शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

...तर १०० टक्के उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री केले असते; संजय राऊतांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 19:21 IST

२०१४ मध्ये आम्ही भाजपाविरोधात लढलो, लोकांनी आम्हाला बहुमत दिले होते ते भाजपाविरोधात होतं असं राऊतांनी म्हटलं.

मुंबई – महाविकास आघाडी स्थापन करताना प्रत्येक प्रक्रियेत एकनाथ शिंदे सामील होते. त्यांना सगळं मान्य होते. उद्धव ठाकरेंनी त्यांना सोबत घेऊनच निर्णय घेतलेत. जर भाजपाने दिलेला शब्द पाळला असता तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, भाजपा-शिवसेनेत अडीच अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद देण्याचे ठरले होते. जर भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा शब्द पाळला असता तर उद्धव ठाकरेंनी १०० टक्के मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे केले असते. पण भाजपाने मुख्यमंत्रिपद नाकारले. भाजपाने ही गोष्ट मान्य केली असती तर पक्ष फुटला नसता. तुम्ही आता त्यांना मुख्यमंत्रिपद दिले. पण तेव्हाही आम्ही एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करणार होतो. तेव्हा भाजपाने नाकारले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी शिंदेंकडेच होती असं त्यांनी सांगितले.

२०१४ मध्ये आम्हाला भाजपाविरोधात जनमत होतं...  

२०१४ मध्ये आम्ही भाजपाविरोधात लढलो, लोकांनी आम्हाला बहुमत दिले होते ते भाजपाविरोधात होतं. भाजपाला तेव्हा बहुमत नव्हते. मोदींच्या लाटेतही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेला ६४ जागा जिंकल्या. आमचा दारूण पराभव करण्यासाठी प्रयत्न झाले. पण ६४ जागांवर विजय मिळाला हे भाजपाविरोधातील जनमत होते पण तरीही आम्ही एकत्रित आलो होतो असा टोला खासदार संजय राऊतांनी भाजपाला लगावला. शिवसेना पॉडकास्टमध्ये आदेश बांदेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

जिथे कसाब तिथेच मी होतो...

जेलमध्ये बंधने खूप असतात. जिथे कसाब होता तिथेच मी होतो. पण मी राहिलो, तक्रार केली नाही. कुठलीही सुविधा घेतली नाही. मी कधीही काही मागितले नाही. जितक्या दिवस छळायचे ते छळा. पुस्तके वाचणे आणि लोकांना भेटण्याची परवानगी कोर्टाने दिली होती. तुरुंगातील १ दिवस म्हणजे १०० दिवस. १ ताससुद्धा जात नाही. भिंतीपलीकडे जग नाही. शिवसेनेचं कुटुंब मोठं होतं. जेव्हा मला कोर्टात आणले जायचे तेव्हा हजारो शिवसैनिक कोर्टात जमायचे. शिवसैनिक नेते कुटुंबाच्या संपर्कात होते. माझ्या कुटुंबाशी सर्व नेते संपर्कात होते. हा कितीमोठा अन्याय आहे हे सगळ्यांना माहिती होते असा अनुभवही संजय राऊतांनी सांगितला आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे