शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

‘...तर काँग्रेस दोन-चार नेत्यांचाच पक्ष राहील’, चव्हाणांना उशिरा शहाणपण सुचले', विखे-पाटलांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 10:25 IST

ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाचा दिलेला राजीनामा ही पक्षांतर्गत बाब असली तरी त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर काँग्रेस नेतृत्वाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अन्यथा हा पक्ष चार-दोन नेत्यांचाच राहील, असे मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केले.

शिर्डी : ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाचा दिलेला राजीनामा ही पक्षांतर्गत बाब असली तरी त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर काँग्रेस नेतृत्वाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अन्यथा हा पक्ष चार-दोन नेत्यांचाच राहील, असे मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केले.काँग्रेस पक्षात लोकशाहीसाठी यापूर्वी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांनीही संघर्ष केला होता. मात्र, त्यांनाही त्याची किंमत चुकवावी लागली होती. याची आठवणही त्यांनी पत्रकारांशी बोलताना करून दिली.शिर्डी येथे पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री विखे म्हणाले की, मी जेव्हा काँग्रेस पक्ष सोडला, त्यावेळीही अशीच परिस्थिती होती. यामध्ये बदल न झाल्यामुळेच पक्षाचे असंख्य नेते आता बाहेर पडत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलेले मत म्हणजे त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे.

आता उरलेले आमदार तरी सांभाळाशिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या झालेल्या युतीबाबत विखे म्हणाले, शिवसेनेने कोणाबरोबर युती करावी, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे; परंतु आता जनाधार गमावलेल्यांना कोणाचा तरी आधार शोधण्याची वेळ आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी केलेली युती मान्य नसल्यामुळे चाळीस आमदार तुमच्यापासून दूर गेले. नव्या युतीमुळे उर्वरित आमदार तरी तुमच्या जवळ राहतील का?, याचे आत्मपरीक्षण उद्धव ठाकरे यांनी करावे, असे विखे म्हणाले.

 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेस