शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

"...तर मुंबईची लोकल सेवा बंद करावी लागेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 11:54 IST

सगळ्या खासगी क्षेत्रातील कंपन्यांना, उद्योजकांना वर्क फ्रॉम होम किंवा गरज पडल्यास कार्यालयात 50 टक्क्यांपेक्षा कमी लोकांमध्ये काम करा, असं सांगितलेलं आहे.

मुंबईः देशात कोरोना व्हायरसनं अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत या रोगानं तीन जणांचा मृत्यू झाला असून, 148हून अधिक जण कोरोनाबाधित आहेत. त्यानंतर आता राज्य सरकारनंही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचे पाऊल उचललं आहे. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 42 झाल्याचीही माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईतल्या वाढत्या गर्दीवर मुख्यमंत्र्यांनी आपले विचार स्पष्ट केले आहेत. आम्ही परिस्थितीचं निरीक्षण करत आहोत. सगळ्या खासगी क्षेत्रातील कंपन्यांना, उद्योजकांना वर्क फ्रॉम होम किंवा गरज पडल्यास कार्यालयात 50 टक्क्यांपेक्षा कमी लोकांमध्ये काम करा, असं सांगितलेलं आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.जर मुंबईच्या जनतेनं आमचं ऐकलं नाही, तर मुंबईची लाइफलाइन असलेली ट्रेन आणि बस सुविधा 10 ते 12 दिवसांसाठी जनतेच्या हितार्थ बंद करावी लागेल. त्यादृष्टीनंही लक्ष ठेवून आहोत, असंही आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे. सध्याची परिस्थिती ठीक आहे. कोणाचीही एकदम गंभीर स्थिती नाही. स्क्रीनिंग आणि टेस्टिंगमध्ये 42 संशयित रुग्णांचे वगळता बाकीचे सगळे निगेटिव्ह आलेले आहेत.काही लोकांची चाचणी होणं अजून बाकी आहे. चाचणी वाढवण्याचं काम आपण मोठ्या पद्धतीनं करतो आहोत. नवी मेडिकल कॉलेजमध्ये ज्या लॅब सुरू करायच्या आहेत. औरंगाबाद, धुळे, सांगली, कोल्हापूर त्या ठिकाणी लॅब सुरू करायच्या आहेत. सरकारची परवानगी आणि एनआयव्हीचं व्हेलिडेशन लवकर कसं मिळेल, यासाठी स्वतः प्रयत्न करणार आहे. 

प्रवासाचा इतिहास आणि लक्षणं आढळल्यावरच कोरोनाची तपासणी करण्यात येणार आहे. या दोन अटींच्या पूर्ततेनंतरच टेस्ट केल्या जातात. सर्दी, खोकला झाला म्हणून लगेचच चाचणी करण्यात येणार नाही. कोरोनाची लक्षणं असलेल्या लोकांच्याच चाचण्या केल्या पाहिजेत, हे नियमावली सांगते. सामाजिक दृष्टिकोनातून जे कोणी संशयित किंवा कोरोना पॉझिटिव्ह आढळत असतील, त्याबाबत दुजाभाव होता कामा नये. त्यांच्याबाबत माणुसकीला धरून नसलेली वर्तणूक करणं हे निषेधार्ह आहे. या आजारानं घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही. सोसायटीतल्या लोकांनी अशा रुग्णांना मदत केली पाहिजे. 

टॅग्स :localलोकलcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस