शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

‘...तर काँग्रेस दोन-चार नेत्यांचाच पक्ष राहील’, चव्हाणांना उशिरा शहाणपण सुचले', विखे-पाटलांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 10:25 IST

ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाचा दिलेला राजीनामा ही पक्षांतर्गत बाब असली तरी त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर काँग्रेस नेतृत्वाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अन्यथा हा पक्ष चार-दोन नेत्यांचाच राहील, असे मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केले.

शिर्डी : ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाचा दिलेला राजीनामा ही पक्षांतर्गत बाब असली तरी त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर काँग्रेस नेतृत्वाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अन्यथा हा पक्ष चार-दोन नेत्यांचाच राहील, असे मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केले.काँग्रेस पक्षात लोकशाहीसाठी यापूर्वी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांनीही संघर्ष केला होता. मात्र, त्यांनाही त्याची किंमत चुकवावी लागली होती. याची आठवणही त्यांनी पत्रकारांशी बोलताना करून दिली.शिर्डी येथे पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री विखे म्हणाले की, मी जेव्हा काँग्रेस पक्ष सोडला, त्यावेळीही अशीच परिस्थिती होती. यामध्ये बदल न झाल्यामुळेच पक्षाचे असंख्य नेते आता बाहेर पडत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलेले मत म्हणजे त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे.

आता उरलेले आमदार तरी सांभाळाशिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या झालेल्या युतीबाबत विखे म्हणाले, शिवसेनेने कोणाबरोबर युती करावी, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे; परंतु आता जनाधार गमावलेल्यांना कोणाचा तरी आधार शोधण्याची वेळ आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी केलेली युती मान्य नसल्यामुळे चाळीस आमदार तुमच्यापासून दूर गेले. नव्या युतीमुळे उर्वरित आमदार तरी तुमच्या जवळ राहतील का?, याचे आत्मपरीक्षण उद्धव ठाकरे यांनी करावे, असे विखे म्हणाले.

 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेस