शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

...तेव्हा अजित पवार यांना देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार स्थापन करण्याचा सल्ला दिला होता? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 14:08 IST

Sharad Pawar News: Devendra Fadanvis यांच्यासोबत ते पहाटेचे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचाही Ajit Pawar यांना पाठिंबा होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असते. दरम्यान, या चर्चेबाबत आता शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

मुंबई - २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या सत्तास्थापनेच्या तिढ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले होते. पहाटेच्या वेळी झालेल्या त्या शपथविधीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. तर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दरम्यान, ते सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचाही अजित पवार यांना पाठिंबा होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असते. दरम्यान, या चर्चेबाबत आता शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

शरद पवार म्हणाले की, त्या शपथविधीसाठी मी अजित पवारांना भाजपासोबत पाठवल्याची चर्चा नेहमीच होत असते. मात्र मी त्यांना पाठवलं असतं तर त्यांनी सरकारच स्थापन केलं असतं. असं अर्धवट काम केलं नसतं, मी अजित पवार यांना फडवणीस यांच्यासोबत सरकार स्थापन करण्यासाठी पाठवलं होतं या चर्चेला काहीच अर्थ नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगतलं.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी ठाम भूमिका घेतल्याने राजकीय पेच निर्माण झाला होता. भाजपा शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यास तयार नव्हता. त्यावेळी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतील, अशी चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, अचानक शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट झाली होती. त्यानंतर काही दिवस राज्यात राष्ट्रपती राजवट लागली होती. तेव्हा अचानक देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर शिवसेना आणि भाजपामधील मतभेद वाढू लागले होते.शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसली होती. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन करण्याचा विचार मोदींच्या मनात आला असावा. त्या पार्श्वभूमीवर माझी आणि मोदींची दिल्लीमध्ये भेट झाली तेव्हा महाराष्ट्रात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याबाबत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तशीच इच्छा होती. मात्र मी पंतप्रधानांच्या कार्यालयात जाऊन हे शक्य नाही, याची कल्पना मोदींना दिली. तेव्हा अजूनही विचार करा, असा सल्ला मोदींनी दिला. मात्र मी ठामपणे नकार दिला, असा दावाही शरद पवार यांनी केला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारण