शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

...तर ‘महा ई परीक्षा’ प्रणालीत बदल करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 06:08 IST

मुख्यमंत्री : महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन

नागपूर : महापरीक्षा पोर्टलद्वारे विविध सरकारी पदांची भरती करण्यात येते. मात्र, या पोर्टलद्वारे राबविण्यात येणारी प्रक्रिया सदोष असल्याचा आरोप परीक्षार्थीकडून झाला व राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी हे पोर्टल बंद करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. परंतु संबंधित पोर्टलमध्ये त्रुटी असल्या तरी त्या दूर करण्यात येतील. तंत्रज्ञान नवीन आहे व ते सुरळीत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी बुधवारी विधान परिषदेत केले. त्रयस्थ संस्थेमार्फत या ‘पोर्टल’चे तांत्रिक परीक्षण करण्यात येत आहे. याच्या अहवालाच्या आधारे आवश्यक असेल तर महा ई परीक्षा प्रणालीत आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

सतीश चव्हाण यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली. सरकारी नोकरभरतीत पारदर्शकता यावी, सर्व प्रक्रिया आॅनलाईन व्हावी म्हणून महापरीक्षा पोर्टल सुरू करण्यात आले. मात्र, भरतीअंतर्गत परीक्षेचा गोंधळ, चुकीची प्रश्नपत्रिका, सदोष निकाल, उत्तरतालिकांतील त्रुटी, अनुपस्थित उमेदवाराचे अंतिम गुणवत्ता यादीत नाव यामुळे परीक्षार्थींनी ‘पोर्टल’वर हरकती घेतल्या असल्याची भूमिका चव्हाण यांनी मांडली. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी आपली बाजू स्पष्ट केली. राज्यात सर्व प्रशासकीय विभागांतील क व ड गटाच्या पदभरतीसाठी आॅनलाईन पद्धतीने महापरीक्षा पोर्टलद्वारे परीक्षा घेण्यात येतात व ‘महाआयटी’तर्फे याचे आयोजन करण्यात येते. या ‘पोर्टल’द्वारे ज्या विभागांच्या परीक्षा घेण्यात येतात, त्याच्या प्रश्नपत्रिका तज्ज्ञांकडून तयार होतात. सॉफ्टवेअरमधील सोयीमुळे प्रश्नांची पुनरावृत्ती होत नाही. अंतिम निवड यादीत घोळ होत नाही.

केवळ एकदाच नजरचुकीने उमेदवाराचा ‘कोड’ चुकीचा लिहिला गेल्यामुळे जालना जिल्ह्यातील तलाठी प्रवर्गाच्या परीक्षेस गैरहजर राहिलेल्या उमेदवाराचे नाव अंतिम यादीत आले होते. परीक्षा केंद्र निवडण्याचेदेखील परीक्षार्थींना पर्याय असतात. पशुसंवर्धन विभागाच्या परीक्षेसाठी चार लाखांहून अधिक उमेदवारांची नोंदणी झाली होती.

इतक्या जणांची परीक्षा घेण्याची ‘पोर्टल’ची क्षमता नाही. त्यामुळे या भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे, असेदेखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी