शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

...तर ‘महा ई परीक्षा’ प्रणालीत बदल करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 06:08 IST

मुख्यमंत्री : महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन

नागपूर : महापरीक्षा पोर्टलद्वारे विविध सरकारी पदांची भरती करण्यात येते. मात्र, या पोर्टलद्वारे राबविण्यात येणारी प्रक्रिया सदोष असल्याचा आरोप परीक्षार्थीकडून झाला व राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी हे पोर्टल बंद करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. परंतु संबंधित पोर्टलमध्ये त्रुटी असल्या तरी त्या दूर करण्यात येतील. तंत्रज्ञान नवीन आहे व ते सुरळीत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी बुधवारी विधान परिषदेत केले. त्रयस्थ संस्थेमार्फत या ‘पोर्टल’चे तांत्रिक परीक्षण करण्यात येत आहे. याच्या अहवालाच्या आधारे आवश्यक असेल तर महा ई परीक्षा प्रणालीत आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

सतीश चव्हाण यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली. सरकारी नोकरभरतीत पारदर्शकता यावी, सर्व प्रक्रिया आॅनलाईन व्हावी म्हणून महापरीक्षा पोर्टल सुरू करण्यात आले. मात्र, भरतीअंतर्गत परीक्षेचा गोंधळ, चुकीची प्रश्नपत्रिका, सदोष निकाल, उत्तरतालिकांतील त्रुटी, अनुपस्थित उमेदवाराचे अंतिम गुणवत्ता यादीत नाव यामुळे परीक्षार्थींनी ‘पोर्टल’वर हरकती घेतल्या असल्याची भूमिका चव्हाण यांनी मांडली. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी आपली बाजू स्पष्ट केली. राज्यात सर्व प्रशासकीय विभागांतील क व ड गटाच्या पदभरतीसाठी आॅनलाईन पद्धतीने महापरीक्षा पोर्टलद्वारे परीक्षा घेण्यात येतात व ‘महाआयटी’तर्फे याचे आयोजन करण्यात येते. या ‘पोर्टल’द्वारे ज्या विभागांच्या परीक्षा घेण्यात येतात, त्याच्या प्रश्नपत्रिका तज्ज्ञांकडून तयार होतात. सॉफ्टवेअरमधील सोयीमुळे प्रश्नांची पुनरावृत्ती होत नाही. अंतिम निवड यादीत घोळ होत नाही.

केवळ एकदाच नजरचुकीने उमेदवाराचा ‘कोड’ चुकीचा लिहिला गेल्यामुळे जालना जिल्ह्यातील तलाठी प्रवर्गाच्या परीक्षेस गैरहजर राहिलेल्या उमेदवाराचे नाव अंतिम यादीत आले होते. परीक्षा केंद्र निवडण्याचेदेखील परीक्षार्थींना पर्याय असतात. पशुसंवर्धन विभागाच्या परीक्षेसाठी चार लाखांहून अधिक उमेदवारांची नोंदणी झाली होती.

इतक्या जणांची परीक्षा घेण्याची ‘पोर्टल’ची क्षमता नाही. त्यामुळे या भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे, असेदेखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी