणून त्यांना भाजीपाला, शेतीची बियाणे आदी विक्रीस अनुमती दिली आहे, असे ते म्हणाले.केवळ ४२ प्रकरणे प्रलंबित!अनेक वर्षांपासून रेशन दुकानांची ४ हजार ५०० प्रकरणे सुनावणीसाठी प्रलंबित होती. ३१ मार्चपर्यंत त्यातील केवळ ४२ प्रकरणे शिल्लक आहेत. या प्रकरणांची सुनावणी आम्ही राज्यातील ६ विभागांमध्ये केली. त्यामुळे आता सुनावणीसाठी सर्वांना मुंबईमध्ये येण्याची आवश्यकता नाही, असेही बापट यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :girish bapatगिरीष बापटMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार