शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
4
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
5
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
6
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
7
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
8
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
9
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
10
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
11
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
12
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
13
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
14
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
15
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
16
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
17
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
18
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
19
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
20
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला

‘...तर काँग्रेस दोन-चार नेत्यांचाच पक्ष राहील’, चव्हाणांना उशिरा शहाणपण सुचले', विखे-पाटलांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 10:25 IST

ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाचा दिलेला राजीनामा ही पक्षांतर्गत बाब असली तरी त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर काँग्रेस नेतृत्वाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अन्यथा हा पक्ष चार-दोन नेत्यांचाच राहील, असे मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केले.

शिर्डी : ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाचा दिलेला राजीनामा ही पक्षांतर्गत बाब असली तरी त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर काँग्रेस नेतृत्वाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अन्यथा हा पक्ष चार-दोन नेत्यांचाच राहील, असे मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केले.काँग्रेस पक्षात लोकशाहीसाठी यापूर्वी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांनीही संघर्ष केला होता. मात्र, त्यांनाही त्याची किंमत चुकवावी लागली होती. याची आठवणही त्यांनी पत्रकारांशी बोलताना करून दिली.शिर्डी येथे पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री विखे म्हणाले की, मी जेव्हा काँग्रेस पक्ष सोडला, त्यावेळीही अशीच परिस्थिती होती. यामध्ये बदल न झाल्यामुळेच पक्षाचे असंख्य नेते आता बाहेर पडत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलेले मत म्हणजे त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे.

आता उरलेले आमदार तरी सांभाळाशिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या झालेल्या युतीबाबत विखे म्हणाले, शिवसेनेने कोणाबरोबर युती करावी, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे; परंतु आता जनाधार गमावलेल्यांना कोणाचा तरी आधार शोधण्याची वेळ आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी केलेली युती मान्य नसल्यामुळे चाळीस आमदार तुमच्यापासून दूर गेले. नव्या युतीमुळे उर्वरित आमदार तरी तुमच्या जवळ राहतील का?, याचे आत्मपरीक्षण उद्धव ठाकरे यांनी करावे, असे विखे म्हणाले.

 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेस