शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ; समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा देणार

By अतुल कुलकर्णी | Updated: October 19, 2024 06:20 IST

आज काँग्रेसच्या सल्लागार मंडळाची बैठक मुंबईत होणार आहे. मुंबईत विषय बऱ्यापैकी पुढे गेला असला तरी, संजय राऊत, नाना पटोले यांच्यातील वादात महाविकास आघाडीत तणावात असल्याच्या बातम्या आल्या. पण अंतिम निर्णय दिल्लीतून होईल, असे दोन्ही बाजूने सांगितले जात आहे.

अतुल कुलकर्णी -

मुंबई : विधानसभेच्या मुंबईतील ३६ जागांपैकी सर्वाधिक २० ते २२ जागा उद्धव ठाकरे शिवसेना तर १२ ते १३ जागी काँग्रेस उमेदवार उभे करेल. एक जागा समाजवादीला तर एक शरद पवार गटाला दिली जाईल. असा फॉर्म्युला पुढे आला आहे.

ठाकरे गटाचे १५ पैकी ८ आमदार मुंबईतील आहेत. त्यात आदित्य ठाकरे (वरळी), अजय चौधरी (शिवडी), संजय पोतनीस (कलीना), सुनील प्रभू (दिंडोशी), ऋतुजा लटके (अंधेरी पूर्व), रमेश कोरगावकर (भांडुप), सुनील राऊत (विक्रोळी) आणि प्रकाश पातर्फेकर (चेंबूर) यांचा समावेश आहे. काँग्रेसचे मुंबईत ४ आमदार आहेत. त्यात अमीन पटेल (मुंबादेवी), वर्षा गायकवाड (धारावी), झिशान सिद्दिकी (बांद्रा पूर्व) आणि असलम शेख (मालाड पश्चिम), वर्षा गायकवाड लोकसभेवर निवडून आल्यामुळे आणि झिशान सिद्दिकी अजित पवार गटात गेल्यामुळे या दोन जागा काँग्रेसकडे सध्या नाहीत. 

नसीम खान यांच्यासाठी चांदिवली मतदार संघ काँग्रेसला हवा आहे. त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंकडून निवडून आलेले दिलीप लांडे शिंदे गटात आहेत. वर्सोव्याचा मतदारसंघ काँग्रेसला माजी मंत्री सुरेश शेट्टी यांच्यासाठी हवा आहे. या जागी भाजपच्या भारती लव्हेकर विद्यमान आमदार आहेत. ठाकरे गटाने हे दोन मतदारसंघ काँग्रेससाठी सोडायची तयारी दर्शवली आहे. वर्सोव्यात उद्धव ठाकरे गटाकडे राजूल पटेल, यशोधर फणसे ही दोन नावे आहेत मात्र सुरेश शेट्टींसाठी हा मतदार संघ काँग्रेसला दिला जाईल, असे सांगितले जाते. कुलाबा मतदारसंघातून भाजपचे राहुल नार्वेकर तर भायखळामधून शिंदे गटाच्या यामिनी जाधव विद्यमान आमदार आहेत. कुलाबा मतदारसंघही ठाकरे गटाने काँग्रेससाठी द्यायची तयारी दर्शवली आहे. काँग्रेसकडे या मतदारसंघासाठी अॅड. रवी जाधव, पुरण दोशी, हिरा देवासी असे काही उमेदवार आहेत. यामिनी जाधव लोकसभेत हरल्या. 

विधानसभेतही शिंदे गटाचा पराभव करण्यासाठी भायखळा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांना हवा आहे. त्यासाठी त्यांच्याकडे मनोज जामसुदकर, रमाकांत रहाटे, गीता गवळी हे तीन उमेदवार आहेत. ठाकरे गटाने जामसुदकर यांच्यासाठी या जागेचा आग्रह धरला आहे. जोगेश्वरी पूर्वमधून अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीसाठी शिवसेनेत चर्चा आहे. वांद्रे पूर्व काँग्रेसने ठाकरे यांच्यासाठी सोडल्याने त्यांच्याकडून रश्मी ठाकरे यांच्या बहिणीचे चिरंजीव वरूण सरदेसाई यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. आ. अनिल परब यांनी एका कार्यक्रमात सरदेसाईंचे नाव जाहीर केले आहे.

अंतिम निर्णय दिल्लीतूनच होणारआज काँग्रेसच्या सल्लागार मंडळाची बैठक मुंबईत होणार आहे. मुंबईत विषय बऱ्यापैकी पुढे गेला असला तरी, संजय राऊत, नाना पटोले यांच्यातील वादात महाविकास आघाडीत तणावात असल्याच्या बातम्या आल्या. पण अंतिम निर्णय दिल्लीतून होईल, असे दोन्ही बाजूने सांगितले जात आहे.

३६ पैकी ४ जागा काँग्रेस लढविणार?ठाण्यातल्या १८ पैकी ऐरोली, भिवंडी पश्चिम, तर पालघरमधील वसई, मीरा-भाईंदर अशा ४ जागा काँग्रेसने तर उरलेल्या सर्व जागा उद्धव ठाकरे गटाने लढवाव्यात यालाही तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. रायगडमधील उरणची आणि रत्नागिरीमधील लांजा-राजापूर या दोन जागा काँग्रेसने मागितल्या आहेत. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024vidhan sabhaविधानसभाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNana Patoleनाना पटोलेSharad Pawarशरद पवार