शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 17:32 IST

Shahajibapu Patil : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत शहाजीबापू पाटील यांचा पराभव झाला. यानंतर सांगोला येथे आज चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

पंढरपूर : सांगोल्यातील अनेक भागात पाण्याचा प्रश्न निर्माण होत असून दुष्काळ जाणवत असतो. यामुळे निवडणुकीत जरी पडलो असलो; तरी एक वर्षाच्या आत सांगोल्याच्या १४ गावातील शेतात पाणी आले नाही तर राजकारणातून निवृत्ती घेईन, असे विधान शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत शहाजीबापू पाटील यांचा पराभव झाला. यानंतर सांगोला येथे आज चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना राजकीय निवृत्ती विषयी मोठे विधान केले. तसेच, यावेळी शेवटच्या श्वासापर्यंत सांगोला तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी काम करत राहणार असल्याचे शहाजीबापू पाटील यांनी स्पष्ट केले. 

सांगोल्यातील अनेक भागात पाण्याचा प्रश्न निर्माण होत असून दुष्काळ जाणवत असतो. यामुळे निवडणूकीत जरी पडलो असलो; तरी एक वर्षाच्या आत सांगोल्याच्या १४ गावतील शेतात पाणी आले नाही तर राजकीय निवृत्ती घेईन, असे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवला. शिंदे गटाचे अनेक उमेदवार मोठ्या मताधिक्यासह विजयी झाले. मात्र, शिंदे गटामधील प्रमुख आमदार असलेले आणि "काय झाडी, काय डोंगार, काय हाटील", या विधानामुळे फेमस झालेले शहाजीबापू पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला.शहाजीबापूंना शेकापच्या बाबासाहेब देशमुख यांनी २५ हजार ३८६ मतांनी पराभूत केले.

टॅग्स :sangole-acसांगोलाPandharpurपंढरपूरMaharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण