शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"...तर मुख्यमंत्र्यांना ही दिवाळी सुखात जाऊ देणार नाही’’, नवनीत कौर-राणा यांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 17:26 IST

Navneet Kaur-Rana News: गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अमरावती - गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भात निर्माण झालेल्या पुरस्थितीची आणि शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर पडून करावी, अशी मागणी खासदार नवनीत कौर-राणा यांनी केली आहे. तसेच जर राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी सुखात गेली नाही तर मुख्यमंत्र्यांची दिवाळीही आम्ही सुखाने जाऊ देणार नाही, असा इशारा नवनीत कौर राणा यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

विदर्भ-मराठवाड्यातील पूरपरिस्थितीबाबत नवनीत कौर-राणा म्हणाल्या की, गेल्या दोन तीन दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीही उत्पन्न येणार नाही. काही लोकांची घरे तर काही लोकांची दुकाने पाण्यात वाहून गेली आहेत. आज महाराष्ट्रातील या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ आणि मदतीच्या हाताची गरज आहे. मात्र मुख्यमंत्री मातोश्रीमध्ये मस्त बसले आहेत, तर राज्यातील शेतकरी आणि जनता त्रस्त आहे.

मी मुख्यमंत्र्यांना आवाहन करते की, येणाऱ्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ३० हजार रुपये मदत मिळाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती करते की, मुख्यमंत्र्यांनी आतातरी मातोश्रीबाहेर पडावे आणि शेतात जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस करावी. त्यांच्या अडचणी ऐकून घ्याव्यात. त्यांना काय मदत करायची याचा निर्णय घ्या. आज मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीमध्ये आराम करण्याऐवजी शेतकऱ्यांसोबत असले पाहिजे. महाराष्ट्रातील शेतकरी आज खूप संकटात आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून शेतकऱ्यांना साथ दिली पाहिजे. जर राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी सुखात गेली नाही तर मुख्यमंत्र्यांची दिवाळीही आम्ही सुखाने जाऊ देणार नाही, असा इशारा नवनीत कौर राणा यांनी दिला. 

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाfloodपूरUddhav Thackerayउद्धव ठाकरे